शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

६० मीटरपेक्षा खोल बोअरवेल खोदण्यास बंदी

By admin | Updated: October 9, 2015 02:28 IST

यावर्षीची दुष्काळीस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रात ६० मीटरपेक्षा जास्त खोलीचे बोअरवेल खोदण्यास बंदी घातली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शेतकरी किंवा नागरिकांवर

- दिगंबर जवादे,  गडचिरोलीयावर्षीची दुष्काळीस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रात ६० मीटरपेक्षा जास्त खोलीचे बोअरवेल खोदण्यास बंदी घातली आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शेतकरी किंवा नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.बागायती क्षेत्रात फळझाडांना वर्षभर पाणी द्यावे लागते. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील संत्राबेल्टमधील शेतकऱ्यांनी बोअरवेल खोदले आहेत. सततच्या उपशामुळे पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. सर्वसाधारणपणे बोअरवेलची खोली ६० मीटर असते. मात्र स्पर्धेमुळे बोअरवेलची खोली २०० ते ३०० मीटरपर्यंत गेली आहे. शासनाने त्यालाच आळा घातला आहे.राज्यात यावर्षी केवळ ५४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ज्या तालुक्यांमध्ये पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात आहे, अशा गावांमध्ये कृषी तसेच औद्योगिक वापरासाठी खोल विहीर खोदण्यास बंदी घातली आहे. याबाबतच्या सूचना उपविभागीय अधिकारी व भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. संबंधित विभागाचे उपविभागीय अधिकारी व जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून पूर्वपरवानगी मिळाल्यानंतरच ६० मीटरपेक्षा अधिक खोलीचे बोअरवेल खोदता येईल.अंमलबजावणीची अडचणनवीन विहीर खोदण्यास तसेच ६० मीटरच्या वर बोअरवेलचे खोदकाम करण्यास बंदी घातली असली तरी शेतकरी खासगी मशीनच्या साहाय्याने बोअरवेल खोदतात. त्यासाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही. परिणामी कोणी किती मीटर खोल बोअरवेल खोदले आहे, याची माहिती प्रशासकीय यंत्रणेला मिळत नाही. हे ध्यानी घेता, शासनाने घेतलेला निर्णय योग्य असला तरी त्याची अंमलबजावणी करणे अत्यंत कठीण असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे.