शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

खरेदीसाठी ई-निविदा बंधनकारक

By admin | Updated: November 18, 2015 03:16 IST

चिक्की व अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या कंत्राटदारांना २०६ कोटी रुपयांचे कंत्राट ई-निविदा न काढताच देण्यात आल्याने राज्य सरकारला सर्व बाजूंनी टीकेची झोड सहन

मुंबई : चिक्की व अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या कंत्राटदारांना २०६ कोटी रुपयांचे कंत्राट ई-निविदा न काढताच देण्यात आल्याने राज्य सरकारला सर्व बाजूंनी टीकेची झोड सहन करावी लागली. त्यामुळे जाग्या झालेल्या सरकारने आता नवीन धोरण आखत प्रत्येक वस्तू खरेदी करण्यापूर्वी ई-निविदा काढणे बंधनकारक केले आहे. या नव्या धोरणात वस्तू खरेदी करण्यापूर्वी कोणत्या प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे, हे नमूद करण्यात आल्याची माहिती मंगळवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली. ‘शासकीय विभागासाठी कार्यालयीन खरेदीसाठी कार्यपद्धतीच्या नियमावली’संदर्भात राज्य सरकारने ३० आॅक्टोबर रोजी अधिसूचना काढली आहे. या धोरणांतर्गत पाच श्रेणी करण्यात आल्या आहेत. मात्र प्रत्येक श्रेणीसाठी ई-निविदा काढणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाला दिली. प्रत्येक वस्तू खरेदी करण्यापूर्वी नव्या धोरणात नमूद करण्यात आलेल्या सर्व प्रक्रिया पार पाडणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून आर्थिक बंधने घालण्यात आली आहेत, असेही अ‍ॅड. अणे यांनी खंडपीठाला सांगितले. ‘५ हजार रुपयांपर्यंत दर असलेल्या वस्तू एका वर्षात कमाल ५० हजार रुपयांपर्यंतच घेता येतील; तसेच वस्तूंचे दर ३ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत जात असतील, तर दरपत्रक मागवणे बंधनकारक असेल. तसेच खरेदीचे आदेश देण्यापूर्वी राज्य सरकारकडून परवानगी घ्यावीच लागेल. त्याशिवाय वस्तू खरेदी करण्याचा प्रस्ताव दरवर्षी १५ फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारकडे सादर करावा लागेल आणि त्या प्रस्तावावर राज्य सरकार १५ मार्चपर्यंत निर्णय घेईल, असेही नव्या धोरणात नमूद करण्यात आले आहे,’ असे अ‍ॅड. अणे यांनी खंडपीठाला सांगितले. पंकजा मुंडेंच्या महिला व बाल विकास विभागाने ई-निविदा न मागवताच २०६ कोटी रुपयांच्या वस्तू मागवल्या. तसेच सरकारी शाळांसाठी मागवलेली चिक्की निकृष्ट दर्जाची होती. त्यामुळे या सर्व प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका संदीप अहिरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत सरकारने नव्या धोरणाची माहिती दिली. चिक्कीप्रकरणी चौकशी केली का? अशी विचारणा मंगळवारी खंडपीठाने केली. सरकारने चौकशी केली नसून अन्न व औषधे प्रशासनाने चिक्कीचे नमुने गोळा केले आणि तपासणी केली. मात्र चिक्की निकृष्ट दर्जाची नसल्याचे प्रशासनाने अहवालात म्हटले आहे. खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी १० डिसेंबर रोजी ठेवली आहे.