शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक ग्रामपंचायतीला ४० लाखांचा निधी

By admin | Updated: August 7, 2015 22:36 IST

शासनाचा निर्णय : संपूर्ण चेहरामोहरा बदलणार

रहिम दलाल -रत्नागिरीगावचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाकडून ४० लाख रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, संबंधित ग्रामपंचायतीची निवड करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शासनाकडून देण्यात आले आहेत. गावच्या विकासासाठी हा निधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून देण्यात येणार आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी शासनाकडून हा निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना गावांमध्ये रोपवाटिका, पाणंद, गाव तलाव, गावातीलअंतर्गत रस्ते, वनक्षेत्रातील रस्ते, पाझर तलाव, विहिरीतील गाळ काढणे, शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर खोदणे, वृक्षारोपणासाठी खड्डे तयार करणे आदी कामे करता येणार आहेत. प्रत्येक गावात रोपवाटिका तयार करण्यासाठी २ लाख रुपयांपर्यंत निधी खर्च करता येणार आहे. वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यासाठी ४ लाख रुपये, रस्त्यांच्या कामासाठी १० लाख रुपये, पाझर तलाव, तलाव व विहिरीतील गाळ उपसण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी, राजीव गांधी भवनसाठी १० लाख रुपयांपर्यंत निधी दिला जाणार आहे. अशा प्रकारे शासनाकडून देण्यात येणारा निधी विकासकामांवर ग्रामपंचायतींना खर्च करता येणार आहे. या योजनेच्या कामांना गती मिळावी म्हणून जास्तीत जास्त कामे गावपातळीवर व्हावीत, यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी व तहसीलदारांना याबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत. विविध योजना पूर्णत्त्वाला गेल्यानंतर त्या गावाचा विकास दृष्टीपथात येत असल्याचे मत अनेकांनी यापूर्वीही व्यक्त केले असून, अशा योजनांच्या अंमलजावणीवर बरेच काही अवलंबून असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या साऱ्या योजनांकडे लक्ष लागले आहे. रोजगार हमीतून निधी मिळणार या निधीचा वापर करुन करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा ग्रामविकास विभागाने तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीला सक्तीचे करण्यात येणार आहे. त्याचे अधिकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गावचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शासनाने जे निकष ठरविले आहेत त्या निकषाला धरूनच त्या त्या गावातील ग्रामपंचायतीचे दायित्व राहणार आहे.त्याची अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून मिळणार निधी.जास्तीत जास्त कामे गावपातळीवर होण्यासाठी शासनाचे धोरण.ग्रामपंचायतींवर सक्तीची अंमलबजावणी. गावांमध्ये रोपवाटिका, पाणंद, रस्ते, गाव तलावअंतर्गत रस्त्यांची कामे. वृक्षारोपणासाठी खड्डे तयार करणे कामाला विशेष प्राधान्य देणार. रोपवाटिका तयार करण्यासाठी विशेष अनुदानाची तरतूद करण्याचा निर्णय.