शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शिक्षणाधिकारी आता रडारवर

By admin | Updated: August 4, 2016 02:30 IST

३२ शिक्षकांनी विविध विद्यापीठांतून बोगस पदव्या मिळवून त्याआधारे नियम बाह्य वेतन वाढ व पदन्नोत लाटल्या प्रकरणीचे पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटले आहेत.

वसई : वसई तालुक्यातील जिल्हा परिषदशाळेच्या १३२ शिक्षकांनी विविध विद्यापीठांतून बोगस पदव्या मिळवून त्याआधारे नियम बाह्य वेतन वाढ व पदन्नोत लाटल्या प्रकरणीचे पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटले आहेत. या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त होऊन सव्वा महिना उलटूनही दोषी शिक्षकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. वसईतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील १३२ शिक्षकांनी राजतील व राजबाहेरील विविध विद्यापिठातून बोगस पदव्या मिळवताना नियमानुसार आवश्यक रजा शाळेतून घेतलेली नाही. सदर शिक्षक एकाच वेळी शाळेत कामावरही हजर असताना त्याचवेळी ते बीएड व बी.पीएड. या अभसक्रमाच्या परिक्षा देत असल्याचा घोटाळा वसईचे भाजपा अध्यक्ष मारुती घुटुकडे यांनी उजेडात आणला होता. याप्रकरणी वसईच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात हे प्रकरण खरे आहे का? असा प्रश्न सदस्यांकडून विचारण्यात आला असता. त्यावर अशंत: खरे असे अपूर्ण व अस्पष्ट उत्तर देण्यात आले आहे. याप्रकरणी दोषी विरोधात कोणती कारवाई करण्यात आली? या दुसऱ्या प्रश्नावर १३ जुन २०१६ रोजी कारवाईसाीठी प्रस्ताव पालघर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केल्याचे उत्तर देण्यात आले आहे. मात्र कारवाईस विलंबनाची कारणे का? या तिसऱ्या प्रश्नावर निरंक असे उत्तर देण्यात आले आहे. यावरुन घोटाळ्या प्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचे घुटुकडे यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)>दोषी शिक्षकांना पाठीशी घालण्याचा प्रकारया प्रकरणी आधी देण्यात आलेल्या दोषी शिक्षकांची संख्या १३२ वरुन नंतरच्या यादीत १२६ दाखवण्यात आली आहे. सहा नावे कशी वगळली गेली? बीपीएड हा शारिरीक शिक्षणाचा अभ्यासक्रम विद्यालयात न जाता व शाळेतून रजाही न घेता कसा पूर्ण झाला? कार्यालयाकडून अहवालात देण्यात आलेल्या यादीत कोणत्याही मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखाचे नाव नाही. मग ते पदवीधर नाहीत का? अशा प्रश्नांचा खुलासा चौकशी अहवालात झालेला नाही.अहवाल येऊन ४५ दिवस उलटल्यावरही पाच महिने चाललेल्या या प्रकरणात सतत वेळ काढूपणा अवलंबण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेच शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी घुटुकडे यांनी केली आहे. शिक्षकांनी फसवणूक केल्याने त्यामुळे त्यांचवर तातडीने कारवाई होणे गरजेचे असताना शिक्षणाधिकारी दोषी शिक्षकांना पाठिशी घालण्याचे काम करीत असल्याचा घुटुकडे यांचा आरोप आहे.