शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

शिक्षणाचे बाजारीकरण रोखणारे व्रतस्थ हवेत

By admin | Updated: August 10, 2015 00:52 IST

आधुनिक शिक्षणव्यवस्थेपुढे विविध आव्हाने आहेत. प्रशिक्षणातून कुशल कामगार तयार होतील.

पुणे : आधुनिक शिक्षणव्यवस्थेपुढे विविध आव्हाने आहेत. प्रशिक्षणातून कुशल कामगार तयार होतील. त्यासाठी शिक्षणाचे बाजारीकरण व व्यापारीकरण होऊ न देता काम करणाऱ्या डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्यासारख्या व्रतस्थ लोकांची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. डॉ. शां. ब. मुजुमदार कृतज्ञता सोहळा समितीच्या वतीने डॉ. मुजुमदार व त्यांच्या पत्नी संजीवनी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, जगातील पहिल्या ५०० विद्यापीठांत आपले एकही विद्यापीठ नसले तरीही असंख्य चांगले विद्यार्थी आपल्याच शिक्षण व्यवस्थेने तयार करून जगाला दिले आहेत. जगाचे उत्पादनाचे हब बनण्याची संधी अमेरिका, चीननंतर आता भारताकडे चालून आली आहे. अशी संधी १०० वर्षांनंतर एखाद्या देशाला मिळत असते. त्यामुळे त्यासाठी चांगले प्रशिक्षित मनुष्यबळ देशाला लागणार आहे. रोजगाराभिमुख शिक्षणातूनच युवा घडवावे लागतील. त्यासाठी अशा संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.तब्बल ८० देशांतील ३० हजार मुले सिम्बायोसिसमध्ये शिकत आहेत. हे साकारण्यासाठी लागणारी प्रेरणा व संस्कार डॉ. मुजुमदारांना कोल्हापूरने दिले आहेत. मात्र जगात सर्वत्र पोहोचायचे असेल तर पुण्याकडेच यावे लागते. तशी सिम्बायोसिस पुण्यातूनच जगभरात पोहोचली आहे. संस्थाविस्तार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे व जगभरातील संस्कृतीचे दर्शन घडवणारे संग्रहालय त्यांनी साकारले आहे, असे पवार म्हणाले. डॉ. मुजुमदार यांच्या कामात नवसर्जनशीलता, अनुकंपा, आत्मीयता आहे. सिम्बायोसिस ही संस्था जागतिक दर्जाची असून, येणाऱ्या काळात शिक्षण हेच खरे भविष्य असणार आहे, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.