शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

शिक्षण, नोकरीत जि.प. विद्यार्थ्यांना आरक्षण

By admin | Updated: December 4, 2015 01:02 IST

इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत सलग किमान तीन वर्षांचे शिक्षण ग्रामीण भागांतील जिल्हा परिषद शाळेतून घेतलेल्यांना उच्च शिक्षण किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण

- शैलेश वाकोडे,  बुलडाणाइयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत सलग किमान तीन वर्षांचे शिक्षण ग्रामीण भागांतील जिल्हा परिषद शाळेतून घेतलेल्यांना उच्च शिक्षण किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.उच्च शिक्षणाचे प्रवेश आणि सरकारी नोकऱ्या ही केवळ शहरी भागांतील इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेन्ट शाळांमध्ये शिकलेल्यांची मक्तेदारी होऊ नये, यासाठी शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून, त्या संबंधीचा शासन निर्णय (जीआर) ११ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार राज्याच्या ग्रामीण भागांतील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये इयत्ता १ली ते इयत्ता ७वी किंवा ८वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतरच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये किंवा राज्य शासनाच्या वर्ग २, वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण दिले जाईल. हे आरक्षण सन २०२० पासून लागू होईल.ग्रामीण भागांतील पालकांच्या हिताच्या निर्णयाची माहिती त्यांना देण्याची जबाबदारी जिल्हा परिषद यंत्रणेची राहील, असे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाची कारणमीमांसा देताना ‘जीआर’ म्हणतो की, आर्थिकदृष्ट्या सक्षम पालक लठ्ठ फी भरून पाल्यांना खासगी शाळांत टाकतात, तर गरीब घरांतील पाल्यांना जि.प. शाळांमध्येच शिक्षण घ्यावे लागते. सोयीसुविधांच्या बाबतीत जि. शाळा खासगी शाळांच्या तोडीच्या नसतात.आरक्षणाचे पात्रता निकषजि. प. शाळेतून सन २०१५-१६ मध्ये व त्यानंतरच्या शैक्षणिक वर्षांत इयत्ता ७ वी किंवा इयत्ता आठवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच या आरक्षणास पात्र ठरतील.सन २०१५-१६ पूर्वी इयत्ता ७ वी किंवा इयत्ता ८ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अपात्र.सतत किमान तीन वर्षे ग्रामीण जी.प. शाळेत शिक्षण घेऊन इयत्ता ७ वी किंवा इयत्ता ८वी उत्तीर्ण होणे आवश्यक.आरक्षण पर्यायीनिर्णयात १२ वी नंतरचे उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या यांच्यामध्ये ‘आणि’ असा शब्द न वापरता ‘किंवा’ असा शब्द वापरल्याने हे आरक्षण दोन्हींमध्ये मिळणार नाही, तर ते पर्यायी असेल, असे दिसते. मात्र हा पर्याय कधी व कसा निवडायचा याचा सुस्पष्ट खुलासा यात नाही.