शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मृतांच्या वारसांना आठ लाखांची मदत

By admin | Updated: December 19, 2014 02:43 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा मूल, सावली, नागभीड, सिंदेवाही, चिमूर तालुक्यात नरभक्षक वाघ व बिबट्याने धुमाकूळ घालून फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत आठ व्यक्तींना ठार मारले

नागपूर : राज्यातील वनक्षेत्रांजवळ वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने शासनाकडून हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात येत आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या वारसांना पाचऐवजी आठ लक्ष रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रात वाघाच्या वाढत्या हल्ल्यांसंदर्भातील मुद्याकडे शोभाताई फडणवीस, संजय दत्त, भाई जगताप व शरद रणपिसे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले.चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा मूल, सावली, नागभीड, सिंदेवाही, चिमूर तालुक्यात नरभक्षक वाघ व बिबट्याने धुमाकूळ घालून फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत आठ व्यक्तींना ठार मारले. या वाघाला गोळ्या घालून ठार करण्यात आले. यापुढे अशा घटना होऊ नयेत यासाठी राज्य शासनाने निरनिराळे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यात सुरक्षेसोबतच वनक्षेत्रात राहणाऱ्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बांबू प्रशिक्षण केंद्रदेखील तयार करण्यात येत आहे. येथील प्रशिक्षितांना मोफत बांबू पुरविण्यात येईल असे मुनगंटीवार यांनी सांगितले.वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांचे वारस किंवा जखमींना एका महिन्याच्या आत मदत झालीच पाहिजे अशा सूचना देण्यात येतील. जर कुठल्याही अधिकाऱ्याने यात दिरंगाई दाखवली तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासनदेखील त्यांनी दिले.(प्रतिनिधी)