शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

दारूविरुद्ध संत्रीबाईचा दुर्गावतार

By admin | Updated: September 28, 2014 01:55 IST

गावात दारूबंदी होईल, असे कुणालाही स्वप्नात वाटले नाही. मात्र याच गावातील संत्रीबाई विश्वनाथ राठोड या महिलेने दुर्गावतार धारण करीत दारूबंदी केली.

ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ
तिवसा हे बाराशे उंबरठय़ाचे गाव. पंचक्रोशीतील गावांसाठी दारूचे मार्केट. एक घर सोडून दारूची निर्मिती व विक्री होणा:या या गावात दारूबंदी होईल, असे कुणालाही स्वप्नात वाटले नाही. मात्र याच गावातील संत्रीबाई विश्वनाथ राठोड या महिलेने दुर्गावतार धारण करीत दारूबंदी केली. 
यवतमाळ तालुक्यातील तिवसा हे गाव हातभट्टीच्या दारूसाठी प्रसिद्ध होते. येथील बहुतांश कुटुंबांचा दारू गाळणो आणि विकणो हा व्यवसाय होता. गावात शंभर हातभट्टय़ा होत्या.  दारुडय़ांचा सर्वाधिक त्रस महिलांना सहन करावा लागत होता. दररोजची भांडणो, त्यातून पोलिसांर्पयत गेलेली प्रकरणो यामुळे गावाचा विकासही खुंटला होता. एव्हढेच नाही, तर अनेकांना दारूमुळे अनेकांचा  मृत्यू झाला. गावातील एका राठोड परिवारातील तर सर्व पुरुष मंडळी अतिमद्य सेवनाने मृत्युमुखी पडली. आता या घरात केवळ महिलाच राहिल्या. अशीच अवस्था अनेक कुटुंबांची झाली होती. परंतु कुणीही दारू विकणो आणि पिणोही थांबवत नव्हते. कारण गावात दारू विकणा:यांचे वर्चस्व होते.  कुणी पोलिसात तक्रार केली तर दारूविक्रेते त्याला सळो की पळो करून गावात जगणो मुश्कील करीत होते. अशा या गावात दारूबंदी होईल असे कुणालाही स्वप्नात वाटले नाही. मात्र एका महिलेने दुर्गावतार धारण केला आणि गावात कायमची दारूबंदी झाली. 
संत्रीबाई विश्वनाथ राठोड असे या महिलेचे नाव आहे. तिसरी शिकलेल्या या महिलेचे माहेर तिवसाच आहे. 3क् वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यातील दहेली तांडा येथील विश्वनाथ राठोडसोबत तिचा विवाह झाला. मात्र दोनच महिन्यांत पतीचे निधन झाले. ती भाऊ धनराज जाधव, मुलचंद जाधव यांच्या आश्रयाने पुन्हा तिवसातच आली. गावात दारूमुळे उद्ध्वस्त होणारे संसार जवळून पाहत होती. घरासमोर पडून असणारे दारुडे, त्यांची शिवीगाळ नेहमी कानावर पडायची. तिने गावात दारूबंदीचा विडा उचलला. गावातील 12 महिला बचत गट एकत्र आणले. गावात जगदंबा बचत गटाची स्थापना केली. त्यांच्या सोबतीला मुक्ता चव्हाण, कौशल्या मोहन राठोड, सुरेखा राठोड, लक्ष्मी राठोड, नंदा कुमरे, प्रीती चव्हाण, उषा सुलकर यांच्यासह शंभरावर महिला आल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि दारूबंदी विभागाला निवेदन दिले.   गावक:यांनी टिंगल-टवाळी करीत या महिला काय दारूबंदी करू शकतात, असे टोमणो मारले. मात्र या महिला आपल्या निर्धारावर कायम होत्या. गावातील दारूविक्रेत्यांना त्यांनी समजावून सांगितले. परंतु कुणीही ऐकत नव्हते. त्यामुळे गावालगतच्या जंगलात सुरू असलेल्या हातभट्टय़ांवर या महिला धाडी मारू लागल्या. परंतु त्याचा अपेक्षित परिणाम होत नव्हता. 
शेवटी गावातील सर्व महिला एकत्र आल्या आणि 27 जुलै 2क्13 रोजी दुर्गावतार धारण केला. गावातील शंभर हातभट्टय़ा उद्ध्वस्त केल्या. 1 ट्रॅक्टर मोहाची दारू, 5क्क् पिंप आणि 5क् मोठय़ा टाक्या दारू जप्त केली. महिलांना प्रचंड विरोध झाला. परंतु त्यांनी कुणालाही जुमानले नाही. सरळ ट्रॅक्टरभर दारू घेऊन यवतमाळचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले.  परिणाम व्हायचा तोच झाला. गावातून दारू हद्दपार झाली ती कायमची. आता वर्षभरानंतरही या गावात दारूचा थेंब मिळत नाही. काही सवयीचे गुलाम दारुडे बाहेरगावी जाऊन दारू पितात, परंतु तेही चूपचाप. 
त्या आंदोलनाबद्दल संत्रीबाई राठोड सांगतात, आमचे आंदोलन कोणत्याही पक्षाचे नव्हते. दारूमुळे त्रस्त झालेल्या आम्ही महिला एकत्र आलो आणि आमची शक्ती दाखवून दिली. यासाठी सरपंच उदयसिंग राठोड, उपसरपंच शंकर पवार आणि अधिकारी, कर्मचा:यांनीही आम्हाला सहकार्य केले. आज शेकडो महिलांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत. दारूबंदी झाली त्या काळात दोन महिने तर झोप येत नव्हती. दररोज दारुडय़ांकडून धमक्या येत होत्या. आमच्याबद्दल गैरसमज पसरविले जात होते. परंतु तिवसा हे माङो जन्मभूमीचे गाव आहे आणि ते दारूमुक्त केले याचा मला अभिमान आहे. या आंदोलनासाठी लाडखेडचे तत्कालीन ठाणोदार संजय शिरभाते यांना महिलांनी विनवणी केली होती. परंतु त्यांनी लक्ष दिले नाही. या आंदोलनानंतर त्यांना निलंबित केले. 
 
दारूबंदी करणा:या महिलेवर विळ्याचे 11 वार 
संत्रीबाईच्या टीममधील शोभा राठोड या महिलेवर दारूबंदीनंतर 5 महिन्यांनी दारूविक्रेत्याने हल्ला केला. एक-दोन नव्हेतर विळ्याचे तब्बल 11 वार केले. रक्तबंबाळ शोभाबाईला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी हल्ला करणा:या गोपाळ राठोडला महिलांनी चांगलेच बदडून पोलिसांच्या हवाली केले. दुर्गादेवीची कृपा म्हणून आमची सहकारी बचावली, असे संत्रीबाई सांगते. 
 
आज या महिलांची दारुडय़ांत एवढी दहशत आहे की कुणी दारू गाळायचे तर सोडा पिण्याचाही विचार करीत नाही. संत्रीबाईचा हा आदर्श इतर गावांतील महिलांनीही घेतला असून, परिसरातील सहा ते सात गावांत दारूबंदी झाली. तिवसा येथे तर विशेष कार्यक्रमात न्यायाधीश एस.एम. आगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.