शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सागरी मार्गाला पर्यावरण विभागाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 04:09 IST

प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदराचा विस्तार, नैना क्षेत्र आदींमुळे भविष्यात दळणवळणाचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे.

कमलाकर कांबळे।नवी मुंबई : प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदराचा विस्तार, नैना क्षेत्र आदींमुळे भविष्यात दळणवळणाचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीला पर्याय उपलब्ध करण्यासाठी महापालिकेने दोन सागरी मार्ग प्रस्तावित केले आहेत. वाशी-ठाणे व पामबीच मार्गाला समांतर असा वाशी ते बेलापूर अशा दोन सागर किनारी मार्गाच्या प्रकल्पाच्या खर्चाची जबाबदारी एमएमआरडीएने स्वीकारली आहे. परंतु पर्यावरण विभागाच्या मंजुरीअभावी या बहुद्देशीय प्रकल्पाला खीळ बसली आहे.शहराचा विस्तार होत असल्याने लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या सायन-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग व ठाणे-बेलापूर हे तीन मार्ग शहरवासीयांसाठी उपलब्ध आहेत. परंतु या मार्गावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूककोंडी होते आहे. यातच आता प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. त्यामुळे उपलब्ध रस्त्यांवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण पडणार आहे.ही वस्तुस्थिती लक्षात घेवून महापालिकेने दोन सागर किनारी मार्ग प्रस्तावित केले आहेत. या मार्गाच्या उभारणीसाठी पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक असल्याने महापालिकेने यापूर्वीच एमसीझेडएमएकडे प्रस्ताव सादर केला आहे. हे दोन्ही मार्ग खर्चिक आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने या दोन्ही मार्गाची निर्मिती करावी, असा पालिकेचा प्रस्ताव आहे. एमएमआरडीएने या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात वाशी ते ऐरोली दरम्यानच्या १२ किमी लांबीच्या मार्गाची निर्मिती होणार आहे. वाशीगाव येथून खाडी किनाºयावरून कोपरखैरणे, घणसोली, गोठीवली, रबाळे, ऐरोली व दिघा या उपनगरांसाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. सध्या मुंबईहून येणाºया वाहनांना या उपनगरांत जाण्यासाठी वाशी-कोपरखैरणे किंवा ठाणे-बेलापूर मार्गाचा अवलंब करावा लागतो. प्रस्तावित सागर किनारी मार्गावर उपनगरात प्रवेश करण्यासाठी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. असे असले तरी पर्यावरण विभागाच्या मंजुरीअभावी मागीलतीन वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहरअभियंता मोहन डगांवकर यांच्याशी बोलायला सांगितले. मात्र डगांवकर यांना वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.

प्रकल्पाचा खर्च ५०३८ कोटी अपेक्षित-वाशी ते ठाणे (१६.९ किमी) व वाशी ते बेलापूर (१0.५ कि.मी) या दोन प्रस्तावित आठ पदरी मार्गासाठी ५0३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च अवाढव्य व महापालिकेला झेपणारा नाही. शिवाय हे दोन्ही मार्ग एमएमआर क्षेत्रात येत असल्याने प्रादेशिक विकासाचा भाग म्हणून हा खर्च एमएमआरडीएने उचलावा, अशी विनंती महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यास एमएमआरडीएने तयारी दर्शविल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.