शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

किल्लारीसह ३८ गावांना भूकंपाचा सौम्य धक्का

By admin | Updated: January 11, 2017 22:35 IST

लातूरमधील औसा तालुक्यातील किल्लारीसह उस्मानाबाद जिल्ह्यातील ३८ हून अधिक गावांना बुधवारी रात्री ८.३९ वाजता भूकंपाचा १.८ रिश्टर स्केलचा धक्का बसला.

ऑनलाइन लोकमत
किल्लारी (जि. लातूर), दि. 11 - लातूरमधील औसा तालुक्यातील किल्लारीसह उस्मानाबाद जिल्ह्यातील ३८ हून अधिक गावांना बुधवारी रात्री ८.३९ वाजता भूकंपाचा १.८ रिश्टर स्केलचा धक्का बसला. यामुळे नागरिकांत घबराहट पसरली आहे. दोन महिन्यानंतर पुन्हा भूकंपाचा धक्का बसला आहे. यावेळच्या भूकंपाचा धक्का सौम्य असला तरी, लातूर जिल्ह्यातील २६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ गावांना भूंकपाने हलविले.
औसा तालुक्यातील किल्लारीसह परिसरातील किल्लारीवाडी, येवळट, सिरसल, तळणी, गुबाळ, मंगरुळ,  पारधेवाडी, बाणेगाव, गांजणखेडा, नांदुर्गा, हासलगण, लोहटा, लिंबाळा, एकोजी मुदगड, कारला, वानेवाडी, कार्ला, नदी हत्तरगा, सांगवी, चिंचोली जोगन, कोकळगाव, सरवडी, कवठा, हरेगाव आदीं तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर, माकणी, लोहारा, उमरगा, नारंगवाडी, पेटसांगवी, हिप्परगासह परिसरातील जवळपास १२  हून अधिक गावांना बुुधवारी रात्री ८.३९ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला. सध्या थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात शेकोट्या पेटविल्या जात आहेत. दरम्यान, रात्री बुधवारी रात्री ८.३९ वाजता भूगर्भातून आवाज आल्याने नागरिकांनी घाबरुन घराबाहेर पळ काढला. 
दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर या परिसराला पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्याने किल्लारीसह परिसरातील गावकरी आपल्या लेकरांबाळांसह रस्त्यावर आले. हा धक्का १.८  रिश्टर स्केलचा असल्याचे तहसिलदार अहिल्या गाठाळ यांनी सांगितले.
 
जीवित, वित्तहानी नाही...
किल्लारीसह परिसरातील जवळपास १७ गावांना बुधवारी रात्री बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. भूकंपप्रवण क्षेत्रातील गावांची माहिती घेण्याचे आदेश अधिका-यांना देण्यात आले आहेत. असे तहसिलदार अहिल्या गाठाळ यांनी माहिती घेण्याचे आदेश अधिका-यांना दिले आहेत. प्रशासनाकडे अद्याप कुठल्याही नुकसानीची माहिती प्राप्त झाली नाही, असेही त्या म्हणाल्या.