शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

सागरी मार्गाला पर्यावरण विभागाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 04:09 IST

प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदराचा विस्तार, नैना क्षेत्र आदींमुळे भविष्यात दळणवळणाचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे.

कमलाकर कांबळे।नवी मुंबई : प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदराचा विस्तार, नैना क्षेत्र आदींमुळे भविष्यात दळणवळणाचा मोठा प्रश्न उद्भवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतुकीला पर्याय उपलब्ध करण्यासाठी महापालिकेने दोन सागरी मार्ग प्रस्तावित केले आहेत. वाशी-ठाणे व पामबीच मार्गाला समांतर असा वाशी ते बेलापूर अशा दोन सागर किनारी मार्गाच्या प्रकल्पाच्या खर्चाची जबाबदारी एमएमआरडीएने स्वीकारली आहे. परंतु पर्यावरण विभागाच्या मंजुरीअभावी या बहुद्देशीय प्रकल्पाला खीळ बसली आहे.शहराचा विस्तार होत असल्याने लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या सायन-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग व ठाणे-बेलापूर हे तीन मार्ग शहरवासीयांसाठी उपलब्ध आहेत. परंतु या मार्गावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूककोंडी होते आहे. यातच आता प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने वेग घेतला आहे. त्यामुळे उपलब्ध रस्त्यांवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण पडणार आहे.ही वस्तुस्थिती लक्षात घेवून महापालिकेने दोन सागर किनारी मार्ग प्रस्तावित केले आहेत. या मार्गाच्या उभारणीसाठी पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक असल्याने महापालिकेने यापूर्वीच एमसीझेडएमएकडे प्रस्ताव सादर केला आहे. हे दोन्ही मार्ग खर्चिक आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने या दोन्ही मार्गाची निर्मिती करावी, असा पालिकेचा प्रस्ताव आहे. एमएमआरडीएने या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात वाशी ते ऐरोली दरम्यानच्या १२ किमी लांबीच्या मार्गाची निर्मिती होणार आहे. वाशीगाव येथून खाडी किनाºयावरून कोपरखैरणे, घणसोली, गोठीवली, रबाळे, ऐरोली व दिघा या उपनगरांसाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. सध्या मुंबईहून येणाºया वाहनांना या उपनगरांत जाण्यासाठी वाशी-कोपरखैरणे किंवा ठाणे-बेलापूर मार्गाचा अवलंब करावा लागतो. प्रस्तावित सागर किनारी मार्गावर उपनगरात प्रवेश करण्यासाठी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. असे असले तरी पर्यावरण विभागाच्या मंजुरीअभावी मागीलतीन वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहरअभियंता मोहन डगांवकर यांच्याशी बोलायला सांगितले. मात्र डगांवकर यांना वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.

प्रकल्पाचा खर्च ५०३८ कोटी अपेक्षित-वाशी ते ठाणे (१६.९ किमी) व वाशी ते बेलापूर (१0.५ कि.मी) या दोन प्रस्तावित आठ पदरी मार्गासाठी ५0३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च अवाढव्य व महापालिकेला झेपणारा नाही. शिवाय हे दोन्ही मार्ग एमएमआर क्षेत्रात येत असल्याने प्रादेशिक विकासाचा भाग म्हणून हा खर्च एमएमआरडीएने उचलावा, अशी विनंती महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यास एमएमआरडीएने तयारी दर्शविल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.