शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

कार्यक्षम अधिकाऱ्यास बदलीची बक्षिसी!

By admin | Updated: April 29, 2017 03:35 IST

अन्न व औषध प्रशासनातील गैरव्यवहार उघडकीस आणणारे दक्षता विभागाचे सहआयुक्त हरीश बैजल यांची बदली करून एफडीएमधील अधिकाऱ्यांच्या टोळीला अभय देण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अतुल कुलकर्णी / मुंबईअन्न व औषध प्रशासनातील गैरव्यवहार उघडकीस आणणारे दक्षता विभागाचे सहआयुक्त हरीश बैजल यांची बदली करून एफडीएमधील अधिकाऱ्यांच्या टोळीला अभय देण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.एप्रिल २०१६ मध्ये सोलापुरातील एव्हॉन कंपनीच्या तपासणीत सापडलेल्या दोन हजार कोटींच्या इफेड्रीन प्रकरणी दक्षता विभागाचे सहआयुक्त बैजल यांनी ‘एफडीए’तील ७ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाईची शिफारस केली होती. मात्र, त्यांच्या अहवालानुसार कारवाई करण्याऐवजी अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या कार्यालयाने सहआयुक्तांना अशी कृती करता येते की नाही, अशी विचारणा विधि व न्याय विभागाकडे केली. शिवाय, विधि विभागाला अर्धवट माहिती दिली गेली. पुढे अ‍ॅडव्होकेट जनरल यांचे मत मागवले गेले. त्यावर सहआयुक्तांची कृती योग्य नसली तरी अधिकारी दोषी नाहीत असे म्हणता येणार नाही, असा अभिप्राय विधि व न्याय विभाग आणि एजींनी दिला. मात्र त्यावरही विभागाने पुढे काहीच कारवाई केली नाही. कोडीन फॉस्फेट प्रकरणातही ५ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास शासनाने आॅक्टोबर २०१६ मध्ये मंजुरी दिली, पण त्या प्रकरणातही आयुक्त हर्षदीप कांबळे आणि मंत्री कार्यालयाने त्याची अंमलबजावणी केली नाही. सप्टेंबर २०१६ मध्ये बैजल यांनी आस्थापना शाखेची तपासणी केली व अहवाल आयुक्तांना दिला. त्यावरही कारवाई करण्याऐवजी आयुक्तांनी ज्या आदेशांच्या आधारे बैजल यांनी ही तपासणी केली तो आदेशच रद्द करून टाकला आणि तपास अधिकाऱ्यालाही बदलले.बैजल यांनी केलेल्या तपासणीत ३७ प्रकरणांमध्ये गंभीर गैरप्रकार आढळून आले असताना आयुक्तांनी कोणतीही कारवाई केली नाही, याबाबत ‘सोसायटी फॉर द अवेअरनेस आॅफ सिव्हिल राइट्स’चे यजुर्वेदी राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालीन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ, के.पी. बक्षी यांच्याकडे लेखी तक्रार केली. पण त्याचेही पुढे काहीच झाले नाही. उलट चांगले काम करण्याचे बक्षीस म्हणून दक्षता विभागाचे सहआयुक्त बैजल यांचीच बदली केली गेली. या प्रकारामुळे हे सरकार तरी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.एसीबीचे सापळे वाढले!-ज्या न्या. लेन्टीन यांच्या शिफारशीमुळे एफडीएमध्ये दक्षता सहआयुक्त हे पद निर्माण झाले त्याचे अस्तित्वच संपवून टाकण्याचा प्रकार एफडीएमध्ये घडत आहे. याचे परिणामही आता दिसत आहेत. २००१ ते २०१७ या काळात एफडीएचे २७ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. त्यापैकी तब्बल ९ अधिकारी हे हर्षदीप कांबळे आयुक्त झाल्यानंतर म्हणजे जानेवारी २०१५ ते २०१७ या काळात सापडलेले आहेत. हे प्रमाण ३३ टक्क्यांच्या आसपास आहे.