शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

भारतीय महिलांवर आजही अंधश्रद्धेचा प्रभाव, ही दुर्दैवी बाब

By admin | Updated: January 7, 2017 03:04 IST

एकविसाच्या शतकाकडे प्रभावीपणे वाटचाल करणाऱ्या भारतीय महिलांवर आजही अंधश्रद्धेचा प्रभाव आहे

महाड : एकविसाच्या शतकाकडे प्रभावीपणे वाटचाल करणाऱ्या भारतीय महिलांवर आजही अंधश्रद्धेचा प्रभाव आहे, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत ज्येष्ठ लेखिका ऊर्मिला पवार यांनी व्यक्त केली. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या संमेलनाध्यक्षा म्हणून बोलत होत्या. तर पुस्तक आणि साहित्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही. बुद्धीला खाद्य देणाऱ्या वाचन संस्कृतीला तोड या जगात असूच शकत नाही, असे प्रतिपादन संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता यांनी केले.ऊर्मिला पवार म्हणाल्या की, महिला साहित्य संमेलनामुळे सहभागी होणाऱ्या महिलांना नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळणार आहे. स्त्री आणि पुरुषांमध्ये फरक नाही. मात्र, आजच्या स्त्रिने संरक्षण कवच बाजूला करून कणखार बनण्याची खरी गरज आहे. तेराव्या शतकात समाजव्यवस्थेसमोर अगंतुक आणि घुसमट होऊनही ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी सारे सहन करीत, संयम राखला हा त्या भावंडांचा मोठेपणा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा विचार त्या काळी मांडला होता. मात्र, त्या विचारांना महिलांनीच दुर्दैवाने विरोध केला. त्या वेळी महिला सक्षमीकरणासाठी डॉ. बाबासाहेबांचे विचार अमलात आणले असते, तर आजची महिला अधिक प्रगल्भ झाली असती. यासाठी महिलांच्या मानसिक तेमध्ये बदल होणे आवश्यक असल्याचे मतही ऊर्मिला पवार यांनी व्यक्त करताना आजही संपूर्ण देशभरात महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराबाबत तीव्र संताप आणि खेद व्यक्त केला.आजचे विश्व समजून घ्यायचे असेल तर स्त्रीशक्तीचा जागर होणे आवश्यक आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलनो करावी लागत आहेत. तर कर्जबाजारीपणामुळे या शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात ही कृषिप्रधान म्हणवून घेणाऱ्या भारताची शोकांतिका म्हणावी लागेल, असे उषा मेहता यांनी सांगताना, आजची महिला, समाजकारणाबरोबरच राजकारणातही उत्तम काम करू शकते, हे अनेक महिलांनी आज दाखवून दिले आहे. मात्र, राजकारणात सक्रियपणे भाग न घेणाऱ्या महिलांनी राजकीय घडामोडीनंतर लक्ष ठेवले पाहिजे. कर्तृत्ववान महिलेच्या नेतृत्वाखाली कामकाज करणाऱ्या पुरुषांना त्याचा कमीपणा वाटतो. महिलांनीही तू विधवा, तू सौभाग्यवती असा भेदभाव न करता मतिभ्रम टाळावा, असा सल्लाही उषा मेहता यांनी या वेळी दिला. या वेळी महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, कोमसाप विश्वस्त रेखा नार्वेकर, संमेलन समितीप्रमुख उषा परब, कार्याध्यक्षा नमिता किर, स्वागताध्यक्षा शोभा सावंत, कार्याध्यक्षा सुनंदा देशमुख यांचीही भाषणे झाली. डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकन्या जोशी यांनी केले. कार्यक्रमापूर्वी विरेश्वर मंदिर येथून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. महाडकर नागरिक तसेच शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ६ ते ८ जानेवारी या तीन दिवसांत या संमेलनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह परिसंवाद, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. (वार्ताहर)