शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भात १९४२ गावांना टंचाईच्या झळा!

By admin | Updated: April 13, 2015 05:07 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात नागपूर विभागात सध्या पाणीटंचाईची झळ जाणवत नसली तरी आगामी काळात पाणीटंचाई भीषण होण्याची शक्यता आहे़

नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात नागपूर विभागात सध्या पाणीटंचाईची झळ जाणवत नसली तरी आगामी काळात पाणीटंचाई भीषण होण्याची शक्यता आहे़ अमरावती विभागाचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही़ चार गावांमध्ये ७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर ६ तालुक्यांमध्ये पाणीपातळीत घट झाली आहे.सहा जिल्ह्यांतील १९४२ गावे आणि ११ वाड्यांना टंचाईसदृश घोषित करण्यात आले आहे. नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये फक्त ३२ टक्के तर अमरावती जिल्ह्यात ३६.५२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. विभागातील काही जिल्ह्यांची भूजल पातळी घटली, तर काही जिल्ह्यांत वाढली आहे. सध्या विभागात फक्त नागपूर जिल्ह्यातील २ गावांत ३ टँकर सुरू आहेत. मागील वर्षी या काळात एकही टँकर सुरू झाला नव्हता. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांतील १९४२ गावांमध्ये टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत़ तसेच ६३ तालुक्यांत भूजल पातळी खोल गेली आहे. त्यापैकी ३९ तालुक्यांत ० ते १ मीटर, २ तालुक्यांत १ ते २ मीटर, एका तालुक्यात २ ते ३ मीटर तर उर्वरित तालुक्यांमध्ये यापेक्षा अधिक घट आहे. नागपूर विभागात ४० मध्यम प्रकल्प आहेत. त्यात १३ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी ३१ टक्के होता. या वर्षी ७४ एमएलडी साठा आहे. २०१४मध्ये १७० एमएलडी, २०१३मध्ये १०३ एमएलडी पाणीसाठा होता.