शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

ई-टेंडरिंगला ग्रामविकासची बगल

By admin | Updated: March 24, 2015 01:34 IST

राज्यात सत्तेवर आल्यावर पारदर्शकतेकरिता ३ लाख रुपयांवरील सर्व कामांचे ई-टेंडरिंग करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला.

मुंबई : राज्यात सत्तेवर आल्यावर पारदर्शकतेकरिता ३ लाख रुपयांवरील सर्व कामांचे ई-टेंडरिंग करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. मात्र ग्रामविकास विभागाने २ लाख ९९ हजार रुपये किमतीची रस्त्यांची १९०० कामे आमदारांच्या शिफारशीवरून देताना ई-टेंडरिंगला बगल दिल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा नामोल्लेख टाळला असला तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांना लक्ष्य केले.अर्थसंकल्पावरील चर्चेला मुंडे यांच्या भाषणाने प्रारंभ झाला. ते म्हणाले की, राज्याचा हा अर्थसंकल्प नवसानं पोर व्हावं आणि मुके घेऊन मरावं, असा आहे. या अर्थसंकल्पात १९ कामांकरिता केलेली तरतूद चिन्हांकित दाखवल्याने लोकांनी या अर्थसंकल्पाला प्रश्नांकित केले तर नवल वाटू नये. १७५ कोटी रुपयांचे सावकारी कर्ज माफ केल्याचे व त्याचा २ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे सरकार सांगत आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचे केवळ ७ हजार रुपयांचे कर्ज माफ केले आहे. मागील सरकारने ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज काढल्याबद्दल भाजपाने आम्हाला लक्ष्य केले. मात्र या सरकारने गेल्या चार महिन्यांत ३३ हजार १०७ कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. या अर्थसंकल्पात विकासकामाकरिता ०.४५ टक्के तर विकासोत्तर कामाकरिता १५ टक्के रकमेची तरतूद केली आहे.मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरी मतदारांनी भाजपाला सत्तेवर बसवले. मात्र एफएसआयवर अतिरिक्त प्रिमियम लावून याच भागातील घरे महाग करून भाजपाने या मतदारांचा विश्वासघात केल्याचा आरोप मुंडे यांनी केला. बिल्डरांना अंकुश लावणाऱ्या व सरकारचे उत्पन्न वाढवणाऱ्या संजय पांडे यांची अवघ्या चार महिन्यांत बदली करून सरकारने उत्पन्न वाढीकरिता उपाय सुचवणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या आपल्याच धोरणाला हरताळ फासला असल्याचे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)कैद्यांना अमलीपदार्थमहाराष्ट्रातील तुरुंगातील कैद्यांना अमलीपदार्थ दिले जातात, असा आरोप मुंडे यांनी केला. तसेच सिंघानिया या आंतरराष्ट्रीय बुकीला राज्यातील सरकारने संरक्षण दिले असून, पोलीस संरक्षणात फिरणारा हा बुकी अन्य बुकींवर धाडी टाकतोय, असा आरोपही मुंडे यांनी केला.