नवी मुंबई : परवानगी न घेता व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व मिठाई दुकानांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी ऐरोलीतील आठ दुकाने सील केली असून कारवाई केलेल्या हॉटेल व मिठाई दुकानांची संख्या ६८ झाली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हॉटेल, मिठाई, बेकरी, केटरर्स चालकांनी महापालिकेचा परवाना घेणे आवश्यक आहे. परंतु अनेक व्यावसायिकांनी पालिकेचे परवाने न घेताच व्यवसाय सुरू केला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परवाना विभागाचे अधिकारी दत्तात्रय नांगरे व त्यांच्या पथकाने सर्व दुकानदारांनी परवाना घेण्याचे आवाहन केले आहे. यानंतरही ज्यांनी परवाने घेतले नाहीत त्यांची दुकाने सील करण्यास सुरवात केली आहे. सीबीडी, सीवूड,नेरूळ, वाशी , कोपरखैरणे परिसरातील ६० हॉटेल, मिठाई दुकानांवर कारवाई केली आहे. शुक्रवारी ऐरोली परिसरात मोहीम राबविण्यात आली. येथील लिटील चायना, मधुर स्वीट, महालक्ष्मी स्वीट्स, हॉटेल साहील, श्रीकृष्ण बंगाली स्वीट्स, श्रीसाईराम मेस, फूड कार्निवल, नाजनुर केटरर्स ही आठ दुकाने सील केली आहेत. पालिकेच्या धडक मोहिमेमुळे विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परवाने मिळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)>सीबीडी, सीवूड,नेरूळ, वाशी , कोपरखैरणे परिसरातील ६० हॉटेल, मिठाई दुकानांवर कारवाई केली आहे. शुक्रवारी ऐरोलीतील लिटील चायना, मधुर स्वीट, महालक्ष्मी स्वीट्स, हॉटेल साहील, श्रीकृष्ण बंगाली स्वीट्स, श्रीसाईराम मेस, फूड कार्निवल, नाजनुर केटरर्स ही आठ दुकाने सील केली आहेत.
ऐरोलीतील आठ हॉटेल सील
By admin | Updated: July 2, 2016 03:01 IST