शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

‘जीएसटी’मुळे बदलणार आर्थिक समीकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 05:15 IST

देशातील विविध राज्यांत व्यवसाय करताना भराव्या लागणाऱ्या कराच्या रकमेत तफावत आहे. पण १ जुलैपासून देशात एका वस्तूला ठरावीक कराची रक्कम आकारली जाणार

मुंबई : देशातील विविध राज्यांत व्यवसाय करताना भराव्या लागणाऱ्या कराच्या रकमेत तफावत आहे. पण १ जुलैपासून देशात एका वस्तूला ठरावीक कराची रक्कम आकारली जाणार असल्यामुळे, आर्थिक समीकरणात बदल होणार आहेत. ‘वस्तू आणि सेवा कर’ (जीएसटी) लागू होणार आहे. त्यामुळे करात सुसूत्रता येणार असल्याचे व्यावसायिकांना माहीत आहे, पण ‘जीएसटी’मुळे नक्की कोणते बदल होणार, याविषयी अनभिज्ञता असल्याचे मत सीए नरेश सेठ यांनी व्यक्त केले. वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल आॅफ द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंट्स आॅफ इंडिया आणि ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या संयुक्त विद्यमाने ‘वस्तू आणि सेवा कर’ याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘ज्ञान सत्रा’चे आयोजन करण्यात आले होते. वांद्रे-कुर्ला संकुलातील आयसीएआय येथे सीए नरेश सेठ यांनी ‘वस्तू आणि सेवा करा’विषयी मार्गदर्शन केले. या सत्राला वेस्टर्न रिजन आयसीएआयचे अध्यक्ष सीए विष्णू अग्रवाल, सीए मनीष गाडिया, सीए कमलेश कोठारी आणि ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला उपस्थित होते. ‘ज्ञान सत्रा’मध्ये बोलताना सेठ यांनी सांगितले, भारत हा जीएसटी लागू करणारा १६५ वा देश आहे. जगातील १६४ देशांनी या आधी जीएसटी लागू केला आहे. १ जुलैपासून देशातील २९ राज्यांत जीएसटी लागू होणार आहे, पण यामध्ये जम्मू आणि काश्मीरचा समावेश नाही. जीएसटी लागू करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी खूप अभ्यास केला आहे. आत्तापर्यंत जीएसटी कौन्सिलच्या १३ बैठका झाल्या आहेत. श्रीनगरमध्ये १६ मे रोजी जीएसटी संदर्भातील एक बैठक होणार असून, यात नियमांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर भरावे लागणारे विविध अप्रत्यक्ष कर बंद होणार असून, जीएसटीच भरावा लागणार आहे. यामुळे दुहेरी कर आकारणी बंद होणार आहे. सध्या उत्पादन केल्यावर १२.५ टक्के एक्साइज ड्युटी, १३.५ टक्के व्हॅट आणि महापालिका क्षेत्रात येणार असल्यास, ५.५ टक्के जकात भरावी लागते. आता जीएसटीमुळे १८ टक्के कर भरावा लागणार आहे. जीएसटी कौन्सिलने जीएसटीमध्ये कराच्या मर्यादा ठरवून दिल्या आहेत. ०, ५, १२ ते १८, २८ टक्के यामध्येच कर आकारता येणार आहे. जीएसटी हा दुहेरी पद्धतीचा आहे. दोन राज्यांमध्ये होणारा व्यवहार आणि एका राज्यात होणारा व्यवहार यामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. जीएसटीमुळे व्यवहारात अधिक पारदर्शकता येईल, असे सेठ यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)अप्रत्यक्ष कर एकत्रितजीएसटीमध्ये अप्रत्यक्ष कर एकत्रित होणार आहेत. त्यामुळे व्यवसायात बदल होणार आहेत. दरडोई उत्पन्नात २ टक्क्यांनी वाढ होणार आहे. जीएसटीमुळे पारदर्शकता वाढणार असून, त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. - मनीष गाडिया, सीए करात सुसूत्रता येणारदेशात जीएसटी लागू होणार हा मोठा बदल आहे. यामुळे देशातील आर्थिक समीकरणे बदलणार असून, त्याचा व्यवसायांवर नक्कीच फरक पडणार आहे, पण देशात जीएसटी लागू झाल्यावर करामध्ये सुसूत्रता येणार आहे. त्यामुळे व्यवहारातील, व्यवसायातील पारदर्शकता वाढणार आहे. - विजय शुक्ला, सहायक उपाध्यक्ष ‘लोकमत’देशाच्या विकासाचा वेग वाढणारजीएसटी आल्यामुळे देशाच्या विकासाचा वेग वाढण्यास मदत होईल. जीएसटीमुळे देशातील आर्थिक व्यवहारात होणाऱ्या बदलांविषयी जनजागृती करण्यासाठी, पश्चिम विभागाच्या आसीएआयतर्फे प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. ५०० पेक्षा अधिक शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. - विष्णू अग्रवाल, सीए (अध्यक्ष, वेस्टर्न रिजन आयसीएआय) जीएसटी लागू झाल्यावर सर्वच कर रद्द होणार नाहीत. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन (एक्साइस ड्युटी), पेट्रोलियम (एक्साइस, व्हॅट), बेसिक कस्टम ड्युटी हे केंद्राकडून आकारले जाणारे कर राहाणार आहेत. त्याचबरोबर, राज्याकडून आकारले जाणारे दारू, पेट्रोलियमवरील कर, स्टॅम्प ड्युटी, इलेक्ट्रिसिटी, प्रोफेशनल कर, रस्ते, ‘मिनरल’ आणि लोकलमध्ये प्रॉपर्टी, करमणूक कर आणि ग्रामपंचायतीचे स्थानिक कर राहाणार आहेत.