शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

देशभरात लवकरच सुरू होणार ई-टोल सेवा

By admin | Updated: February 17, 2016 03:30 IST

टोल नाक्यावरील खोळंबा टाळणे, इंधन बचत आणि पारदर्शक वसुलीसाठी देशभरात लवकरच ई-टोल सेवा सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले.

मुंबई : टोल नाक्यावरील खोळंबा टाळणे, इंधन बचत आणि पारदर्शक वसुलीसाठी देशभरात लवकरच ई-टोल सेवा सुरू करण्यात येईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. मुंबई-दिल्ली महामार्गावर ही सुविधा येत्या एप्रिलपासून सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले.बीकेसीतील मेक इन इंडिया सप्ताहात गडकरी म्हणाले की, ई-टोलसाठी वाहनावरच ई-स्टिकरचा वापर करण्यात येईल. वेगवेगळ्या बँकांमार्फत ई-स्टिकर खरेदी करता येतील. काही बँकांशी याबाबत चर्चा झाली असून, त्यांनी ही सेवा देण्यास होकार दिला आहे. महानगरांमधील वाहनांचे प्रदूषण लक्षात घेता बहुतेक महानगरांच्या सीमेवर ३५० वाहनतळे उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी पेट्रोलपंप ते कोल्ड स्टोरेजच्या सुविधा उपलब्ध राहतील, असेही त्यांनी सांगितले. गडकरी सलग दोन दिवस मेक इन इंडिया सप्ताहातील कार्यक्र मात सहभागी होत असून, देश-विदेशातील प्रतिनिधींशी बैठका घेऊन गुंतवणुकीबाबत चर्चा करीत आहेत. दोन दिवसांत रस्ते वाहतुकीसाठी किती गुंतवणूक आली असे विचारले असता ते म्हणाले, रस्ते, जल वाहतूक, बंदरे यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना असून, अनेक गुंतवणूकदार यासाठी पुढे आले आहेत. याची आकडेवारी लवकरच जाहीर केली जाईल.सध्या प्रश्न गुंतवणुकीचा नाही. पैसा प्रचंड आहे. एखादी चांगली योजना पुढे आणली की गुंतवणूक करण्यास अनेक कंपन्या पुढे येतात. रोजगार उपलब्ध करायचा असेल तर तुम्हाला गुंतवणूक वाढवावी लागणार आणि तेच आम्ही करीत आहोत.