शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दारूनिर्मिती करणारे हात गुंतले श्रमदानात

By admin | Updated: May 23, 2016 04:51 IST

दिशा मिळाली की गावची दशाही बदलते, याचा प्रत्यय अंबाजोगाई तालुक्यातील राडीतांडा या गावाने महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. ऊसतोडीसाठी जाणारे ग्रामस्थ व दारूनिर्मिती करणाऱ्या

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई (जि. बीड)दिशा मिळाली की गावची दशाही बदलते, याचा प्रत्यय अंबाजोगाई तालुक्यातील राडीतांडा या गावाने महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. ऊसतोडीसाठी जाणारे ग्रामस्थ व दारूनिर्मिती करणाऱ्या या गावकऱ्यांनी केवळ ४५ दिवसांत श्रमदानातून गावचे परिवर्तन घडवून आणले. परिवर्तनाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साध्य करून गावठी दारू बनवण्याचे बंद करण्याचा सामूहिक निर्धारही या गावाने केला आहे, हे येथे उल्लेखनीय!राडीतांडा हे ९५० लोकवस्तीचे गाव. गावात एकूण १५२ कुटुंबे राहतात. गेल्या येथील ग्रामस्थ ३० वर्षांपासून महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणी ऊसतोडीसाठी जातात. गावातील १७ कुटुंबे गावठी दारू बनवतात. या वर्षी भीषण दुष्काळाच्या स्थितीमुळे ऊसतोडीसाठी कुठूनही बोलावणे आले नाही. अशा स्थितीत उदरनिर्वाह करायचा कसा? या मुख्य समस्येचे निराकरण करण्यासाठी गावचे परिवर्तन हेच विकासाकडे नेऊ शकते, या उद्देशाने ज्ञान प्रबोधिनीचे समन्वयक प्रसाद चिक्षे, ग्रामसेवक विनोद देशमुख, यांनी ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांचे प्रबोधन केले. श्रमदानाच्या माध्यमातून गावात जलक्रांतीचे विविध कामे होऊ लागली. गेल्या ४५ दिवसांत ग्रामस्थांनी गावाचा संपूर्ण कायापालटच करून दाखविला.ग्रामस्थांनी श्रमदानातून गायरानात १५ फूट लांब व दोन फूट रूंद व दोन फूट खोल असे ५,२०० समान समपातळी चर खोदले. या प्रत्येक चरामध्ये एका पावसात ९०० लिटर पाणी जमिनीत मुरते. एकदा पाऊस पडला तर ५,२०० चराच्या माध्यमातून ४६ लाख ८० हजार लिटर पाणी जमिनीत मुरते. गावातील ११ विहिरी व २८ विंधन विहिरींचे पुर्नभरण करण्यात आले आहे. गावातील ९४ हेक्टरवर बांधबंदिस्ती करण्यात आली आहे. सांडपाणी मुरवण्यासाठी शोषखड्डेही तयार करण्यात आली आहेत.