शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त कुटुंबे स्वगृही रवाना

By admin | Updated: May 30, 2016 04:24 IST

दीड महिन्यापेक्षा अधिक काळ येथे राहिलेले दुष्काळग्रस्त रविवारी माघारी गेले.

ठाणे : कपडे-भांड्यांची बांधाबांध सुरू झालेली, आदरातिथ्य उत्तम झाल्यानं आणि रोजंदारी करून थोडी पुंजी जमा केल्यानं चेहऱ्यावर समाधान, कृतज्ञतेने सहज जोडले जाणारे हात आणि अखेरीस निरोप घेताना पाणावलेले डोळे... असे चित्र पाहायला मिळाले ते ठाण्यात उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे दुष्काळग्रस्त छावणीत. दीड महिन्यापेक्षा अधिक काळ येथे राहिलेले दुष्काळग्रस्त रविवारी माघारी गेले. ‘गावाकडे थोडासा पाऊस झालाय, आता तो कवाबी येलं. त्यामुळं पावसाळ्याआधीची शेतीची कामं उरकावी लागतील, म्हणूनच निघालो’ असा आशावाद सोबत घेऊन त्यांनी निरोप घेतला.नांदेड, लातूर जिल्ह्यांच्या विविध खेड्यापाड्यांतून आलेल्या सुमारे ४०० दुष्काळग्रस्तांना ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या छावणीच्या माध्यमातून एक आसरा आणि विविध कामांच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध करून दिला होता. रविवारी ते आपल्या गावी परतले. यावेळी शिंदे यांनी स्वत: उपस्थित राहून दुष्काळग्रस्तांशी संवाद साधला. तुमची येथे सोय करून मी माझे कर्तव्य केले. पण, संकटात असलेल्यांना मदत करणे, हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले. तुम्ही ठाण्यात परत या, पण दुष्काळग्रस्त म्हणून येण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये. मात्र, कधीही कटू प्रसंग आला तर ठाण्याचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. छावणीतील मुलांसाठी बाळासाहेब ठाकरे शिष्यवृत्ती योजना सुरू करणार असून त्याअंतर्गत मुलांच्या शिक्षणाचा खर्च आपण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.यावेळी शिंदे यांच्या हस्ते कुटुंबांना साडी, भांडी, धान्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. तर, दुष्काळग्रस्तांनीही आपल्या शब्दांत शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, विभागप्रमुख परेश चाळके, तसेच राहुल लोंढे, दत्तात्रेय आरोटे, शिवाजी दिवटे, बाबासाहेब कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)त्यांनीही जपली माणुसकीची जाणठाण्यात आपली चांगली सोय ज्यांनी केली, त्या पालकमंत्री शिंदे आणि मोजकेच ६ ते ७ कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यासाठी दुष्काळग्रस्त बांधवांनी स्वत: हून वर्गणी काढली होती. त्या माध्यमातून त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल आणण्याचे ठरवले होते. प्रत्येकाने शक्य होईल तसे २० ते १०० रुपये दिले होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याला नकार देऊन पैसे परत वाटून घेण्यास सांगितले. परंतु, त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता ही बरेच काही सांगून गेली, असे कार्यकर्ते म्हणाले.यापूर्वी ठाण्यात कधीच आलो नव्हतो. दुष्काळामुळे ठाणे गाठले. पण, परक्या गावाला आलो, असे कधीच जाणवले नाही. इथे आम्हाला राहण्याबरोबर अन्नधान्य, पाण्याचीही सोय उपलब्ध करून दिली.- कविता दळवी, हिंगोलीपहिल्यांदाच दुष्काळामुळे घर सोडलं, पण येथे सगळ्यांनीच आमची मुलांप्रमाणे काळजी घेतली. ही सगळी माणसंही आम्हाला कुटुंबातीलच वाटायची. त्यामुळे पुन्हा घराकडे निघालो, याचा आनंद असला तरी ठाण्यातून जातो आहोत, याचे दु:खही आहे.- अनसूया चव्हाण, मुखेड