शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

देशात आर्थिक आणीबाणी

By admin | Updated: October 5, 2015 03:35 IST

देश व राज्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार दिवाळखोरीत गेले आहे. रिकामी तिजोरी भरण्याच्या उद्देशानेच आगाऊ आयकर भरणे

श्रीरामपूर : देश व राज्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार दिवाळखोरीत गेले आहे. रिकामी तिजोरी भरण्याच्या उद्देशानेच आगाऊ आयकर भरणे, जनधनसारख्या योजनांमधून लोकांच्या खिशातील पैसा काढण्याचे काम सुरू आहे. देशोदेशी फिरून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना विदेशी थेट गुंतवणूक आणण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यात यश न आल्याने देश व राज्यात आर्थिक आणीबाणी आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी केली.एका स्मृतीग्रंथाच्या प्रकाशननिमित्त ते येथे आले होते. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, येत्या अर्थसंकल्पापर्यंत राज्य सरकारला ३५ हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागणार आहे. डिसेंबरपासून राज्य दिवाळखोरीत जाण्याची शक्यता आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी ३ महिन्यांपूर्वी दिलेला आर्थिक आणीबाणीचा इशारा आता खरा होताना दिसत आहे.दुष्काळाबाबत पूर्वीच्या दोन्ही काँग्रेसवाल्यांना व आताच्या भाजपावाल्यांना काही देणेघेणे नाही. ओवेसींची मुस्लिमांना सुरक्षितता देण्याची मुस्लीम लीगची जुनीच भूमिका असून ती हिंदुत्ववाद्यांनाच तारक ठरेल, असे आंबेडकर म्हणाले. आदिवासी, नक्षलवादी, आंबेडकरवादी, ओबीसींचे संघटन एखाद्या घटनेत सहभागी दिसल्यास त्यांचे कोम्बिंग आॅपरेशन करून त्यांची चौकशी होते. त्याच धर्तीवर आता दाभोलकर-पानसरे हत्येचे धागेदोरे सनातन संस्थेपर्यंत पोहोचत असल्याने त्यांचे कोम्बिंग आॅपरेशन झाले पाहिजे. राज्याने न केल्यास कर्नाटक पोलीस येऊन ते करतील. ही नामुष्की ओढवू नये अशी दक्षता महाराष्ट्र पोलिसांनी घ्यावी, असा सल्लाही अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.