शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून सुशिक्षित शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: September 12, 2015 01:51 IST

शेतकऱ्यांबाबतच्या शासकीय धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत मालेगाव तालुक्यातील एका सुशिक्षित, युवा शेतकऱ्याने गरुवारी रात्री आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांसह पोलीस

वाशिम : शेतकऱ्यांबाबतच्या शासकीय धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत मालेगाव तालुक्यातील एका सुशिक्षित, युवा शेतकऱ्याने गरुवारी रात्री आत्महत्या केली. मुख्यमंत्र्यांसह पोलीस आणि आप्तेष्टांच्या नावे वेगवेगळी पत्रं लिहून या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे मुख्यमंत्री अशाच प्रकारे दुर्लक्ष करीत राहिले, तर शेतकरी आत्महत्या होतच राहतील, अशी भीती या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.अस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतकरी खचून गेला आहे. याच कारणामुळे मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील दत्ता आत्माराम लांडगे या युवा शेतकऱ्याने गुरुवारी रात्री आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला आहे. विदर्भातील शेतकरी दुष्काळाला घाबरत नाही; पण शेतीसाठी लागणारी साधने, भांडवल नसल्याने शेतकरी वैतागला आहे. पाणी आहे, पण वीज नाही. त्याचप्रमाणे मेहनत करायची इच्छा आहे, पण पुरेसे भांडवल नाही, असे त्याने नमूद केले आहे.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास एक लाखाची मदत दिली जाते. शासकीय कर्मचाऱ्यासाठी हा एक महिन्याचा पगार आहे, तर उद्योगपतीसाठी ती एक दिवसाची कमाई आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या सर्व कुटुंबांना शासनाने मासिक १0 हजार रुपये वेतन द्यावे, अशी अपेक्षाही या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. दत्ताकडे १२ एकर शेती असून, त्याला एक भाऊ, एक बहीण, आई, वडील, पत्नी आणि मुलगा आहे. त्याने पत्नी तसेच आप्तेष्टांसाठी लिहिलेल्या पत्रांतून आपल्या आत्महत्येसारख्या कृत्याबाबत क्षमा मागितली आहे.