शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

पाणीटंचाईमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत

By admin | Updated: June 11, 2016 02:59 IST

शेतकरी हरिभाऊ शेकटे यांना पाण्याच्या टंचाईला कंटाळून भाजीपाला शेती अर्धवट सोडून द्यावी लागली आहे.

कर्जत : तालुक्यातील पिंपळोली गावातील शेतकरी हरिभाऊ शेकटे यांना पाण्याच्या टंचाईला कंटाळून भाजीपाला शेती अर्धवट सोडून द्यावी लागली आहे. परिणामी या शेतकऱ्याने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी भाजीपाल्याचे पीक पाण्याअभावी हातून गेल्याने हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.नेरळ-गुडवन रस्त्यावर असलेल्या पिंपळोली गावातील अनेक शेतकरी चिल्लार नदीच्या पाण्याचा उपयोग करून उन्हाळ्यात भाजीपाला शेती करतात. उल्हास नदीला जाऊन मिळणारी चिल्लार नदी बारमाही वाहत नाही तर पावसाळा वगळता कोरडी असते. मात्र शासनाने अनेक ठिकाणी कोल्हापूर टाईपचे सिमेंट बंधारे बांधल्यामुळे त्या त्या भागात काही प्रमाणात तेथे पाण्याचा साठा उन्हाळ्यातील काही महिने असतो. त्या पाण्याचा उपयोग करून अनेक शेतकरी नदीपात्राच्या परिसरात भाजीपाला शेती करतात. पिंपळोली गावातील हरिभाऊ शेकटे यांनी पिंपळोली गावापासून काळेवाडीकडे जाणाऱ्या आपल्या जमिनीमध्ये पडवळ भाजीची शेती केली होती. चिल्लार नदीच्या पात्रातून पाणी पंप लावून ते रस्त्या पलीकडे असलेल्या आपल्या शेतात आणायचे. तेथे २० गुंठे जमिनीमध्ये वाफे पद्धतीने तारेचे कुंपण घालून पडवळ भाजीची शेती केली होती. चिल्लार नदीमधले पाणी एप्रिल महिन्यात आटले. त्यामुळे चिंतेत सापडलेल्या हरिभाऊ शेकटे यांना त्या भागातील काही शेतकरी सहकारी यांनी सहकार्य करीत दूरवर भाजीपाला शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले. परंतु तेथून पाणी आणणे खर्चिक असल्याने आणि तेथील पाणी देखील आटून गेल्याने त्या भागातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला शेती अर्धवट सोडून दिली. त्यामुळे शेकटे यांच्यासारखे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांनी शेतीसाठी घेतलेले कर्ज देखील पाण्याच्या टंचाईमुळे फेडता आले नाही. (वार्ताहर)