शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

फळे खा; पण बिया द्या!

By admin | Updated: July 31, 2016 04:14 IST

दोन महिन्यांत ४ कोटी ४० लाख फळबिया वृक्षारोपणासाठी जमा करण्यात आल्या आहेत.

मारोती जुंबडे,

परभणी- जिल्ह्याला भेडसावणाऱ्या दुष्काळाच्या दृष्टचक्रातून मुक्त करण्यासाठी नाम फाऊंडेशनच्या पुढाकारातून ‘फळे तुम्ही खा, बिया आम्हाला द्या’ या उपक्रमांतर्गत दोन महिन्यांत ४ कोटी ४० लाख फळबिया वृक्षारोपणासाठी जमा करण्यात आल्या आहेत. त्यामधील ४ लाख बियांचे वृक्षारोपणही कृषीभूषण कांतराव देशमुख यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. नाम फाऊंडेशनचे कृषी विभागप्रमुख कांतराव देशमुख झरीकर यांनी आपल्या कल्पनेतून दोन महिन्यांपूर्वी ‘फळे तुम्ही खा, बिया आम्हाला द्या’ हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यांच्या या आवाहनाला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. पुण्यातील या कार्यक्रमातून दोन टन बिया आयोजकांनी एकत्र करून या उपक्रमास दिल्या. तेव्हापासून शाळा, महाविद्यालय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थितांना बिया देण्याचे आवाहन केले. आतापर्यंत विविध ठिकाणाहून ४ कोटी ४० लाख फळ बिया जमा झाल्या आहेत. यामध्ये सीताफळ, पेरू, सफरचंद, आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी आदी फळबियांचा समावेश आहे. यामधील ४ लाख बियांचे झरी परिसरात जलयुक्त शिवारच्या करण्यात आलेल्या कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. >असे झाले मोजमापजिथे-जिथे आवाहन केले तेथून फळबियांची आवक सुरू झाली. आलेल्या बियांचा हिशोब कसा ठेवायचा? हा प्रश्न समोर असताना एका किलोमध्ये किती बिया बसतात हे सर्व प्रथम पाहण्यात आले. या मोजमापात एका किलोमध्ये २ हजार ५० बिया जमल्यानंतर यावर पुढचा अंदाज लावण्यात आला.