शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

नेपाळमध्ये आर्थिक भूकंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 03:59 IST

‘प्रश्न फक्त आमच्या पैशाचा नाही, तर नेपाळी लोकांच्या भारतावरच्या विश्वासाचाही आहे !’

मेघना ढोके,

नाशिक - ‘प्रश्न फक्त आमच्या पैशाचा नाही, तर नेपाळी लोकांच्या भारतावरच्या विश्वासाचाही आहे !’ असं नेपाळच्या न्यूज स्पॉटलाईट मॅगझिनचे संपादक केशब पौडेल सांगत असतात तेव्हा त्यांच्या आवाजात आर्थिक संकटाचं मोठं भय जाणवतं, काही दिवसांपूर्वी धरणीकंप झाला होता तेव्हा जाणवत होतं तसंच!प्रश्न आहे नेपाळी माणसांच्या हाती असलेल्या भारतीय चलनाचा. नेपाळमध्ये एनएनसी अर्थात नेपाळी राष्ट्रीय चलन आणि आयएनसी अर्थात भारतीय राष्ट्रीय चलन अशा दोन्ही देशांच्या नोटांद्वारे व्यवहार होतात. नेपाळ-भारत सीमा खुली असल्यानं व्यापारउदीमसह पर्यटक, रुग्णालय आणि रोजंदारीसाठी भारतात येणाऱ्या नेपाळी माणसांची संख्या मोठी आहे. नेपाळ राष्ट्र बॅँकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, नेपाळमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांत एकूण ३.३६ कोटी रुपये आहेत. मात्र प्रत्यक्षात ही संख्या मोठी असेल; कारण बॅँकाकडे नोंद न होता होणाऱ्या रोखीच्या व्यवहारांची, घरात साठवल्या जाणाऱ्या नोटांची संख्या मोठी आहे.नेपाळी माणूस घरात मोठ्या रकमांच्या ज्या नोटा बचत म्हणून ठेवतो त्या भारतीय चलनातल्या असतात. त्यामुळे आजच्या घडीला बहुसंख्य नेपाळी माणसं हवालदिल झालेली आहेत. बचतीचं काय होणार, असा मोठा प्रश्न आहे. आणि या चलनाचं नियमन करणारी राष्टीय बँकही या प्रश्नाचं काही ठोस उत्तर देऊ शकत नाही. भारतीय सैन्याच्या गुरखा बटालियनमधून निवृत्त झालेले साठ हजार गुरखे नेपाळमध्ये आहेत. ते त्यांचं निवृत्तिवेतन भारतीय रुपयांत स्वीकारतात. त्यात भारतात शिकायला येणारे विद्यार्थीही बहुसंख्य आहेत. भारतात रोजीरोटी करून नेपाळमध्ये घरी जो पैसा पाठवला जातो तो भारतीय चलनातच पोहोचतो. नेपाळच्या आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी ८० टक्के व्यापार हा भारताबरोबर होतो. पैसा भारतीय चलनात स्वीकारला, वापरला जातो. त्यामुळे आपल्या पैशाचं काय होणार या विचारानं जनता आता नेपाळ सरकारला आणि राष्ट्र बॅँकेला धारेवर धरत आहे.>उपाय काय?देशांतर्गत दबाव वाढल्यानंच नेपाळ बॅँक आणि खुद्द पंतप्रधान प्रचंड यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांना दूरध्वनी करून या संकटातून मार्ग काढण्याची विनंती केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आता रिझर्व्ह बॅँकेच्या वतीने एक कृती दल नियुक्त करण्यात आलं असून, नेपाळी जनतेच्या नोटा कशा बदलता येतील याकामी मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.>नोटा बदलणार, पण...एका देशाचं चलन असं दुसऱ्या देशात बदलून देणं, त्यासाठीच्या आंतराष्ट्रीय वाटाघाटी आणि तोडगा हादेखील या काळात एक नवीन पायंडा असेल अशी शक्यता आहे. नेपाळी जनतेला आश्वस्त करण्यात आलं आहे की, तुमच्या नोटा बदलून देऊ, पण ते कसं यासाठीची माहिती मात्र अजून उपलब्ध झालेली नाही.>आमच्यासाठी भारतीय नोटा म्हणजे सुरक्षिततेची हमी आणि भविष्याची तरतूद आहे. त्याच रद्द झाल्यानं हतबलता आहेच, पण आता त्याच्यासमोर आयुष्यभराच्या पुंजीचा प्रश्न आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न आहे, भारतावरच्या विश्वासाचा. - केशब पौडेल, संपादक, न्यूज स्पॉटलाईट मॅगझिन, काठमांडू