शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

दुष्काळी भागातील साखर कारखान्यांना सुलभ कर्ज

By admin | Updated: May 5, 2016 01:29 IST

मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांसह अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील साखर कारखान्यांना सुलभ कर्ज (सॉफ्ट लोन) देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री

मुंबई : मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांसह अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील साखर कारखान्यांना सुलभ कर्ज (सॉफ्ट लोन) देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या प्रश्नांसंबंधात आज महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या शिष्टमंडळासमवेत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात विशेषत: संपूर्ण मराठवाडा, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दुष्काळी परिस्थितीमुळे फार मोठ्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील कारखान्यांचा संचित तोटा वाढलेला आहे. हे लक्षात घेऊन तेथील साखर कारखान्यांना सुलभ कर्ज देण्याबाबत विचार करण्यात येईल. साखर कारखान्यांच्या साखर निर्यात धोरणाचा फेरविचार करणे, नवीन व नवीकरणीय ऊर्जास्त्रोत या धोरणातंर्गत उसाच्या चिपाडापासून सहवीज निर्मितीचे उद्दिष्ट एक हजार मेगावॅटपर्यंत वाढविणे आणि वीज खरेदी करार करून हे प्रकल्प पूर्ण करणे, राज्यातील ठिबक व तुषार सिंचन योजनेच्या सध्याच्या धोरणाबाबत विचार करु न सुधारित धोरण राबविणे हे सर्व मुद्दे तपासून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, आ. अजित पवार, आ. दिलीप वळसे पाटील, आ. जयंत पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आबासाहेब पाटील, प्रकाश आवाडे, जयप्रकाश दांडेगावकर आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)- केंद्र शासनाने इथेनॉल मिश्रण धोरण अंमलात आणले आहे. नवी मुंबईच्या हद्दीत वाशी येथील आॅईल डेपोसाठी इथेनॉलवर ३ टक्के आणि मिरज येथील आॅईल कंपनीच्या डेपोसाठी ५ टक्के प्रमाणे एलबीटी द्यावा लागत असून याबाबत राज्य शासन अभ्यास करु न निर्णय घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.