शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

भूकंपग्रस्तास अखेर न्याय

By admin | Updated: February 9, 2016 01:00 IST

लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे १९९३मध्ये झालेल्या भूकंपाने आयुष्य उद््ध्वस्त झालेल्या महादू श्यामराव पवार या ४० वर्षांच्या बेरोजगाराने गेली पाच वर्षे दिलेल्या न्यायालयीन लढ्यास

मुंबई : लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे १९९३मध्ये झालेल्या भूकंपाने आयुष्य उद््ध्वस्त झालेल्या महादू श्यामराव पवार या ४० वर्षांच्या बेरोजगाराने गेली पाच वर्षे दिलेल्या न्यायालयीन लढ्यास यश आले आहे. जळगाव जिल्हा परिषदेने महादूला परिचर (शिपाई) या चतुर्थ श्रेणीतील पदावर नोकरी द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.महादू पवारने केलेली याचिका मंजूर करताना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील न्या. एस.एस. शिंदे व पी.आर. बोरा यांच्या खंडपीठाने जुलै २०१२मध्ये पूर्ण झालेल्या निवड प्रक्रियेच्या आधारे औपचारिकता पूर्ण करून जळगाव जि.प.ने सहा महिन्यांत महादूला परिचर या पदावर नियुक्ती देण्याचे आदेश दिले.जि.प.ने १ जानेवारी २०११ रोजी परिचर या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. सात जागा भूकंपग्रस्तांसाठी राखीव होत्या. सातव्या जागेवर बालाजी यादव यांची नेमणूक केली गेली व महादू पवार यास प्रतीक्षा यादीवर पहिल्या क्रमांकावर ठेवले गेले. बालाजी यादव हा खराखुरा भूकंपग्रस्त नाही व त्याने त्यासाठी दाखल केलेला दाखला बनावट आहे, अशी माहिती महादूने मिळविली व त्याआधारे औरंगाबाद खंडपीठात पहिली रिट याचिका केली. खंडपीठाने बालाजीचा भूकंपग्रस्त असल्याचा दाखला खरा आहे का, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा अंतरिम आदेश तहसीलदारांना दिला. आपले बिंग फुटेल हे लक्षात आल्यावर बालाजीने १ मार्च २०१४ला राजीनामा दिला. हे लक्षात घेऊन महादूने नोकरीसाठी जि.प.कडे निवेदन द्यावे, असे सांगून खंडपीठाने महादूची पहिली याचिका निकाली काढली.जि.प.ने तरीही नोकरी नाकारली, तेव्हा महादू दुसरी रिट याचिका केली. या वेळी जि.प.ने सांगितले की, प्रतीक्षा यादी एक वर्षासाठीच लागू असते. ही मुदत जुलै २०१३मध्ये संपल्याने महादूला नोकरी देता येणार नाही व त्या पदासाठी पुन्हा जाहिरात द्यावी लागेल. चाळीशी ओलांडलेला महादू नव्या निवड प्रक्रियेसाठी अपात्र ठरेल. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत त्याला नोकरी नाकारणे अन्यायाचे ठरेल, असे नमूद करून खंडपीठाने त्याला नोकरी देण्याचा आदेश दिला.महादूसाठी अ‍ॅड. संतोष दस्तगर, राज्य सरकारसाठी सहायक सरकारी वकील डी.एच. भोगले व जिल्हा परिषदेसाठी अ‍ॅड. विजय शर्मा यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)बोटचेपे धोरणमहादूला अन्याय्य पद्धतीने नोकरी नाकारणाऱ्या जिल्हा परिषदेने नियमावर बोट ठेवले. परंतु बालाजी यादव याची नेमणूक करताना त्याने दिलेला भूकंपग्रस्ताचा दाखला खरा आहे की नाही, याची शहानिशाही केली नाही. त्याचा दाखला बनावट असल्याचे पुढे आल्यावर कारवाई न करता त्याचा राजीनामा स्वीकारून जि.प.ने त्याला मोकळे होऊ दिले.