शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाचा आरोग्यावर परिणाम

By admin | Updated: June 20, 2016 00:52 IST

चऱ्होली येथे गेल्या १५ दिवसांपासून चिकनगुनियाच्या साथीने थैमान घातल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे निगडी-प्राधिकरण परिसरामध्ये देखील साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत

तानाजी पोवार ल्ल कोल्हापूर महिन्यापूर्वी मोठ्या धूमधडाक्यात सुरू झालेली शहरातील ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम अचानक थांबली. तर्क-वितर्क बांधले गेले. काही पदाधिकारी आणि नगरसेवकांचे दबावतंत्र तसेच सक्षम अधिकाऱ्यांअभावी मोहीम थांबली, नव्हे थांबविली. अधिकारी केबिन्समध्ये बसून फक्त आॅर्डर सोडतात; प्रत्यक्ष जागेवर कोणीही फिरकत नसल्याने कर्मचाऱ्यांनीही मोहिमेतून अंग काढून घेतले. शहरात पथकाने हटविलेल्या केबिन्स पुन्हा थाटात, त्याच जागी उभारल्या. फेरीवाले, केबिनधारक रस्त्यावर उतरल्याने अपुरे पडू लागले आहेत. महापालिकेतील काही वजनदार पदाधिकारी, नगरसेवकांंच्या आशीर्वादानेच शहरातील रस्ते, फुटपाथवर फेरीवाल्यांची अतिक्रमणे वाढत आहेत. त्यामुळे रस्ते अपुरे पडून बेशिस्त वाहने उचलण्याचा शहर वाहतूक शाखेचा धंदा मात्र जोमात सुरू आहे. महिन्यापूर्वी अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू झाली अन् आठवड्यानंतर ती थांबली. मोहिमेतील यंत्रणा म्हणे, नालेसफाईसाठी अन् वृक्षारोपणाचे खड्डे पाडण्यासाठी वळविली. अतिक्रमण विभागाने तावडे हॉटेल चौक ते शिवाजी पूल, सायबर चौक ते संभाजीनगर पेट्रोलपंप याशिवाय अन्य दोन ठिकाणी किरकोळ प्रमाणात मोहीम राबविली, बस्स! खासगी कंपनीच्या सर्व्हेनुसार शहरातील फेरीवाल्यांची संख्या ही सुमारे ६००० इतकी नोंदविली; पण अतिक्रमण विभागाच्या सर्व्हेक्षणानुसार शहरात अवघे ४००० फेरीवाले असून यापूर्वीच्या सर्वेक्षणात फेरीवाल्यांचा आकडा फुगविल्याचे स्पष्ट झाले. फेरीवाले कृती समितीने शहरात सुमारे १२ हजार फेरीवाले असल्याचे सांगितले आहे व आहे त्याच ठीकाणी पुर्नवसणाची त्यांची मागणी आहे. प्रभावीपणे मोहीम राबविण्याची गरज ४यापूर्वी तत्कालीन आयुक्त राजगोपाल देवरा, विजय सिंघल, उपायुक्त संजय हेरवाडे यांनी अतिक्रमण हटाव मोहीम सक्षमपणे राबविली होती. त्यावेळी या अधिकाऱ्यांनी मोहीम सुरू करताना स्वत:सह सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल बंद ठेवण्यास सांगून मोहीम फत्ते केली. ४पण सध्याचे अधिकारी हे बैठक बोलावून फक्त आदेश सोडतात, प्रत्यक्ष मोहीम राबविताना ते कधीही कारवाईस्थळी फिरकत नाहीत, तर अनेक अधिकाऱ्यांचे मोबाईल स्विच आॅफ असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रोत्साहन व पाठबळ मिळत नाही. पुन्हा केबिन्स थाटल्या गेल्या महिन्यात अतिक्रमण विभागाने अतिक्रमित केबिन्स हटविल्या; पण काही दिवसांत पुन्हा त्याच ठिकाणी पुन्हा आहे त्याच केबिन्स थाटल्या. अनेक केबिन्स उभारण्यासाठी काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे पाठबळ मिळाले आहे. पोलिस संरक्षण मिळण्यातअडचण अतिक्रमण विभागातील अधीक्षक दर्जाचे अधिकारीपद गेली सात वर्षे रिक्त आहे. मोहीम राबविताना पोलिस संरक्षण मागणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र द्यावे लागते; पण सक्षम अधिकारी नसल्याने हे पत्र देताना अडचणी येत असल्याने पोलिस संरक्षण मिळत नसल्याचे अनेक वेळा दिसून येते. सात वर्षे प्रमुखपद रिक्त अतिक्रमण विभागाचे प्रमुखपद हे अधीक्षक दर्जाचे पद आहे. गेली सात वर्षे हे पद रिकामेच आहे. या पदावर मलई मिळत नसल्याने अधिकारी येण्यास फारसे इच्छुक नाहीत. त्यामुळे या पदाचा गाडा कनिष्ठ लिपिक पंडितराव पोवार हेच सांभाळत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या पदावर सक्षम अधिकारी यावेत यासाठी कधीही प्रयत्न केले नाहीत. काय करणे आवश्यक ४विभागास सक्षम अधिकारी नियुक्ती ४चारही विभागीय कार्यालयांनी टप्प्याटप्प्याने मोहीम राबवावी ४चारही विभागीय कार्यालयांतील अधिकारी व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र बसून कारवाईचा आराखडा तयार करून कारवाई करावी ४अतिक्रमण काढल्यानंतर त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही त्याकडे लक्ष देण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती आवश्यक. ४न्यायालयात अधिकारी उपस्थित राहत नसल्याने अनेक खटले विरोधात जातात.