शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
3
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
4
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
5
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
6
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
7
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
8
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
9
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
10
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
11
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
12
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
13
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
14
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
15
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
16
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
17
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
18
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
19
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
20
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार विद्याथ्र्याच्या गुणपत्रिका रखडल्या

By admin | Updated: July 26, 2014 00:56 IST

मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय.बी.कॉम आणि टी.वाय.बी.ए. या परीक्षांचे निकाल जाहीर होऊन बराच कालावधी लोटला तरी अद्याप विद्याथ्र्याना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या  टी.वाय.बी.कॉम आणि टी.वाय.बी.ए. या परीक्षांचे निकाल जाहीर होऊन बराच कालावधी लोटला तरी अद्याप विद्याथ्र्याना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. महाविद्यालये, एमकेसीएल आणि विद्यापीठामध्ये समन्वय नसल्याने गुणपत्रिका रखडल्या आहेत. या प्रकाराने विद्यापीठाने गोंधळाची परंपरा कायम ठेवली आहे.
टी.वाय.बी.कॉम परीक्षेला विद्यापीठातून सुमारे 65 हजार विद्यार्थी बसले होते. परीक्षेचा निकाल जाहीर झाला तरी अद्याप हजारो विद्याथ्र्याना मूळ गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. श्रेयांक श्रेणी पद्धतीनुसार प्रथम, द्वितीय परीक्षांचे गुण महाविद्यालये एमकेसीएलमार्फत विद्यापीठाकडे पाठवितात. सर्व सेमिस्टरच्या गुणांच्या आधारानुसार विद्याथ्र्याना श्रेणी दिली जाते. मात्र, एमकेसीएलकडून सुमारे आठ हजार विद्याथ्र्याचे गुण विद्यापीठाकडे अद्याप आले नसल्याने या विद्याथ्र्याच्या गुणपत्रिकाच तयार झालेल्या नाहीत. एमकेसीएलकडून प्रथम आणि द्वितीय वर्षाचे गुणच आले नसल्याने विद्याथ्र्याच्या गुणपत्रिका तयार झाल्या नसल्याचे विद्यापीठातील सूत्रंनी सांगितले.
राज्यातील इतर विद्यापीठांतील अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आली तरी विद्यापीठातील विद्याथ्र्याच्या गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. यामुळे विद्याथ्र्याना मुंबईबाहेर शिक्षणासाठी जायचे असल्यास त्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. तसेच नोकरीसाठी गुणपत्रिकेची मागणी झाल्यास विद्याथ्र्याला नोकरी गमवावी लागणार आहे. गुणपत्रिकेच्या मागणीसाठी विद्यापीठात दररोज हजारो विद्यार्थी चकरा मारत असून त्यांना केवळ निकाल लवकरच देण्यात येतील, अशी फुटकळ आश्वासने देण्यात येत आहेत. यामुळे विद्यापीठाच्या या कारभाराला विद्यार्थीही कंटाळले आहेत. याबाबत परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
 
विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका विद्याथ्र्याना बसत आहे. यामुळे एमकेसीएलला दिलेले कंत्रट रद्द करण्यात यावे. तसेच विद्याथ्र्याच्या गुणपत्रिका तातडीने देण्यात याव्यात, असे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी सांगितले.