शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

‘महाराष्ट्र दिन’सोबत साजरा होणार ‘दुर्ग दिन’

By admin | Updated: April 29, 2017 02:56 IST

सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’सोबतच ‘दुर्ग दिन’ साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील १० प्रमुख किल्ल्यांची निवड

मुंबई : सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’सोबतच ‘दुर्ग दिन’ साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील १० प्रमुख किल्ल्यांची निवड केली असून, या ठिकाणी दुर्ग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांची मेजवानी दुर्गप्रेमींना मिळणार आहे. सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले की, महाराष्ट्र दिनानिमित्त क्रांतिकारकांना मानवंदना देण्यासाठी राज्याच्या गडकिल्ल्यांशिवाय दुसरी जागा असूच शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्र दिन हा दुर्ग दिन म्हणूनही साजरा करण्याचा निर्धार सह्याद्री प्रतिष्ठानने केला आहे. दुर्ग दिनानिमित्त दुर्ग संवर्धनाची हाक दिली जाईल. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या गड-किल्ल्यांवर प्रत्येक सण-उत्सव साजरा होत होता. त्याच इतिहासाला उजाळा देण्यासाठी हा उत्सव साजरा केला जाईल. शिवाय भविष्यातही हा उत्सव साजरा करता यावा, म्हणून गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न प्रतिष्ठान करणार आहे.दुर्ग दिन साजरा करताना स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारी मावळ्यांना मानवंदना दिली जाईल. ३० एप्रिल रोजी रात्री सर्व सदस्य आणि दुर्गप्रेमी गडचढाई करतील. रात्री १२ वाजता किल्ल्यावरील दरवाजा, तटबंदी, बुरूज व मंदिर या ठिकाणी रांगोळी काढून आणि पणत्या लावून दीपोस्तव साजरा करतील. १ मे या दिवशी पहाटे उठून गडाची पूजा केली जाईल. त्यानंतर भगव्या ध्वजाला मानवंदना देऊन गडावरील स्वच्छता मोहिमेने उत्सवाची सांगता होईल. (प्रतिनिधी)