शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपग्रस्तास अखेर न्याय

By admin | Updated: February 9, 2016 01:00 IST

लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे १९९३मध्ये झालेल्या भूकंपाने आयुष्य उद््ध्वस्त झालेल्या महादू श्यामराव पवार या ४० वर्षांच्या बेरोजगाराने गेली पाच वर्षे दिलेल्या न्यायालयीन लढ्यास

मुंबई : लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे १९९३मध्ये झालेल्या भूकंपाने आयुष्य उद््ध्वस्त झालेल्या महादू श्यामराव पवार या ४० वर्षांच्या बेरोजगाराने गेली पाच वर्षे दिलेल्या न्यायालयीन लढ्यास यश आले आहे. जळगाव जिल्हा परिषदेने महादूला परिचर (शिपाई) या चतुर्थ श्रेणीतील पदावर नोकरी द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.महादू पवारने केलेली याचिका मंजूर करताना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील न्या. एस.एस. शिंदे व पी.आर. बोरा यांच्या खंडपीठाने जुलै २०१२मध्ये पूर्ण झालेल्या निवड प्रक्रियेच्या आधारे औपचारिकता पूर्ण करून जळगाव जि.प.ने सहा महिन्यांत महादूला परिचर या पदावर नियुक्ती देण्याचे आदेश दिले.जि.प.ने १ जानेवारी २०११ रोजी परिचर या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. सात जागा भूकंपग्रस्तांसाठी राखीव होत्या. सातव्या जागेवर बालाजी यादव यांची नेमणूक केली गेली व महादू पवार यास प्रतीक्षा यादीवर पहिल्या क्रमांकावर ठेवले गेले. बालाजी यादव हा खराखुरा भूकंपग्रस्त नाही व त्याने त्यासाठी दाखल केलेला दाखला बनावट आहे, अशी माहिती महादूने मिळविली व त्याआधारे औरंगाबाद खंडपीठात पहिली रिट याचिका केली. खंडपीठाने बालाजीचा भूकंपग्रस्त असल्याचा दाखला खरा आहे का, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा अंतरिम आदेश तहसीलदारांना दिला. आपले बिंग फुटेल हे लक्षात आल्यावर बालाजीने १ मार्च २०१४ला राजीनामा दिला. हे लक्षात घेऊन महादूने नोकरीसाठी जि.प.कडे निवेदन द्यावे, असे सांगून खंडपीठाने महादूची पहिली याचिका निकाली काढली.जि.प.ने तरीही नोकरी नाकारली, तेव्हा महादू दुसरी रिट याचिका केली. या वेळी जि.प.ने सांगितले की, प्रतीक्षा यादी एक वर्षासाठीच लागू असते. ही मुदत जुलै २०१३मध्ये संपल्याने महादूला नोकरी देता येणार नाही व त्या पदासाठी पुन्हा जाहिरात द्यावी लागेल. चाळीशी ओलांडलेला महादू नव्या निवड प्रक्रियेसाठी अपात्र ठरेल. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत त्याला नोकरी नाकारणे अन्यायाचे ठरेल, असे नमूद करून खंडपीठाने त्याला नोकरी देण्याचा आदेश दिला.महादूसाठी अ‍ॅड. संतोष दस्तगर, राज्य सरकारसाठी सहायक सरकारी वकील डी.एच. भोगले व जिल्हा परिषदेसाठी अ‍ॅड. विजय शर्मा यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)बोटचेपे धोरणमहादूला अन्याय्य पद्धतीने नोकरी नाकारणाऱ्या जिल्हा परिषदेने नियमावर बोट ठेवले. परंतु बालाजी यादव याची नेमणूक करताना त्याने दिलेला भूकंपग्रस्ताचा दाखला खरा आहे की नाही, याची शहानिशाही केली नाही. त्याचा दाखला बनावट असल्याचे पुढे आल्यावर कारवाई न करता त्याचा राजीनामा स्वीकारून जि.प.ने त्याला मोकळे होऊ दिले.