शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अर्थव्यवस्थादेखील बिघडायला लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 02:28 IST

गहू, उस, कांदा, बटाट्याचे भाव पार पडले आहेत, असे आताच्या राज्यकर्त्यांना कोणी सांगितले तर त्यांच्याकडून उत्तर येते, की एका दृष्टीने बरे झाले

मंचर : गहू, उस, कांदा, बटाट्याचे भाव पार पडले आहेत, असे आताच्या राज्यकर्त्यांना कोणी सांगितले तर त्यांच्याकडून उत्तर येते, की एका दृष्टीने बरे झाले, खाणाऱ्याची सोय झाली. देशातील ५२ टक्के लोकसंख्या शेतीच्या क्षेत्रात आहे व या राज्यकर्त्यांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा दृष्टिकोन नाही. त्यामुळे आज शेतकरी पूर्ण अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थादेखील बिघडायला लागली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.मंचर येथे शेतकरी मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ बेनके, शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, विष्णूकाक हिंगे इत्यादी उपस्थित होते. पवार म्हणाले, मोदींची ‘मन की बात’ आपण ऐकतो, मात्र आपली बात काही त्यांच्या नजरेत आली, असे दिसत नाही. देशातील ५२ टक्के लोकसंख्या शेतीच्या क्षेत्रात आहे. या व्यवसायात असलेल्या माणसाची आर्थिक ताकद व्यवस्थित राहिली नाही तर देशाची अर्थव्यवस्था नीट रहात नाही. देश पुढे न्याययचा असेल, परिवर्तन करायचे असेल तर पहिले लक्ष्य ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे द्या, हे मोदीसाहेबांना सांगण्याची गरज आहे. नोटाबंदीनंतर जिल्हा बँकेत ४,५०० कोटी रुपये जमा झाले. राज्याच्या बँकेत ७०० कोटी रुपये जमा झाले. एकंदर ५,२०० कोटी जमा झाले. मात्र केंद्राने हे ५,२०० कोटी रुपये घेण्यास नकार दिला. हा पैसा अजूनही बँकेकडे पडून आले. हा पैसा स्वीकारा, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या असतानाही आज दहा दिवस झाले तरी हे सरकार स्वीकारत नाही. सामान्य लोकांच्या या बँकेवर सरकारचा विश्वास नाही, यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. यावेळी वळसे पाटील म्हणाले, कृषी मंत्री असताना देशाला व शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम शरद पवार यांनी केले. मात्र सध्या शेतात पीक आहे पण भाव नाही. मागील वर्षीच्या दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका केंद्र व राज्य सरकारने घेतली नाही. यावेळी देवदत्त निकम यांनी शेतकऱ्यांपुढील अडचणी व मागण्या मांडल्या. यावेळी शरदराव शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. (वार्ताहर)