शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

आर्थिक-सामाजिकचा घोळ

By admin | Updated: July 20, 2014 01:12 IST

आर्थिक व सामाजिक जनगणनेच्या कामाचा नागपूर जिल्ह्यात या कामासाठी नियुक्त सरकारी यंत्रणा आणि केलेल्या एका खाजगी कंपनीच्या असमन्वयामुळे घोळात घोळ सुरू आहे. हे काम सहा महिन्यात पूर्ण करायचे होते,

जनगणना : सहा महिन्यांचे काम तीन वर्षांनंतरही अपूर्णचंद्रशेखर बोबडे - नागपूरआर्थिक व सामाजिक जनगणनेच्या कामाचा नागपूर जिल्ह्यात या कामासाठी नियुक्त सरकारी यंत्रणा आणि केलेल्या एका खाजगी कंपनीच्या असमन्वयामुळे घोळात घोळ सुरू आहे. हे काम सहा महिन्यात पूर्ण करायचे होते, मात्र तीन वर्षे पूर्ण होऊनही अद्याप ते होऊ शकले नाही.जिल्ह्यात सप्टेंबर २०११ पासून या कामाला सुरुवात झाली. मार्च २०१२ पर्यंत ते पूर्ण करायचे होते. मात्र या कामाला वेळोवेळी कंपनीच्या असहकार्याचा फटका बसला. अनेक अडचणींना तोंड देत व रखडत रखडत का होईना फेब्रुवारी २०१४ पर्यंत काम अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले होते. मात्र पुन्हा ते रखडले असून सध्या ते बंद आहे. नागपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या देखरेखीत जि.प. ग्रामीण विकास यंत्रणाकडूून हा कार्यक्रम राबविण्यात आला. काम अंतिम टप्प्यात असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले. सध्या हे काम प्रकल्प संचालकांनी करायचे की जिल्हाधिकारी कार्यालयाने, याबाबत शासनाने स्पष्ट सूचना दिली नाही, त्यामुळे संभ्रम कायम आहे.कामाचे स्वरूप अत्यंत किचकट आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी नोंदणी करताना अनेक चुका केल्या. त्या दुरुस्त केल्यानंतर अंतिम फाईल्स तयार करण्यात आल्या. विशेष म्हणजे सर्व काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सर्व जिल्ह्यांनी सादर केले होते. आता नव्याने फाईल्समध्ये त्रुटी (व्हेरिफिकेशन फाईल्स) निर्माण होत आहेत. वर्धा जिल्हा १४३, नागपूर जिल्हा ३४६, भंडारा १०८, गोंदिया १२५, गडचिरोली ७८ आणि चंद्रपूर जिल्ह्यात २०९ अशाप्रकारच्या फाईल्स तयार झाल्या आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केल्याने त्रुटी कोण दूर करणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या कामासाठी नेमलेल्या प्रगणकांना अद्याप त्यांचे मानधन मिळाले नाही. या कामासाठी महापालिकेने ४५० प्रगणक आणि १६० पर्यवेक्षक नियुक्त केले होते. त्यांना त्यांच्या कामाचे निम्मेच मानधन देण्यात आले. या कामासाठी शहराला एक कोटी तर पुढच्या कामासाठी तेवढ्याच निधीची गरज आहे.