शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

पाणीटंचाईमुळे ‘हागणदारीमुक्ती’ बारगळली

By admin | Updated: May 6, 2016 02:14 IST

राज्यातील यंदाच्या भीषण पाणीटंचाईचा फटका शासनाच्या हागणदारीमुक्त गाव अभियानालाही बसला आहे. प्यायलाच पाणी नसल्याने शौचालयाच्या स्वच्छतेसाठी कुठून आणणार, असा

- अतुल जयस्वाल, अकोला

राज्यातील यंदाच्या भीषण पाणीटंचाईचा फटका शासनाच्या हागणदारीमुक्त गाव अभियानालाही बसला आहे. प्यायलाच पाणी नसल्याने शौचालयाच्या स्वच्छतेसाठी कुठून आणणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी आता शौचविधीसाठी पुन्हा ‘बाहेर’चा मार्ग पत्करला आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात अकोला जिल्ह्यातील १६८ गावे हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ठेवले होते. मार्च २०१६ अखेरपर्यंत जिल्ह्यात या अभियानास उत्तम प्रतिसाद मिळून ६८ गावे हागणदारीमुक्त घोषित केली गेली.मात्र, यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खांबोरा ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तर अभूतपूर्व जलसंकट निर्माण झाले. प्यायला पाणी मिळणेही दुरापास्त झाले. पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे, तिथे शौचालयासाठी पाणी कुठून आणणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थ शौचविधीसाठी गावाबाहेरील रस्ता, माळरान किंवा नदीकाठाचा वापर करताना दिसून येत आहेत.उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र झाल्याने नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शौचालयाचा वापर टाळण्याकडे लोकांचा कल आहे. हागणदारीमुक्त झालेल्या गावांतील स्वच्छता समितीने लोकांना शौचालय वापरण्यासाठी प्रवृत्त करावे.- समर्थ शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, अकोला

शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही आमचे गाव हागणदारीमुक्त केले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालये उभारून लोकांना त्याचा वापर करण्यास प्रवृत्त केले. आता पाणीटंचाईने कळस गाठला आहे. त्यामुळे लोकांना नाइलाजाने शौचासाठी बाहेर जावे लागत आहे. पुरेसा पाणीपुरवठा झाल्यास ही समस्या निकाली निघेल. - सुनील परनाटे, सरपंच, निराट, अकोला