शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
4
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
5
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
6
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
7
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
8
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
9
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
10
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
11
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
12
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
13
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
14
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
15
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
16
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
17
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
18
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
19
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
20
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
Daily Top 2Weekly Top 5

दारूनिर्मिती करणारे हात गुंतले श्रमदानात

By admin | Updated: May 23, 2016 04:51 IST

दिशा मिळाली की गावची दशाही बदलते, याचा प्रत्यय अंबाजोगाई तालुक्यातील राडीतांडा या गावाने महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. ऊसतोडीसाठी जाणारे ग्रामस्थ व दारूनिर्मिती करणाऱ्या

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई (जि. बीड)दिशा मिळाली की गावची दशाही बदलते, याचा प्रत्यय अंबाजोगाई तालुक्यातील राडीतांडा या गावाने महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. ऊसतोडीसाठी जाणारे ग्रामस्थ व दारूनिर्मिती करणाऱ्या या गावकऱ्यांनी केवळ ४५ दिवसांत श्रमदानातून गावचे परिवर्तन घडवून आणले. परिवर्तनाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साध्य करून गावठी दारू बनवण्याचे बंद करण्याचा सामूहिक निर्धारही या गावाने केला आहे, हे येथे उल्लेखनीय!राडीतांडा हे ९५० लोकवस्तीचे गाव. गावात एकूण १५२ कुटुंबे राहतात. गेल्या येथील ग्रामस्थ ३० वर्षांपासून महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणी ऊसतोडीसाठी जातात. गावातील १७ कुटुंबे गावठी दारू बनवतात. या वर्षी भीषण दुष्काळाच्या स्थितीमुळे ऊसतोडीसाठी कुठूनही बोलावणे आले नाही. अशा स्थितीत उदरनिर्वाह करायचा कसा? या मुख्य समस्येचे निराकरण करण्यासाठी गावचे परिवर्तन हेच विकासाकडे नेऊ शकते, या उद्देशाने ज्ञान प्रबोधिनीचे समन्वयक प्रसाद चिक्षे, ग्रामसेवक विनोद देशमुख, यांनी ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांचे प्रबोधन केले. श्रमदानाच्या माध्यमातून गावात जलक्रांतीचे विविध कामे होऊ लागली. गेल्या ४५ दिवसांत ग्रामस्थांनी गावाचा संपूर्ण कायापालटच करून दाखविला.ग्रामस्थांनी श्रमदानातून गायरानात १५ फूट लांब व दोन फूट रूंद व दोन फूट खोल असे ५,२०० समान समपातळी चर खोदले. या प्रत्येक चरामध्ये एका पावसात ९०० लिटर पाणी जमिनीत मुरते. एकदा पाऊस पडला तर ५,२०० चराच्या माध्यमातून ४६ लाख ८० हजार लिटर पाणी जमिनीत मुरते. गावातील ११ विहिरी व २८ विंधन विहिरींचे पुर्नभरण करण्यात आले आहे. गावातील ९४ हेक्टरवर बांधबंदिस्ती करण्यात आली आहे. सांडपाणी मुरवण्यासाठी शोषखड्डेही तयार करण्यात आली आहेत.