शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दारूनिर्मिती करणारे हात गुंतले श्रमदानात

By admin | Updated: May 23, 2016 04:51 IST

दिशा मिळाली की गावची दशाही बदलते, याचा प्रत्यय अंबाजोगाई तालुक्यातील राडीतांडा या गावाने महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. ऊसतोडीसाठी जाणारे ग्रामस्थ व दारूनिर्मिती करणाऱ्या

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई (जि. बीड)दिशा मिळाली की गावची दशाही बदलते, याचा प्रत्यय अंबाजोगाई तालुक्यातील राडीतांडा या गावाने महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. ऊसतोडीसाठी जाणारे ग्रामस्थ व दारूनिर्मिती करणाऱ्या या गावकऱ्यांनी केवळ ४५ दिवसांत श्रमदानातून गावचे परिवर्तन घडवून आणले. परिवर्तनाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साध्य करून गावठी दारू बनवण्याचे बंद करण्याचा सामूहिक निर्धारही या गावाने केला आहे, हे येथे उल्लेखनीय!राडीतांडा हे ९५० लोकवस्तीचे गाव. गावात एकूण १५२ कुटुंबे राहतात. गेल्या येथील ग्रामस्थ ३० वर्षांपासून महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणी ऊसतोडीसाठी जातात. गावातील १७ कुटुंबे गावठी दारू बनवतात. या वर्षी भीषण दुष्काळाच्या स्थितीमुळे ऊसतोडीसाठी कुठूनही बोलावणे आले नाही. अशा स्थितीत उदरनिर्वाह करायचा कसा? या मुख्य समस्येचे निराकरण करण्यासाठी गावचे परिवर्तन हेच विकासाकडे नेऊ शकते, या उद्देशाने ज्ञान प्रबोधिनीचे समन्वयक प्रसाद चिक्षे, ग्रामसेवक विनोद देशमुख, यांनी ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांचे प्रबोधन केले. श्रमदानाच्या माध्यमातून गावात जलक्रांतीचे विविध कामे होऊ लागली. गेल्या ४५ दिवसांत ग्रामस्थांनी गावाचा संपूर्ण कायापालटच करून दाखविला.ग्रामस्थांनी श्रमदानातून गायरानात १५ फूट लांब व दोन फूट रूंद व दोन फूट खोल असे ५,२०० समान समपातळी चर खोदले. या प्रत्येक चरामध्ये एका पावसात ९०० लिटर पाणी जमिनीत मुरते. एकदा पाऊस पडला तर ५,२०० चराच्या माध्यमातून ४६ लाख ८० हजार लिटर पाणी जमिनीत मुरते. गावातील ११ विहिरी व २८ विंधन विहिरींचे पुर्नभरण करण्यात आले आहे. गावातील ९४ हेक्टरवर बांधबंदिस्ती करण्यात आली आहे. सांडपाणी मुरवण्यासाठी शोषखड्डेही तयार करण्यात आली आहेत.