शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनकाळात जमला साडेसात टन कचरा

By admin | Updated: February 9, 2017 04:06 IST

शहरातील क्रीडासंकुलात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या नव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कालावधीत ७.५ टन कचऱ्याची विल्हेवाट

अनिकेत घमंडी, डोंबिवलीशहरातील क्रीडासंकुलात ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या नव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कालावधीत ७.५ टन कचऱ्याची विल्हेवाट कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्वच्छता विभागाने लावली. त्यात ५.५ टन कचरा, तर २ टन सुका कचरा होता. सध्या मंडप उतरवण्याचे काम सुरू असून आणखी एक टन कचरा निघेल. त्याचीही तातडीने विल्हेवाट लावण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.महापालिकेच्या ‘ई’ प्रभाग स्वच्छता विभागाचे अधिकारी नरेंद्र धोत्रे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ओला व सुका कचरा टाकण्यासाठी चार ठिकाणी नियोजन केले होते. सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, कागद, पुठ्ठे, पाण्याचे ग्लास आदी गोळा करण्यात आले. तर, ओल्या कचऱ्यात भोजन, न्याहारी, चहापान आदी ठिकाणी उरलेले अन्न, भाज्यांची टरफले तसेच भोजनमंडप आदी ठिकाणचा कचरा होता. ठिकठिकाणी कचऱ्याच्या पेट्या ठेवल्या होत्या. स्वच्छतेसाठी दोन शिफ्टमध्ये २४ कामगार नेमले होते. तसेच १२ जानेवारीपासून मैदानाच्या सफाईसाठी १५ कामगार कार्यरत होते. कचरा उचलणे तसेच तो डम्पिंगपर्यंत वाहून नेण्यासाठी एक बुलडोझर, ट्रक, आरसीसी गाड्या तैनात होत्या. प्लास्टिक कचरा तातडीने वेगळा करण्यात आला. त्यामुळे त्याची तातडीने विल्हेवाट लावता आली.त्याचबरोबर संमेलनस्थळी प्रत्येक सभामंडपात धूरफवारणी, जंतुनाशक पावडरफवारणी तसेच तीन फिरती शौचालये सज्ज ठेवण्यात आली होती. त्यामुळे येथे साहित्यप्रेमींची कुठलीही गैरसोय झाली नाही, असे ते म्हणाले. साहित्यप्रेमींचेही सहकार्यसाहित्यप्रेमी, नागरिक यांनीही स्वच्छता राखण्यासाठी साहाय्य केले. कुठेही अनावश्यक कचरा टाकला नाही. स्वच्छ भारत अभियान जागृतीचे बॅनर लावल्याने काहीसा फरक पडला.कचरापेट्यांमध्येच उपस्थितांनी कचरा टाकल्याने सफाई कामगारांनाही त्रास झाला नाही. स्वच्छता ठेवणे सोपे झाल्याचे धोत्रे म्हणाले.