वसई : महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी आणि रिपाइंमध्ये युती झाल्याने राज्यस्तरावर असलेल्या भाजप-सेना-रिपाइं महायुतीला येथे छेद गेला आहे.सोमवारी राजकीय क्षितिजावर अचानक घडलेल्या घडामोडीमुळे राज्यस्तरावर असलेल्या भाजपा-सेना व रिपाइं अशा महायुतीला वसई विरारमध्ये झटका बसला. रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतर बहुजन विकास आघाडी व रिपाइं आठवले गट यामध्ये समझोता झाला. बहुजन विकास आघाडीने काही जागा रिपाइंसाठी सोडल्या. यामुळे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. रिपाइंने पाठिंबा देऊ केल्यामुळे बहुजन विकास आघाडीला दलित मतांचा जोगवा मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
आठवलेंचा महायुतीला ‘दे धक्का’
By admin | Updated: June 3, 2015 05:07 IST