शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

देशात आर्थिक आणीबाणी

By admin | Updated: October 5, 2015 03:35 IST

देश व राज्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार दिवाळखोरीत गेले आहे. रिकामी तिजोरी भरण्याच्या उद्देशानेच आगाऊ आयकर भरणे

श्रीरामपूर : देश व राज्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार दिवाळखोरीत गेले आहे. रिकामी तिजोरी भरण्याच्या उद्देशानेच आगाऊ आयकर भरणे, जनधनसारख्या योजनांमधून लोकांच्या खिशातील पैसा काढण्याचे काम सुरू आहे. देशोदेशी फिरून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना विदेशी थेट गुंतवणूक आणण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यात यश न आल्याने देश व राज्यात आर्थिक आणीबाणी आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी केली.एका स्मृतीग्रंथाच्या प्रकाशननिमित्त ते येथे आले होते. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, येत्या अर्थसंकल्पापर्यंत राज्य सरकारला ३५ हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागणार आहे. डिसेंबरपासून राज्य दिवाळखोरीत जाण्याची शक्यता आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी ३ महिन्यांपूर्वी दिलेला आर्थिक आणीबाणीचा इशारा आता खरा होताना दिसत आहे.दुष्काळाबाबत पूर्वीच्या दोन्ही काँग्रेसवाल्यांना व आताच्या भाजपावाल्यांना काही देणेघेणे नाही. ओवेसींची मुस्लिमांना सुरक्षितता देण्याची मुस्लीम लीगची जुनीच भूमिका असून ती हिंदुत्ववाद्यांनाच तारक ठरेल, असे आंबेडकर म्हणाले. आदिवासी, नक्षलवादी, आंबेडकरवादी, ओबीसींचे संघटन एखाद्या घटनेत सहभागी दिसल्यास त्यांचे कोम्बिंग आॅपरेशन करून त्यांची चौकशी होते. त्याच धर्तीवर आता दाभोलकर-पानसरे हत्येचे धागेदोरे सनातन संस्थेपर्यंत पोहोचत असल्याने त्यांचे कोम्बिंग आॅपरेशन झाले पाहिजे. राज्याने न केल्यास कर्नाटक पोलीस येऊन ते करतील. ही नामुष्की ओढवू नये अशी दक्षता महाराष्ट्र पोलिसांनी घ्यावी, असा सल्लाही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.