शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अवघ्या ६ दिवसांत उडणार धुरळा

By admin | Updated: February 9, 2017 03:20 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारी रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दि. १३ फेब्रुवारी आहे

पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारी रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दि. १३ फेब्रुवारी आहे. त्यामुळे त्यानंतरच जिल्ह्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी अवघे सहाच दिवस मिळणार आहेत. अवघ्या सहा दिवसांत मतदार संघातील १०-१५ गावांमध्ये पोहचण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर उभे ठाकलेले आहे. अपक्ष उमेदवारांना तर आपले चिन्ह पोहचवताना खूपच कसरत करावी लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने यावेळी प्रथमच महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा निर्णय घेतला. परंतु महापालिकांसाठी आयोगाने उमेदवारी अर्ज स्विकारणे, छाननी व आणि माघारी यामध्ये आठ दिवसांचे अंतर ठेवले आहे. महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ७ फेबु्रवारी होती. यामुळे महापालिकांमधील लढतीचे चित्र ७ तारखेलाच स्पष्ट झाले असून, अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप देखील करण्यात आले. त्यातून शहरी भागातील मतदार संघ तुलनेत लहान आहेत. उमेदवारांना आपले चिन्ह पोहचविण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. या उलट जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १ ते ६ फेबु्रवारी ही मदुत असून, छाननी ७ फेबु्रवारीला करण्यात आली. आता माघारीसाठी १३ फेबु्रवारीपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. माघारीनंतर सायंकाळी ४ नंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार रविवार (दि.१९) रोजी सायंकाळी ५ वाजता बंद करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांना सर्व मतदारांपर्यंत पोहोचताना त्यांची दमछाक होणार आहे. अवघ्या सहा दिवसांच्या प्रचारात आता कोण बाजी मारतात हेच पाहायचे.