शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

टेकड्यांवरील हिरवळीला बीडीपी बांधकामांचे ग्रहण

By admin | Updated: August 22, 2016 00:47 IST

पालिका हद्दीत आलेल्या २३ गावांमधील टेकड्या वाचविण्यासाठी त्यावर बीडीपीचे (बायो डायव्हर्सिटी पार्क- जैवविविधता उद्यान) आरक्षण टाकण्यात आले

पुणे : पालिका हद्दीत आलेल्या २३ गावांमधील टेकड्या वाचविण्यासाठी त्यावर बीडीपीचे (बायो डायव्हर्सिटी पार्क- जैवविविधता उद्यान) आरक्षण टाकण्यात आले, मात्र यातील बहुसंख्य जागा बांधकाम व्यावसायिकांनी घेतल्या असून, तिथे बांधकामांना परवानगी मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच या जागांवर किमान ८ टक्के बांधकामाला परवानगी देण्याच्या विचाराप्रत सरकार आले असल्याचे समजते. त्यातून या टेकड्यांवरची हिरवाई नष्ट होण्याचा धोका आहे.पालिकेत समाविष्ट झालेल्या या गावांमधील टेकड्या वाचाव्यात, त्यावरची हिरवाई नष्ट होऊ नये यासाठी विकास आराखड्यात एकूण १ हजार ६०० हेक्टरवर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले. त्यापैकी ७०० हेक्टर जमीन वन खात्याच्या म्हणजे सरकारी मालकीची आहे. ९०० हेक्टर जमीन खासगी मालकीची आहे. त्यापैकी किमान ३०० हेक्टर जागेवर आताच निवासी स्वरूपाचे बांधकाम आहे. साधारण ६० हजार घरे असतील असा अंदाज आहे. ही बांधकाम राहू द्यावीत, नव्याने कोणत्याही बांधकामाला परवानगी देऊ नये असा निर्णय झालेला आहे. मात्र त्याला अनेकांचा विरोध असून, त्यात प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. आरक्षण पडलेल्या जागांपैकी बहुतेक जागा काही बांधकाम व्यावसायिकांनी मूळ मालकांकडून विकत घेतल्या आहेत. तिथे त्यांना टाऊनशिप सुरू करायच्या आहेत. बीडीपीचे आरक्षण पडल्यामुळे आता त्यांना ते शक्य नाही. या बांधकाम व्यावसायिकांपैकी काही मोठा राजकीय वरदहस्त असलेले आहेत, तर काही स्वत:च राजकारणात आहेत. या बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम साहित्याचा पुरवठा करणारेही काही जण आहेत. नगरसेवक किंवा राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचाही त्यात समावेश आहे. आरक्षणामुळे या सर्वांचेच मोठे आर्थिक नुकसान होत आहे. एकत्रितपणे राज्य सरकारवर दबाव टाकून आरक्षित जागांवर किमान ८ टक्के बांधकामाला परवानगी मिळावी असा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी पुण्यातील फक्त भाजपा आमदारांची विकास आराखड्याच्या संदर्भात बैठक घेतली. त्यात काही आमदारांनी बीडीपी आरक्षित टेकड्यांवर ८ टक्के बांधकामाला परवानगी द्यावी अशी सूचना केली आहे. महाबळेश्वरसारख्या ठिकाणी बांधकामे होत असतील तर पुण्यात का नको, तिथे साडेबारा टक्के बांधकामाला परवानगी आहे, तर पुण्यात किमान ८ टक्के बांधकामाला परवानगी द्यावी, असा मुद्दा या बैठकीत उपस्थित केला गेला. त्यावर विचार सुरू असल्याचे समजते.>सरकारदरबारी असे प्रयत्न सुरू असतानाच या आरक्षित भूखंडांवर काही ठिकाणी बांधकामे सुरूही करण्यात आली आहेत. आरक्षण असले तरी या भूखंडांच्या सातबाऱ्याच्या उताऱ्यावर ते अद्याप लागलेले नाही. त्यावर मूळ मालकाची किंवा ज्या बांधकाम व्यावसायिकाने जागा विकत घेतली त्यांची नावे आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या बांधकामाला आडकाठी नाही. बांधकाम विभागाशी साटेलोटे करून काही ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात येत आहे. जुनी बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय झाला तर त्याचा फायदा व्हावा असा विचार यामागे आहे.>सध्या आहेत त्या बांधकामांपैकी परवानगी घेऊन केलेली बांधकामे अधिकृत करावीत व नव्याने एकाही बांधकामाला परवानगी देऊ नये असा यासंदर्भात यापूर्वीच्या सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आहे. तो दुर्लक्षित करून सध्याच्या सरकारने पुण्याच्या निसर्गाची हानी करू नये.- अ‍ॅड. वंदना चव्हाण, खासदार