शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

फळे खा; पण बिया द्या!

By admin | Updated: July 31, 2016 04:14 IST

दोन महिन्यांत ४ कोटी ४० लाख फळबिया वृक्षारोपणासाठी जमा करण्यात आल्या आहेत.

मारोती जुंबडे,

परभणी- जिल्ह्याला भेडसावणाऱ्या दुष्काळाच्या दृष्टचक्रातून मुक्त करण्यासाठी नाम फाऊंडेशनच्या पुढाकारातून ‘फळे तुम्ही खा, बिया आम्हाला द्या’ या उपक्रमांतर्गत दोन महिन्यांत ४ कोटी ४० लाख फळबिया वृक्षारोपणासाठी जमा करण्यात आल्या आहेत. त्यामधील ४ लाख बियांचे वृक्षारोपणही कृषीभूषण कांतराव देशमुख यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. नाम फाऊंडेशनचे कृषी विभागप्रमुख कांतराव देशमुख झरीकर यांनी आपल्या कल्पनेतून दोन महिन्यांपूर्वी ‘फळे तुम्ही खा, बिया आम्हाला द्या’ हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यांच्या या आवाहनाला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. पुण्यातील या कार्यक्रमातून दोन टन बिया आयोजकांनी एकत्र करून या उपक्रमास दिल्या. तेव्हापासून शाळा, महाविद्यालय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थितांना बिया देण्याचे आवाहन केले. आतापर्यंत विविध ठिकाणाहून ४ कोटी ४० लाख फळ बिया जमा झाल्या आहेत. यामध्ये सीताफळ, पेरू, सफरचंद, आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी आदी फळबियांचा समावेश आहे. यामधील ४ लाख बियांचे झरी परिसरात जलयुक्त शिवारच्या करण्यात आलेल्या कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. >असे झाले मोजमापजिथे-जिथे आवाहन केले तेथून फळबियांची आवक सुरू झाली. आलेल्या बियांचा हिशोब कसा ठेवायचा? हा प्रश्न समोर असताना एका किलोमध्ये किती बिया बसतात हे सर्व प्रथम पाहण्यात आले. या मोजमापात एका किलोमध्ये २ हजार ५० बिया जमल्यानंतर यावर पुढचा अंदाज लावण्यात आला.