शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

पूर्वी साधने नव्हती; पण उत्साह होता

By admin | Updated: February 7, 2015 00:07 IST

आठवणींना उजाळा : विठ्ठलराव याळगी यांनी उलगडला पट

प्रसन्न पाध्ये - बेळगाव  -(बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी) पूर्वीच्या काळी नाट्य संमेलनात तांत्रिक उपकरणांचा अभाव होता; पण उत्साह मोठा होता, अशी भावना नव्वदीच्या उंबरठ्यावर पोहोचलेले ज्येष्ठ रंगकर्मी विठ्ठलराव याळगी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. बेळगावात ५८ वर्षांपूर्वी झालेल्या नाट्य संमेलनाचे ते साक्षीदार आहेत.नाटकांचे सादरीकरण ५०-६० वर्षांपूर्वी कसे व्हायचे, कोणती नाटके सादर झाली, स्थानिक रंगकर्मींनी गद्य, पद्य नाटकांच्या स्पर्धेत कशी बक्षिसे मिळविली, याच्या आठवणीत काही काळ याळगी रमले. १९२७ मध्ये स्थापन झालेल्या वाङ्मय मंडळातर्फे १९४५ मध्ये नाट्य महोत्सव भरविला होता. त्यावेळी सात-आठ नाटकांचे प्रयोग झाले होते. १९५२ मध्ये प्रा. गो. म. वाटवे यांनी स्थापलेल्या कलोपासक मंडळातर्फे ३८वे संमेलन बेळगावात १९५६ मध्ये झाले होते. तो महोत्सव अलौकिक ठरला. त्याकाळी पुरेशी साधने नसली तरी नाट्य महोत्सव, संमेलन घेण्यात उत्साह असायचा.मध्यंतरीच्या काळात नाट्य महोत्सवाच्या आयोजनात मरगळ आल्यासारखे वाटते. १९५६ नंतर बेळगावात नाट्य संमेलन झालेच नाही. अनेक वर्षांपासून बेळगावातील कलावंत स्थानिक पातळीवर नाट्यनिर्मिती करीत आहेत. स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत. बेळगावातील हौशी कलाकारांनी १९८४ मध्ये ‘संगीत सौभद्र’ नाटक बसविले होते. याचे दिग्दर्शन आजच्या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. अशोक साठे यांनी केले होते. दिल्लीत संगीत नाटकांच्या स्पर्धेत हे नाटक सादर केले होते. या नाटकातील कलाकारांना सात वैयक्तिक पारितोषिके मिळाली होती. डॉ. साठे यांनीच दिग्दर्शित केलेले ‘संगीत संशयकल्लोळ’ दिल्लीतील स्पर्धेत सादर झाले. त्याला पहिला क्रमांक मिळाला. तसेच सहा वैयक्तिक पारितोषिकेही मिळाल्याची आठवण याळगी यांनी सांगितली.‘सौभद्र’ची दिल्लीतील आठवण त्यांनी सांगितली. बेळगावातील नाट्य संस्था दिल्लीत प्रयोग करीत आहे हे त्यावेळी रेल्वेमंत्री असलेल्या मधु दंडवते यांना समजली. त्या दिवशी त्यांनी सर्व कलाकारांना त्यांच्या घरी जेवणासाठी बोलाविले. तो दिवस विजयादशमीचा होता. प्रतिभाताई सुद्धा त्यावेळी उपस्थित होत्या. श्रीखंड-पुरीचे जेवण झाल्यानंतर डॉ. साठे आणि संगीता बांदेकर-कुलकर्णी यांचे गायन झाले होते.१५ जुलै ही बालगंधर्वांची पुण्यतिथी व ५ नोव्हेंबर या रंगभूमी दिनानिमित्त वाङ्मय मंडळातर्फे नाटिका, गाण्यांचे कार्यक्रम होतात. बालगंधर्वांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या कन्येचे गायन झाल्याची आठवण त्यांनी सांगितली.बेळगावात झालेल्या नाट्य संमेलनात परिसंवाद नव्हतेच. चार-पाच नाटके रोज सादर केली जायची. मुंबई-पुण्याच्या कलाकारांसह स्थानिकांचाही यात सहभाग असे. त्या काळी सरकार वेगळे होते. बंधने नसत. यंदाचा महोत्सव सरकारच्या बंधनात अडकलेला आहे. कुठले ठराव करायचे, करायचे नाहीत यावर बंधने घातली आहेत. त्याकाळी भाषिक वादही नव्हता. सांस्कृतिक कार्यक्रमांना कुठली बंधने असू नयेत, अशी अपेक्षा असल्याचे याळगी म्हणाले. संयुक्त महाराष्ट्रासाठी दंडवते यांनी सत्याग्रह केला होता. त्या आठवणीला उजाळा देताना ते म्हणाले, ‘दंडवते रेल्वेमंत्री झाल्यानंतर दिल्लीत त्यांच्या भेटीचा योग आला. त्यावेळी दंडवते यांनी ‘आता चौकट घालून दिली आहे, त्यामुळे या मुद्द्यावर बोलता येणार नाही’, असे सांगितले