शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त कुटुंबे स्वगृही रवाना

By admin | Updated: May 30, 2016 04:24 IST

दीड महिन्यापेक्षा अधिक काळ येथे राहिलेले दुष्काळग्रस्त रविवारी माघारी गेले.

ठाणे : कपडे-भांड्यांची बांधाबांध सुरू झालेली, आदरातिथ्य उत्तम झाल्यानं आणि रोजंदारी करून थोडी पुंजी जमा केल्यानं चेहऱ्यावर समाधान, कृतज्ञतेने सहज जोडले जाणारे हात आणि अखेरीस निरोप घेताना पाणावलेले डोळे... असे चित्र पाहायला मिळाले ते ठाण्यात उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे दुष्काळग्रस्त छावणीत. दीड महिन्यापेक्षा अधिक काळ येथे राहिलेले दुष्काळग्रस्त रविवारी माघारी गेले. ‘गावाकडे थोडासा पाऊस झालाय, आता तो कवाबी येलं. त्यामुळं पावसाळ्याआधीची शेतीची कामं उरकावी लागतील, म्हणूनच निघालो’ असा आशावाद सोबत घेऊन त्यांनी निरोप घेतला.नांदेड, लातूर जिल्ह्यांच्या विविध खेड्यापाड्यांतून आलेल्या सुमारे ४०० दुष्काळग्रस्तांना ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या छावणीच्या माध्यमातून एक आसरा आणि विविध कामांच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध करून दिला होता. रविवारी ते आपल्या गावी परतले. यावेळी शिंदे यांनी स्वत: उपस्थित राहून दुष्काळग्रस्तांशी संवाद साधला. तुमची येथे सोय करून मी माझे कर्तव्य केले. पण, संकटात असलेल्यांना मदत करणे, हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले. तुम्ही ठाण्यात परत या, पण दुष्काळग्रस्त म्हणून येण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये. मात्र, कधीही कटू प्रसंग आला तर ठाण्याचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. छावणीतील मुलांसाठी बाळासाहेब ठाकरे शिष्यवृत्ती योजना सुरू करणार असून त्याअंतर्गत मुलांच्या शिक्षणाचा खर्च आपण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.यावेळी शिंदे यांच्या हस्ते कुटुंबांना साडी, भांडी, धान्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. तर, दुष्काळग्रस्तांनीही आपल्या शब्दांत शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, विभागप्रमुख परेश चाळके, तसेच राहुल लोंढे, दत्तात्रेय आरोटे, शिवाजी दिवटे, बाबासाहेब कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)त्यांनीही जपली माणुसकीची जाणठाण्यात आपली चांगली सोय ज्यांनी केली, त्या पालकमंत्री शिंदे आणि मोजकेच ६ ते ७ कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यासाठी दुष्काळग्रस्त बांधवांनी स्वत: हून वर्गणी काढली होती. त्या माध्यमातून त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल आणण्याचे ठरवले होते. प्रत्येकाने शक्य होईल तसे २० ते १०० रुपये दिले होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याला नकार देऊन पैसे परत वाटून घेण्यास सांगितले. परंतु, त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता ही बरेच काही सांगून गेली, असे कार्यकर्ते म्हणाले.यापूर्वी ठाण्यात कधीच आलो नव्हतो. दुष्काळामुळे ठाणे गाठले. पण, परक्या गावाला आलो, असे कधीच जाणवले नाही. इथे आम्हाला राहण्याबरोबर अन्नधान्य, पाण्याचीही सोय उपलब्ध करून दिली.- कविता दळवी, हिंगोलीपहिल्यांदाच दुष्काळामुळे घर सोडलं, पण येथे सगळ्यांनीच आमची मुलांप्रमाणे काळजी घेतली. ही सगळी माणसंही आम्हाला कुटुंबातीलच वाटायची. त्यामुळे पुन्हा घराकडे निघालो, याचा आनंद असला तरी ठाण्यातून जातो आहोत, याचे दु:खही आहे.- अनसूया चव्हाण, मुखेड