शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

महाराष्ट्रातही ई-टोल

By admin | Updated: June 4, 2015 04:17 IST

टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा कायमच्या बंद व्हाव्यात आणि त्याद्वारे वेळेची बचत होऊन, प्रदूषण टळावे याकरता राष्ट्रीय

मुंबई : टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा कायमच्या बंद व्हाव्यात आणि त्याद्वारे वेळेची बचत होऊन, प्रदूषण टळावे याकरता राष्ट्रीय महामार्गावर ई-टोल वसुली सुरू करण्यात आली असून महाराष्ट्रातील इतर टोलनाक्यांवरही अशी सेवा सरू करण्यास आपण सहकार्य करू, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे पत्रपरिषदेत सांगितले.मुंबईच्या प्रवेशद्वारावरील एरोली पुलावर बुधवारपासून ई-टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व नाक्यांसाठी गडकरी यांनी सहकार्याचा हात पुढे केला. ते म्हणाले, आज आपण विमानातून येताना वाशी पुलावरील वाहनांची रांग बघितल्यानंतर ई-टोलसाठीचे तंत्रज्ञान राज्याला देण्याची आपली इच्छा झाली. या पद्धतीत वाहनांना रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाईसचे स्टिकर लावले जाते. नाक्यावरून हे वाहन गेले की वाहनधारकाने दिलेल्या खात्यातून टोलची रक्कम वजा होते. महाराष्ट्रात येत्या दोन वर्षांत एक लाख कोटी रुपये खर्चून दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येईल. आपल्या विभागातर्फे देशभरात सध्या ३ लाख ८० हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे येत्या सहा महिन्यांत सुरू करण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)