शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

महाराष्ट्रातही ई-टोल

By admin | Updated: June 4, 2015 04:17 IST

टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा कायमच्या बंद व्हाव्यात आणि त्याद्वारे वेळेची बचत होऊन, प्रदूषण टळावे याकरता राष्ट्रीय

मुंबई : टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा कायमच्या बंद व्हाव्यात आणि त्याद्वारे वेळेची बचत होऊन, प्रदूषण टळावे याकरता राष्ट्रीय महामार्गावर ई-टोल वसुली सुरू करण्यात आली असून महाराष्ट्रातील इतर टोलनाक्यांवरही अशी सेवा सरू करण्यास आपण सहकार्य करू, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे पत्रपरिषदेत सांगितले.मुंबईच्या प्रवेशद्वारावरील एरोली पुलावर बुधवारपासून ई-टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व नाक्यांसाठी गडकरी यांनी सहकार्याचा हात पुढे केला. ते म्हणाले, आज आपण विमानातून येताना वाशी पुलावरील वाहनांची रांग बघितल्यानंतर ई-टोलसाठीचे तंत्रज्ञान राज्याला देण्याची आपली इच्छा झाली. या पद्धतीत वाहनांना रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाईसचे स्टिकर लावले जाते. नाक्यावरून हे वाहन गेले की वाहनधारकाने दिलेल्या खात्यातून टोलची रक्कम वजा होते. महाराष्ट्रात येत्या दोन वर्षांत एक लाख कोटी रुपये खर्चून दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येईल. आपल्या विभागातर्फे देशभरात सध्या ३ लाख ८० हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे येत्या सहा महिन्यांत सुरू करण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)