शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत नळ जोडण्यांचे ग्रहण

By admin | Updated: April 30, 2016 02:47 IST

दक्षिण शहापाडा योजना बासनात गुंडाळल्यानंतर मौजे पाटणसई ते डोलवी अशा नागोठणे ते पेण दरम्यानच्या ४५ गावांना जेएसडब्ल्यू कंपनीकडून गेली २० वर्षे मोफत पाणी देण्यात येत आहे.

पेण : दक्षिण शहापाडा योजना बासनात गुंडाळल्यानंतर मौजे पाटणसई ते डोलवी अशा नागोठणे ते पेण दरम्यानच्या ४५ गावांना जेएसडब्ल्यू कंपनीकडून गेली २० वर्षे मोफत पाणी देण्यात येत आहे. मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या असंख्य अनधिकृत नळ जोडण्या करण्यात आल्या आहेत. आणि व्यावसायिक वापरासाठी या पाण्याचा उपयोग होत असल्याने सामान्य नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. जोपर्यंत संबंधित बेकायदेशीर नळजोडण्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत पाणीगळतीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने अवैधरीत्या असलेल्या नळजोडण्यांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पेणच्या दक्षिण भागाकडील ही ४५ गावे जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासनाच्या मोफत पाणी योजनेचे उत्तरदायित्व म्हणून या पट्ट्यात येणाऱ्या ग्रामपंचायती व त्यांचे सरपंच मंडळीनी या अनधिकृत नळ जोडण्या केलेल्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. थेंब थेंब जपून वापरा असे शासनाने महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीमुळे प्रत्येक ग्रामपंचायतीला आवाहन केले आहे. इथे मात्र कंपनी प्रशासनाला न जुमानता राजरोसपणे अनधिकृत नळ कनेक्शनधारकांची दंडेली वाढलेली आहे. या नळ जोडण्यांतून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र त्यासाठी जेएसडब्ल्यू प्रशासनाला धरुन पाण्यासाठी बोंबाबोंब करण्यात येते. फुटलेल्या पाइप लाइनची दुरुस्ती वेळोवेळी कंपनी व्यवस्थापन करते. तरीही पुन्हा पुन्हा हीच परिस्थिती उद्भवते, या अनधिकृत नळ कनेक्शन जोडण्यांना प्रतिबंध घालण्यास ग्रामपंचायतीने अद्याप एकदाही पुढाकार घेतलेला नाही. सर्वांनी एकमताने निर्णय घेतल्यास समस्येचे निराकरण होऊ शकते. या पट्ट्यात वीटभट्टी, हॉटेल व्यावसायिक आदींना अनधिकृत नळकनेक्शनद्वारे पाणी उपसा प्रचंड होत आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी याबाबत दक्षता घेऊन अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. आरोग्य पथकाकडून तपासणीतक्र ारीनंतर कर्जत येथून पाणी तपासणी करणारे पथक कोल्हारे येथे पोहचले. त्यांनी पाणी उचलले जात असलेल्या उल्हास नदीवरील उद्भव ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी नदीमधून पाणी उचलले जात असताना कोणत्याही पाणी साठवण टाकी किंवा जलकुंभामध्ये भरले जात नसल्याचे समोर आले.नदीतील पाणी थेट नळ पाणी योजनेच्या पाइपमधून वितरीत केले जात आहे. त्यामुळे पाणी शुद्ध करून घेण्याचा कोणताही प्रयत्न कोल्हारे नळपाणी योजना पाहणारी यंत्रणा करीत नसल्याचे दिसून आले आहे.>कोल्हारेत नळपाणी योजनेच्या पाण्याचे परीक्षण नेरळ : कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीमधील कोल्हारे गावाच्या पाणी योजनेतून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याचा मुद्दा ग्रामस्थ आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विजय हजारे यांनी उपस्थित केला आहे. नळपाणी योजनेतून येणारे पाण्याची तपासणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आरोग्य पथकाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असल्याची माहिती हजारे यांनी दिली आहे.मात्र कर्जत येथून आलेल्या पाणी तपासणी पथकासमोर अनेक धक्कादायक प्रकार आले आहेत.भारत निर्माण योजनेतून तयार करण्यात आलेल्या नळपाणी योजनेमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणा अंतर्भूत नाही. त्यामुळे पाण्याचा उद्भव असलेल्या उल्हास नदीच्या काठावर विहीर खोदून त्यात पंप टाकून पाणी उपसा करून ते पाणी वितरीत केले जाते. मात्र विहिरीत परिसरातील सांडपाणी झिरपत असल्याने कोल्हारे, बोपेले, आणि रामकृष्ण नगर भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व भागाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याने या पाण्याचे तपासणी करण्याची मागणी हजारे यांनी केली आहे. कर्जत पंचायत समिती तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे याबाबत तक्र ारही केली आहे. ग्रामस्थ आणि रहिवाशी यांना शुद्ध पाणी मिळावे या हेतूने कोल्हारे नळपाणी योजनेचे पाणी तपासणी करण्यासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविले आहे. आरोग्य केंद्राच्या पथकाने पाण्याचे नमुने घेऊन ते अलिबाग येथे तपासणी पाठविले आहेत. ज्याठिकाणाहून हे पाणी येते, त्याठिकाणी अनेकदा जनावरे डुंबत असतात.