शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

नेपाळमध्ये आर्थिक भूकंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 03:59 IST

‘प्रश्न फक्त आमच्या पैशाचा नाही, तर नेपाळी लोकांच्या भारतावरच्या विश्वासाचाही आहे !’

मेघना ढोके,

नाशिक - ‘प्रश्न फक्त आमच्या पैशाचा नाही, तर नेपाळी लोकांच्या भारतावरच्या विश्वासाचाही आहे !’ असं नेपाळच्या न्यूज स्पॉटलाईट मॅगझिनचे संपादक केशब पौडेल सांगत असतात तेव्हा त्यांच्या आवाजात आर्थिक संकटाचं मोठं भय जाणवतं, काही दिवसांपूर्वी धरणीकंप झाला होता तेव्हा जाणवत होतं तसंच!प्रश्न आहे नेपाळी माणसांच्या हाती असलेल्या भारतीय चलनाचा. नेपाळमध्ये एनएनसी अर्थात नेपाळी राष्ट्रीय चलन आणि आयएनसी अर्थात भारतीय राष्ट्रीय चलन अशा दोन्ही देशांच्या नोटांद्वारे व्यवहार होतात. नेपाळ-भारत सीमा खुली असल्यानं व्यापारउदीमसह पर्यटक, रुग्णालय आणि रोजंदारीसाठी भारतात येणाऱ्या नेपाळी माणसांची संख्या मोठी आहे. नेपाळ राष्ट्र बॅँकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, नेपाळमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांत एकूण ३.३६ कोटी रुपये आहेत. मात्र प्रत्यक्षात ही संख्या मोठी असेल; कारण बॅँकाकडे नोंद न होता होणाऱ्या रोखीच्या व्यवहारांची, घरात साठवल्या जाणाऱ्या नोटांची संख्या मोठी आहे.नेपाळी माणूस घरात मोठ्या रकमांच्या ज्या नोटा बचत म्हणून ठेवतो त्या भारतीय चलनातल्या असतात. त्यामुळे आजच्या घडीला बहुसंख्य नेपाळी माणसं हवालदिल झालेली आहेत. बचतीचं काय होणार, असा मोठा प्रश्न आहे. आणि या चलनाचं नियमन करणारी राष्टीय बँकही या प्रश्नाचं काही ठोस उत्तर देऊ शकत नाही. भारतीय सैन्याच्या गुरखा बटालियनमधून निवृत्त झालेले साठ हजार गुरखे नेपाळमध्ये आहेत. ते त्यांचं निवृत्तिवेतन भारतीय रुपयांत स्वीकारतात. त्यात भारतात शिकायला येणारे विद्यार्थीही बहुसंख्य आहेत. भारतात रोजीरोटी करून नेपाळमध्ये घरी जो पैसा पाठवला जातो तो भारतीय चलनातच पोहोचतो. नेपाळच्या आंतरराष्ट्रीय व्यापारापैकी ८० टक्के व्यापार हा भारताबरोबर होतो. पैसा भारतीय चलनात स्वीकारला, वापरला जातो. त्यामुळे आपल्या पैशाचं काय होणार या विचारानं जनता आता नेपाळ सरकारला आणि राष्ट्र बॅँकेला धारेवर धरत आहे.>उपाय काय?देशांतर्गत दबाव वाढल्यानंच नेपाळ बॅँक आणि खुद्द पंतप्रधान प्रचंड यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांना दूरध्वनी करून या संकटातून मार्ग काढण्याची विनंती केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आता रिझर्व्ह बॅँकेच्या वतीने एक कृती दल नियुक्त करण्यात आलं असून, नेपाळी जनतेच्या नोटा कशा बदलता येतील याकामी मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.>नोटा बदलणार, पण...एका देशाचं चलन असं दुसऱ्या देशात बदलून देणं, त्यासाठीच्या आंतराष्ट्रीय वाटाघाटी आणि तोडगा हादेखील या काळात एक नवीन पायंडा असेल अशी शक्यता आहे. नेपाळी जनतेला आश्वस्त करण्यात आलं आहे की, तुमच्या नोटा बदलून देऊ, पण ते कसं यासाठीची माहिती मात्र अजून उपलब्ध झालेली नाही.>आमच्यासाठी भारतीय नोटा म्हणजे सुरक्षिततेची हमी आणि भविष्याची तरतूद आहे. त्याच रद्द झाल्यानं हतबलता आहेच, पण आता त्याच्यासमोर आयुष्यभराच्या पुंजीचा प्रश्न आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न आहे, भारतावरच्या विश्वासाचा. - केशब पौडेल, संपादक, न्यूज स्पॉटलाईट मॅगझिन, काठमांडू