शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

नियमबाह्य शुल्क वाढ करणाऱ्या शैक्षणिक संस्थावर कारवाई करणार - शिक्षणमंत्री विनोद तावडे

By admin | Updated: April 26, 2017 16:29 IST

खासगी शिक्षण संस्थांना दोन वर्षातुन एकदा १५ टक्के शुल्कवाढ करण्यास मुभा आहे. परंतू नियमबाह्य पद्धतीने शुल्कवाढ केल्यास

ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 21 - खासगी शिक्षण संस्थांना दोन वर्षातुन एकदा १५ टक्के शुल्कवाढ करण्यास मुभा आहे. परंतू नियमबाह्य पद्धतीने शुल्कवाढ केल्यास त्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित संस्थांवर कारवाई केली जाईल. अशी भूमिका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केली.
 
 विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या कलचाचणी अ‍ॅप सुविधेचे उद्घाटन कासारवाडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर लगेच मुख्यमंत्री निघुन गेले. या उद्घाटन समारंभप्रसंगी शिक्षणमंत्री तावडे बोलत होते. ते म्हणाले, खासगी शिक्षण संस्थांना प्रतिवर्षी शैक्षणिक शुल्क वाढविता येणार नाही. दोन वर्षातून एकदा १५ टक्यापर्यंत शुल्कवाढ करता येईल. पालक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाºयांशी समन्वय साधून संस्थांनी शुल्कवाढीचा निर्णय घ्यायचा आहे. संस्था परस्पर असा निर्णय घेऊ शकत नाही. शाळांमध्ये पालक शिक्षक संघ स्थापन करणे कायद्याने बंधनकारक केले आहे.
 
 पालक शिक्षक संघटना (पीटीए) स्थापन करून संस्थाचालक त्यांच्या मर्जीतल्या लोकांना त्यात सहभागी करतात. त्यामुळे पालकांचे प्रतिनिधी म्हणुन त्यांच्या मर्जीतील लोकांशी समन्वय साधून शुल्कवाढीचा निर्णय संस्था घेतात. हा प्रकार सर्वसामान्य पालकांसाठी अन्यायकारक आहे, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला,त्यास उत्तर देताना तावडे म्हणाले, अवाजवी शुल्कवाढ केली जात असेल, एखाद्या संस्थेत मनमानी कारभार सुरू असेल तर पालकांनी तक्रार द्यावी. त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. 
 
कलचाचणी २०१७ या उपक्रम स्तुत्य
 
 कलचाचणी वेब पोर्टल, अ‍ॅप, हेलपलाईन सुविधेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्यामची आई फौंडेशनचे अध्यक्ष भारत देसडला, संचालिका शीतल बापट उपस्थित होते. महाकरिअरमित्र अ‍ॅप नावाचे हे अ‍ॅप असून महाराष्ट्र शासन आणि श्यामची आई फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम कार्यन्वीत करण्यात आला आहे. हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले.  शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत नेमके काय केले पाहिजे,याची निवड सोपासणारा हा सेतू आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी उपयुक्त असा उपक्रम आहे. दहावीच्या सुमारे १६ लाख,६७ हजार ४४५ विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली. सात क्षेत्रिय अभिरूची कसोटीत त्यांचा कल जाणून घेण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले.