शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

पाणीटंचाईमुळे महिलांनी धरली माहेरची वाट

By admin | Updated: April 27, 2016 06:33 IST

मौजा जनकापूर येथील नागरिकांना चक्क एका मैलावरून उन्हातान्हातून पाणी आणावे लागत आहे.

फारुख शेख,

पाटण-जिवती तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाटण ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या मौजा जनकापूर येथील नागरिकांना चक्क एका मैलावरून उन्हातान्हातून पाणी आणावे लागत आहे. तथापि, एवढी पायपीट केल्यानंतरही पाणी मिळेलच याची शाश्वती नसल्याने ग्रामस्थ विशेषत: महिला त्रस्त झाल्या आहेत. परिणामी काही महिलांनी वैतागून माहेरची वाट धरली आहे. जिवती तालुक्यातील मौजा जनकापूर येथे नळयोजनेची एक आणि गावातील एक अशा दोन विहिरी आहेत. या दोन्ही यंदा आटल्या असल्याने गावकऱ्यांना एक मैलावरील पाटण येथून पाणी आणावे लागत आहे. एक तर, जाण्या-येण्याचा वेळ तसेच तेथे गेल्यावरही तासन्तास पाणी मिळत नाही, अशी स्थिती असल्याने महिलांची घरातील कामे खोळंबतात. त्यामुळे त्या वैतागल्या आहेत. गावातील वच्छला पवार, शोभा जाधव, अनसूया पवार या विवाहित महिलांनी आपले माहेर गाठले आहे. घागरभर पाण्यासाठी दिवसभर विहिरीवर बसूनसुद्धा पाणीमिळत नाही. नेत्यांना व अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करूनसुद्धा कोणी गावात यायला तयार नाही,अशी माहिती उपसरपंच भीमराव पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.जनकापूर येथील पाण्याच्या समस्येबाबत आपण तहसीलदार यांना कळवले असून पत्रही दिले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. - नंदा गवळी,संवर्ग विकास अधिकारी, जिवती>यवतमाळात पाणीटंचाईने महिलांचा उद्रेकच्यवतमाळ : जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून सततच्या विवंचनेने आता संतापाची जागा घेतली आहे. याच संतापाचा उद्रेक मंगळवारी झाला. यवतमाळ तालुक्याच्या बोथबोडन येथील महिलांनी मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) कक्षात घागरी फोडून आपला संताप व्यक्त केला. च्बोथबोडन येथे गत दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. गावातील सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपाला पाण्याचा थेंब नाही. या गावाला अर्जुना तलावातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु जलस्रोत घटल्याने जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात असलेल्या या तलावावरून बोथबोडनचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे पाणीटंचाई आणखी तीव्र झाली. भर उन्हात पायपीट करून दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते.