शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्थादेखील बिघडायला लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 02:28 IST

गहू, उस, कांदा, बटाट्याचे भाव पार पडले आहेत, असे आताच्या राज्यकर्त्यांना कोणी सांगितले तर त्यांच्याकडून उत्तर येते, की एका दृष्टीने बरे झाले

मंचर : गहू, उस, कांदा, बटाट्याचे भाव पार पडले आहेत, असे आताच्या राज्यकर्त्यांना कोणी सांगितले तर त्यांच्याकडून उत्तर येते, की एका दृष्टीने बरे झाले, खाणाऱ्याची सोय झाली. देशातील ५२ टक्के लोकसंख्या शेतीच्या क्षेत्रात आहे व या राज्यकर्त्यांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा दृष्टिकोन नाही. त्यामुळे आज शेतकरी पूर्ण अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थादेखील बिघडायला लागली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.मंचर येथे शेतकरी मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ बेनके, शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, विष्णूकाक हिंगे इत्यादी उपस्थित होते. पवार म्हणाले, मोदींची ‘मन की बात’ आपण ऐकतो, मात्र आपली बात काही त्यांच्या नजरेत आली, असे दिसत नाही. देशातील ५२ टक्के लोकसंख्या शेतीच्या क्षेत्रात आहे. या व्यवसायात असलेल्या माणसाची आर्थिक ताकद व्यवस्थित राहिली नाही तर देशाची अर्थव्यवस्था नीट रहात नाही. देश पुढे न्याययचा असेल, परिवर्तन करायचे असेल तर पहिले लक्ष्य ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे द्या, हे मोदीसाहेबांना सांगण्याची गरज आहे. नोटाबंदीनंतर जिल्हा बँकेत ४,५०० कोटी रुपये जमा झाले. राज्याच्या बँकेत ७०० कोटी रुपये जमा झाले. एकंदर ५,२०० कोटी जमा झाले. मात्र केंद्राने हे ५,२०० कोटी रुपये घेण्यास नकार दिला. हा पैसा अजूनही बँकेकडे पडून आले. हा पैसा स्वीकारा, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या असतानाही आज दहा दिवस झाले तरी हे सरकार स्वीकारत नाही. सामान्य लोकांच्या या बँकेवर सरकारचा विश्वास नाही, यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. यावेळी वळसे पाटील म्हणाले, कृषी मंत्री असताना देशाला व शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम शरद पवार यांनी केले. मात्र सध्या शेतात पीक आहे पण भाव नाही. मागील वर्षीच्या दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका केंद्र व राज्य सरकारने घेतली नाही. यावेळी देवदत्त निकम यांनी शेतकऱ्यांपुढील अडचणी व मागण्या मांडल्या. यावेळी शरदराव शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. (वार्ताहर)