शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अर्थव्यवस्थादेखील बिघडायला लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 02:28 IST

गहू, उस, कांदा, बटाट्याचे भाव पार पडले आहेत, असे आताच्या राज्यकर्त्यांना कोणी सांगितले तर त्यांच्याकडून उत्तर येते, की एका दृष्टीने बरे झाले

मंचर : गहू, उस, कांदा, बटाट्याचे भाव पार पडले आहेत, असे आताच्या राज्यकर्त्यांना कोणी सांगितले तर त्यांच्याकडून उत्तर येते, की एका दृष्टीने बरे झाले, खाणाऱ्याची सोय झाली. देशातील ५२ टक्के लोकसंख्या शेतीच्या क्षेत्रात आहे व या राज्यकर्त्यांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा दृष्टिकोन नाही. त्यामुळे आज शेतकरी पूर्ण अडचणीत सापडला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थादेखील बिघडायला लागली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.मंचर येथे शेतकरी मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ बेनके, शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, विष्णूकाक हिंगे इत्यादी उपस्थित होते. पवार म्हणाले, मोदींची ‘मन की बात’ आपण ऐकतो, मात्र आपली बात काही त्यांच्या नजरेत आली, असे दिसत नाही. देशातील ५२ टक्के लोकसंख्या शेतीच्या क्षेत्रात आहे. या व्यवसायात असलेल्या माणसाची आर्थिक ताकद व्यवस्थित राहिली नाही तर देशाची अर्थव्यवस्था नीट रहात नाही. देश पुढे न्याययचा असेल, परिवर्तन करायचे असेल तर पहिले लक्ष्य ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे द्या, हे मोदीसाहेबांना सांगण्याची गरज आहे. नोटाबंदीनंतर जिल्हा बँकेत ४,५०० कोटी रुपये जमा झाले. राज्याच्या बँकेत ७०० कोटी रुपये जमा झाले. एकंदर ५,२०० कोटी जमा झाले. मात्र केंद्राने हे ५,२०० कोटी रुपये घेण्यास नकार दिला. हा पैसा अजूनही बँकेकडे पडून आले. हा पैसा स्वीकारा, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या असतानाही आज दहा दिवस झाले तरी हे सरकार स्वीकारत नाही. सामान्य लोकांच्या या बँकेवर सरकारचा विश्वास नाही, यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. यावेळी वळसे पाटील म्हणाले, कृषी मंत्री असताना देशाला व शेतकऱ्यांना वाचविण्याचे काम शरद पवार यांनी केले. मात्र सध्या शेतात पीक आहे पण भाव नाही. मागील वर्षीच्या दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका केंद्र व राज्य सरकारने घेतली नाही. यावेळी देवदत्त निकम यांनी शेतकऱ्यांपुढील अडचणी व मागण्या मांडल्या. यावेळी शरदराव शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. (वार्ताहर)