शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

अंतराळातून आला ‘इबोला’?

By admin | Updated: January 14, 2015 01:12 IST

जगात ‘इबोला’ तसेच इतर काही नवीन पण भयंकर रोगांमुळे दहशत आहे. याबाबत वैद्यकशास्त्राप्रमाणेच खगोलशास्त्राच्या दृष्टीनेदेखील जगभरात अभ्यास सुरू आहे. अंतराळातून धुमकेतू किंवा

संशोधकांचा अभ्यास सुरू : नारळीकरांच्या ‘क्लास’ने विद्यार्थी ‘इन्स्पायर’ नागपूर : जगात ‘इबोला’ तसेच इतर काही नवीन पण भयंकर रोगांमुळे दहशत आहे. याबाबत वैद्यकशास्त्राप्रमाणेच खगोलशास्त्राच्या दृष्टीनेदेखील जगभरात अभ्यास सुरू आहे. अंतराळातून धुमकेतू किंवा अशनीच्या माध्यमातून या रोगांचे जीवाणू पृथ्वीवर आले का याबाबत संशोधकांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे. सध्या ही केवळ शक्यता असली तर अभ्यासाअंती वेगळा निष्कर्ष बाहेर निघण्याची बाब नाकारता येत नाही, अशी माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांनी दिली. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे प्रायोजित व शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘इन्स्पायर’ या विज्ञान शिबिरात नारळीकरांनी विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.Þडॉ. नारळीकर यांनी खगोलशास्त्राच्या इतिहासापासून ते भविष्यात होऊ शकणाऱ्या घडामोडींपर्यंत निरनिराळ्या मुद्यांवर प्रकाश टाकला. इतर वैज्ञानिक शाखा पृथ्वीपर्यंत मर्यादित आहेत तर खगोलशास्त्राची झेप पृथ्वीबाहेर पसरलेल्या अमाप विश्वापर्यंत आहे. न्यूटनचा नियम पृथ्वीबाहेर कोट्यवधी किलोमीटरपर्यंत लागू होतो हे विधान फक्त खगोलशास्त्रच करू शकतो. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावण्याचे श्रेय सर आयझॅक न्यूटन यांना देण्यात येते.परंतु केवळ सफरचंद त्यांच्या डोक्यावर पडले म्हणून हा शोध लागला नाही. तर त्याअगोदर होऊन गेलेले खगोलशास्त्रज्ञ व अभ्यासक टायको व केपलर यांच्या अभ्यासातून समोर आलेल्या बाबींवर हे प्रमेय मांडण्यात आले होते असे डॉ.नारळीकर यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेंद्र बुरघाटे हे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. अशोक बंड यांनी संचालन केले.२१२६ वर्षात पृथ्वीला धोकाखगोलशास्त्रातूनच पृथ्वीवर भविष्यात येणाऱ्या धोक्यांबद्दल भाकीत करणे शक्य झाले आहे. ‘स्विफ्ट टटल’ नावाचा धूमकेतूची २० आॅगस्ट २१२६ रोजी पृथ्वीशी टक्कर होऊ शकते, असे अभ्यासातून समोर आले आहे. परंतु अद्याप याला बराच वेळ आहे. त्यामुळे त्याचा मार्गात बदल होऊ शकतो. याबाबत निश्चित भाष्य या घटनेच्या काही वर्ष अगोदरच करता येणे शक्य आहे. या अभ्यासात खगोलशास्त्राचीच महत्त्वाची भूमिका राहणार आहे, असे डॉ.नारळीकर म्हणाले. अंतराळातून ऊर्जा घेणे शक्यआज ज्या पद्धतीने ऊर्जेचा वापर होत आहे ते पाहता ऊर्जानिर्मितीसाठी नवीन पर्याय शोधणे क्रमप्राप्त झाले आहे. अंतराळात मोठमोठाले भिंग स्थापित करून सौरप्रकाश जास्त प्रमाणात पृथ्वीकडे वळवून ऊर्जानिर्मिती करणे शक्य आहे. परंतु याचा खर्च प्रचंड असल्याने सद्यस्थितीत कुठल्याही देशाने याकरिता पुढाकार घेतलेला नाही या त्यांनी दिलेल्या माहितीमुळे उपस्थित आश्चर्यचकित झाले. गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका, युरोप, जपान या देशांनी अत्याधुनिक टेलिस्कोप असणाऱ्या वेधशाळा उभारल्या आहेत. रेखांशावरील स्थान लक्षात घेता भारतातदेखील अशी वेधशाळा उभारण्यास अमेरिकेने सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी महाराष्ट्रातील नांदेड, राजस्थान आणि मध्य प्रदेश ही ठिकाणे योग्य आहेत. यातील एकाची निवड करण्यासाठी संंबंधित प्रस्तावाला केंद्र सरकारकडे चर्चेसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. नारळीकर यांनी दिली.(प्रतिनिधी)