शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू
2
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
3
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
4
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
5
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
6
"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल
7
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
8
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
9
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
10
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
11
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
12
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
13
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
14
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
15
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
16
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
17
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
18
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
19
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
20
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट

किल्लारीसह ३८ गावांना भूकंपाचा सौम्य धक्का

By admin | Published: January 11, 2017 10:35 PM

लातूरमधील औसा तालुक्यातील किल्लारीसह उस्मानाबाद जिल्ह्यातील ३८ हून अधिक गावांना बुधवारी रात्री ८.३९ वाजता भूकंपाचा १.८ रिश्टर स्केलचा धक्का बसला.

ऑनलाइन लोकमत
किल्लारी (जि. लातूर), दि. 11 - लातूरमधील औसा तालुक्यातील किल्लारीसह उस्मानाबाद जिल्ह्यातील ३८ हून अधिक गावांना बुधवारी रात्री ८.३९ वाजता भूकंपाचा १.८ रिश्टर स्केलचा धक्का बसला. यामुळे नागरिकांत घबराहट पसरली आहे. दोन महिन्यानंतर पुन्हा भूकंपाचा धक्का बसला आहे. यावेळच्या भूकंपाचा धक्का सौम्य असला तरी, लातूर जिल्ह्यातील २६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ गावांना भूंकपाने हलविले.
औसा तालुक्यातील किल्लारीसह परिसरातील किल्लारीवाडी, येवळट, सिरसल, तळणी, गुबाळ, मंगरुळ,  पारधेवाडी, बाणेगाव, गांजणखेडा, नांदुर्गा, हासलगण, लोहटा, लिंबाळा, एकोजी मुदगड, कारला, वानेवाडी, कार्ला, नदी हत्तरगा, सांगवी, चिंचोली जोगन, कोकळगाव, सरवडी, कवठा, हरेगाव आदीं तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर, माकणी, लोहारा, उमरगा, नारंगवाडी, पेटसांगवी, हिप्परगासह परिसरातील जवळपास १२  हून अधिक गावांना बुुधवारी रात्री ८.३९ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला. सध्या थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात शेकोट्या पेटविल्या जात आहेत. दरम्यान, रात्री बुधवारी रात्री ८.३९ वाजता भूगर्भातून आवाज आल्याने नागरिकांनी घाबरुन घराबाहेर पळ काढला. 
दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर या परिसराला पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्याने किल्लारीसह परिसरातील गावकरी आपल्या लेकरांबाळांसह रस्त्यावर आले. हा धक्का १.८  रिश्टर स्केलचा असल्याचे तहसिलदार अहिल्या गाठाळ यांनी सांगितले.
 
जीवित, वित्तहानी नाही...
किल्लारीसह परिसरातील जवळपास १७ गावांना बुधवारी रात्री बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. भूकंपप्रवण क्षेत्रातील गावांची माहिती घेण्याचे आदेश अधिका-यांना देण्यात आले आहेत. असे तहसिलदार अहिल्या गाठाळ यांनी माहिती घेण्याचे आदेश अधिका-यांना दिले आहेत. प्रशासनाकडे अद्याप कुठल्याही नुकसानीची माहिती प्राप्त झाली नाही, असेही त्या म्हणाल्या.