शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईमुळे महिलांनी धरली माहेरची वाट

By admin | Updated: April 27, 2016 06:33 IST

मौजा जनकापूर येथील नागरिकांना चक्क एका मैलावरून उन्हातान्हातून पाणी आणावे लागत आहे.

फारुख शेख,

पाटण-जिवती तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाटण ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या मौजा जनकापूर येथील नागरिकांना चक्क एका मैलावरून उन्हातान्हातून पाणी आणावे लागत आहे. तथापि, एवढी पायपीट केल्यानंतरही पाणी मिळेलच याची शाश्वती नसल्याने ग्रामस्थ विशेषत: महिला त्रस्त झाल्या आहेत. परिणामी काही महिलांनी वैतागून माहेरची वाट धरली आहे. जिवती तालुक्यातील मौजा जनकापूर येथे नळयोजनेची एक आणि गावातील एक अशा दोन विहिरी आहेत. या दोन्ही यंदा आटल्या असल्याने गावकऱ्यांना एक मैलावरील पाटण येथून पाणी आणावे लागत आहे. एक तर, जाण्या-येण्याचा वेळ तसेच तेथे गेल्यावरही तासन्तास पाणी मिळत नाही, अशी स्थिती असल्याने महिलांची घरातील कामे खोळंबतात. त्यामुळे त्या वैतागल्या आहेत. गावातील वच्छला पवार, शोभा जाधव, अनसूया पवार या विवाहित महिलांनी आपले माहेर गाठले आहे. घागरभर पाण्यासाठी दिवसभर विहिरीवर बसूनसुद्धा पाणीमिळत नाही. नेत्यांना व अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करूनसुद्धा कोणी गावात यायला तयार नाही,अशी माहिती उपसरपंच भीमराव पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.जनकापूर येथील पाण्याच्या समस्येबाबत आपण तहसीलदार यांना कळवले असून पत्रही दिले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. - नंदा गवळी,संवर्ग विकास अधिकारी, जिवती>यवतमाळात पाणीटंचाईने महिलांचा उद्रेकच्यवतमाळ : जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून सततच्या विवंचनेने आता संतापाची जागा घेतली आहे. याच संतापाचा उद्रेक मंगळवारी झाला. यवतमाळ तालुक्याच्या बोथबोडन येथील महिलांनी मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) कक्षात घागरी फोडून आपला संताप व्यक्त केला. च्बोथबोडन येथे गत दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. गावातील सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपाला पाण्याचा थेंब नाही. या गावाला अर्जुना तलावातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु जलस्रोत घटल्याने जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात असलेल्या या तलावावरून बोथबोडनचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे पाणीटंचाई आणखी तीव्र झाली. भर उन्हात पायपीट करून दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते.