शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

इको टुरिझमच्या विकास निधी वाटपात विदर्भाला डावलले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:29 IST

साडेआठ कोटींपैकी गडचिरोलीसाठी केवळ ८३ लाखाचा निधी

संजय खांडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी इको टुरिझम योजनेंतर्गत महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाने ८ कोटी ३५ लाख २८ हजार निधी खर्चास मान्यता दिली. साठेआठ कोटीपैकी फक्त ८३ लाख ७५ हजारांचा निधी विदर्भातील गडचिरोलीच्या वर्धम फॉसिल पार्कसाठी दिला गेला असून, इतर निधी नाशिक, सातारा, अहमदनगर आणि पुण्याकडे पळविण्यात आला आहे. विदर्भात इको टुरिझमचे ५२ केंद्र असतानादेखील निधी वाटपात विदर्भाला डावलले गेल्याचे वृत्त आहे.वन्य जीवांचे जीवनचक्र अबाधित ठेवण्यासोबतच, इको टुरिझम राज्य योजनेंतर्गत वनक्षेत्रातील पर्यटनस्थळांचा विकास व्हावा, ज्या सुविधा या ठिकाणी नसतील त्या देण्यासाठी उपाययोजना करावी यासाठी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ कार्यरत आहे. बालोद्यान सुशोभीकरण, निरीक्षण मनोरा, माहिती फलक, निसर्गपूरक साहित्यांचादेखील यामध्ये समावेश आहे. मात्र बहुतेक ठिकाणी धार्मिक स्थळांनाच पर्यटन केंद्र दाखवून इको टुरिझमचा निधी वळविला गेला आहे. अनेक ठिकाणी पायऱ्या, कुं पण, डागडुजी दाखविली गेली आहे. राज्य पर्यटन मंडळ, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली गठित झालेल्या कार्यकारी समितीने २०१७-१८ या वर्षांसाठी ८३ लाख ७५ हजारांच्या उपनिधी खर्चास मान्यता दिली. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम, भंडारा, गोंदिया येथील ११ जिल्ह्यांत निसर्ग पर्यटनाचे ५२ केंद्र आहे. मात्र ११ जिल्ह्यांपैकी केवळ गडचिरोलीस ८३ लाखांचा निधी देऊन मंडळाने बोळवण केली आहे. मुख्यमंत्री विदर्भाचे, पर्यटन मंडळ विदर्भाचे असतानाही विदर्भातील जिल्ह्यांना निधी वाटपात डावलले गेल्याने नेत्यांविरुद्ध रोष व्यक्त होत आहे.असे झाले निधीचे वाटप ...नाशिकच्या ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रासाठी ३ कोटी ६७ लाख,२२ हजार, सातारा येथील चंदन-वंदनसाठी १ कोटी २७ लाख, ५० हजार, अहमदनगर येथील येडूआई देवस्थान पिंपळदरीसाठी १ कोटी ११ लाख ८४ हजार, गडचिरोली येथील वर्धम फॉसिल पार्कसाठी ८३ लाख ७५ हजार, पुणे येथील पिंपळगाव वनउद्यानासाठी ७० लाख ३४ हजार, औरंगाबाद येथील अजिंठा वनउद्यानासाठी ३१ लाख ७९ हजार, धुळे येथील तोरणमाळसाठी २५ लाख आणि सोलापूरच्या खुडूससाठी १७ लाख ८४ हजार रुपये मंजूर झाले आहेत.२०१० मध्ये मोर्णा धरणाजवळ १२ इको टुरिझमला मंजुरी देऊन १ कोटी २० लाखांची तरतूद करण्यात आली होती. या वर्षीसुद्धा १ कोटीची तरतूद करण्यात आली; मात्र अकोल्यासह विदर्भातील दहा जिल्ह्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहे. याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना याबाबत अवगत करण्यात आले आहे.-डॉ. जगन्नाथ ढोणे, माजी आमदार, अकोला.