शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

लातूरमध्ये ऑइल मीलची टाकी साफ करताना आठ कामगार बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2017 21:56 IST

कीर्ती आॅईलमिलमध्ये संध्याकाळच्या वेळी केमिकल टँकची स्वच्छता करण्यासाठी उतरलेले ७ ते ८ कामगार चार-पाच तासांपासून बाहेर न आल्यामुळे खळबळ

 ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 30 -  येथील १२ नंबर पाटीजवळ असलेल्या कीर्ती आॅईलमिलमध्ये  संध्याकाळच्या वेळी केमिकल टँकची स्वच्छता करण्यासाठी उतरलेले ७ ते ८ कामगार चार-पाच तासांपासून बाहेर न आल्यामुळे खळबळ उडाली आहे.  हे सर्व कामगार मयत झाले असल्याच्या संशयाने लातूरच्या औद्योगिक वर्तुळात धक्का बसला आहे. रात्री उशिरापर्यंत केमिकल टँकमध्ये अडकलेल्या कामगारांना कसे काढायचे, याचे शर्थीने प्रयत्न चालू होते. त्यामुळे नेमके किती कामगार अडकले व किती जणांचा मृत्यू झाला, याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

लातुरातील प्रसिद्ध कीर्ती आॅईल मिलचे १२ नंबर पाटी येथे युनिट आहे. या मिलमधील एका केमिकल टँकची दर दहा-पंधरा दिवसाला स्वच्छता होते. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास या टँकच्या स्वच्छतेसाठी काही कामगार हे टाकीत उतरले. मात्र ते परत आले नाहीत. त्यामुळे अन्य कामगार टाकीत उतरलेले कामगार का परत आले नाहीत, या चौकशीला गेले. मात्र तेही परत आले नाहीत. असे सात ते आठ कामगार या टाकीत उतरल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यातील एकही कामगार बाहेर न आल्यामुळे या सर्वांचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिकृत माहिती कोणतीच बाहेर आली नाही. मिलचे संचालक कीर्ती भुतडा यांच्याशी संपर्कही होऊ शकला नाही. त्यामुळे नेमक्या कामगारांचा मृत्यू झाला, हेही कळू शकले नाही. परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७ ते ८ जण या टाकीत बेपत्ता झाल्याचे बोलले जाते.  
केमिकल टँकमध्ये नेमके काय झाले..?
आॅईल मिलमधील या केमिकल टँकमध्ये मोठ्या प्रमाणात अशुद्ध रासायनिक द्रव्य व पाणी जमा होते. हा टँक स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वच्छतेसाठी आवश्यक असलेले केमिकल टाकून ठेवले जाते. ठराविक दिवसात हे केमिकल टाकीतील इतर रासायनिक द्रव्याला स्वच्छ करून संपूर्ण टँक धुवून काढला जातो. यासाठी काही कंत्राटी कामगार नियुक्त केलेले आहेत. हे कामगार नियमितपणे सोमवारी स्वच्छतेसाठी उतरले होते. परंतु, ते बाहेरच आले नाहीत. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण केमिकलमध्ये दडले आहे की केमिकलपासून तयार झालेल्या विषारी वायूमुळे? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.