शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

शिक्षण विद्यार्थीकेंद्री करावे

By admin | Updated: May 16, 2016 04:30 IST

आपली शिक्षण व्यवस्था ही अधिकाधिक विद्यार्थीकेंद्री करण्यावर भर राहील, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

मुंबई : विद्यार्थ्यांच्या मार्कलिस्टवरील नापास हा शिक्का पुसण्याचे काम आम्ही प्राधान्याने करणार आहोत, ते करताना विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांचा व कौशल्याचा विकास करण्याकडेही विशेष लक्ष देण्यात येईल. एकूणच आपली शिक्षण व्यवस्था ही अधिकाधिक विद्यार्थीकेंद्री करण्यावर भर राहील, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मुख्य सभागृहात शनिवारी सायंकाळी भीमराव भोयर यांच्या ‘शिक्षणवाटा चोखाळताना’ या पुस्तकाचे प्रकाशन शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी तावडे बोलत होते. या वर्षीपासून दहावीप्रमाणेच बारावीच्या विद्यार्थ्यांचीदेखील पुरवणी परीक्षा निकालानंतर एका महिन्यात घेतली जाणार आहे, असे तावडे म्हणाले.या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके, आमदार कपील पाटील, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव, पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे यांच्यासह शिक्षण व प्रसारमाध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)>येत्या २७ ते ३० मेदरम्यान दहावीच्या परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न असून, एका महिन्यानंतर नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. >विशेष म्हणजे या वर्षीपासून फेरपरीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात येणार असून, त्याआधारे या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचा कल लक्षात घेऊन कौशल्य विकास प्रशिक्षणांतर्गत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.