शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

पाणीटंचाईमुळे ‘हागणदारीमुक्ती’ बारगळली

By admin | Updated: May 6, 2016 02:14 IST

राज्यातील यंदाच्या भीषण पाणीटंचाईचा फटका शासनाच्या हागणदारीमुक्त गाव अभियानालाही बसला आहे. प्यायलाच पाणी नसल्याने शौचालयाच्या स्वच्छतेसाठी कुठून आणणार, असा

- अतुल जयस्वाल, अकोला

राज्यातील यंदाच्या भीषण पाणीटंचाईचा फटका शासनाच्या हागणदारीमुक्त गाव अभियानालाही बसला आहे. प्यायलाच पाणी नसल्याने शौचालयाच्या स्वच्छतेसाठी कुठून आणणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी आता शौचविधीसाठी पुन्हा ‘बाहेर’चा मार्ग पत्करला आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात अकोला जिल्ह्यातील १६८ गावे हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ठेवले होते. मार्च २०१६ अखेरपर्यंत जिल्ह्यात या अभियानास उत्तम प्रतिसाद मिळून ६८ गावे हागणदारीमुक्त घोषित केली गेली.मात्र, यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खांबोरा ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तर अभूतपूर्व जलसंकट निर्माण झाले. प्यायला पाणी मिळणेही दुरापास्त झाले. पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे, तिथे शौचालयासाठी पाणी कुठून आणणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थ शौचविधीसाठी गावाबाहेरील रस्ता, माळरान किंवा नदीकाठाचा वापर करताना दिसून येत आहेत.उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र झाल्याने नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शौचालयाचा वापर टाळण्याकडे लोकांचा कल आहे. हागणदारीमुक्त झालेल्या गावांतील स्वच्छता समितीने लोकांना शौचालय वापरण्यासाठी प्रवृत्त करावे.- समर्थ शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, अकोला

शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही आमचे गाव हागणदारीमुक्त केले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालये उभारून लोकांना त्याचा वापर करण्यास प्रवृत्त केले. आता पाणीटंचाईने कळस गाठला आहे. त्यामुळे लोकांना नाइलाजाने शौचासाठी बाहेर जावे लागत आहे. पुरेसा पाणीपुरवठा झाल्यास ही समस्या निकाली निघेल. - सुनील परनाटे, सरपंच, निराट, अकोला