शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पुतळ्याआड जयंतरावांचे कारस्थान

By admin | Updated: November 23, 2015 00:29 IST

संभाजी पवार : राज्यात साखर कारखाने हडप करणारी राजकारण्यांची टोळी

सांगली : राज्यभरात कारखाने हडप करणारी एक टोळी तयार झाली असून जयंत पाटील त्याचे सदस्य आहेत. त्यामुळेच व्यंकाप्पा पत्की यांचा पुतळा उभारण्याच्या कार्यक्रमाआडून जयंतरावांचे राजकीय कारस्थान सुरू आहे, अशी टीका माजी आमदार संभाजी पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, व्यंकाप्पांच्या पुतळ्यास आमचा विरोध नाही. पुतळा उभारायचाच असेल तर तो आम्हीसुद्धा उभा करू शकतो. मात्र पुतळा उभारण्याच्या कृतीमागे राजकीय खेळी खेळली जात आहे. केवळ कारखाना डोळ्यासमोर ठेवून पुतळ्याचे राजकारण केले जात आहे. पत्कींचा पुतळा उभारण्याचा जयंतरावांना अधिकारच काय? कारखाना चालवायला दिला होता, त्याची मुदत संपली आहे. लवादाने निर्णय दिल्यानंतरही ते कारखाना सोडण्यास तयार नाहीत. कधी ४२ कोटी, कधी ८४ कोटी मागणारे जयंत पाटील आता या कारखान्यासाठी शंभर कोटी रुपये मागत आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांना हा कारखाना सभासदांचा होऊ द्यायचा नाही. त्यामुळे असे उद्योग त्यांनी सुरू केले आहेत. व्यंकाप्पा पत्की यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय संचालक मंडळ, अध्यक्ष व हजारो सभासदांना अंधारात ठेवून घेतला आहे. सर्वोदय कारखान्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, भाडोत्री असणाऱ्या राजारामबापू कारखान्यास व त्याचे सर्वेसर्वा असणाऱ्या जयंतरावांना हा मालकी हक्क दिला कुणी? या कारखान्याची स्थापना ही समाजवादी कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या संघर्षातून झाली आहे. माझ्यासह व्यंकाप्पा, प्रा. शरद पाटील यांच्या प्रयत्नातून कारखान्याची संकल्पना सत्यात उतरली आहे. अरबी उंट तंबूत घेतल्यानंतर, खुंटीसह तंबू घेऊन उंट पळून गेल्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. राज्यातील अनेक पक्षांच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतरही जयंत पाटील यांनी कारखाना ताब्यात दिला नाही. त्यांनी त्यांची लबाडी सुरूच ठेवली आहे. भाड्याने कारखाना चालविण्यास दिल्यानंतर आता सर्वोदय कारखान्याला राजारामबापू कारखाना युनिट क्र. ३ असे नाव पाडले जात आहे. हासुद्धा कारस्थानाचाच भाग आहे. सभासद, शेतकऱ्यांची अस्मिता व हक्क गहाण ठेवून या कार्यक्रमाला उपस्थित राहणे शोभणार नाही. त्यामुळे या कृत्याचा मी निषेध करीत आहे. त्यांच्या कारस्थानांना विरोध करतानाच न्यायालयीन लढाई सुरू आहे. यातून आम्हाला निश्चित न्याय मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)बापूंचा एकही गुण नाही..!राजारामबापूंना आम्ही उगीचच गुरूस्थानी मानले नव्हते. एका पदयात्रेत बापूंच्या पायाला फोड आल्यानंतर आम्ही त्यांच्या पायाला तेल लावले होते. इतकी निष्ठा आणि श्रद्धा आम्ही जपली. मात्र जयंत पाटील यांच्यात एक टक्काही राजारामबापूंचे गुण नाहीत, हे दुर्दैवाने म्हणावे लागते. राजारामबापू कारखान्याच्या अध्यक्षपदी जयंतरावांना बसविण्यात वसंतदादांचा हात होता. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. या कोणत्याही गोष्टीची जाण त्यांना नाही, असे पवार म्हणाले. व्यंकाप्पा व जयंतरावांची खलबतेनैसर्गिक आपत्तीमुळे कारखाना अडचणीत आल्यानंतर तीन वर्षाच्या करारावर राजारामबापू कारखान्याशी ‘सर्वोदय’चा करार करण्याबाबत जयंतराव व व्यंकाप्पा यांच्यात खलबते झाली होती. पत्कींवर विश्वास ठेवून भागीदारी केली होती, अशी माहिती पवार यांनी दिली. मात्र पत्कींवर टीका करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सांगलीच्या वसंतदादाकारखान्यावर आता त्यांचा डोळा...जत, आरग, सर्वोदय असे एकापाठोपाठ एक कारखाने हडप करणाऱ्या जयंत पाटील यांचा डोळा आता वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यावर आहे. या कारखान्याची वाट लावण्यासाठी कारस्थान केले जाण्याची दाट शक्यता आहे. याबाबतची चर्चासुद्धा एकेठिकाणी झाली होती. त्यांच्या कुटिल राजकारणाचा हा शेवटचा टप्पा असेल, असे मत पवार यांनी व्यक्त केले.