शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

पाणीटंचाईमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत

By admin | Updated: June 11, 2016 02:59 IST

शेतकरी हरिभाऊ शेकटे यांना पाण्याच्या टंचाईला कंटाळून भाजीपाला शेती अर्धवट सोडून द्यावी लागली आहे.

कर्जत : तालुक्यातील पिंपळोली गावातील शेतकरी हरिभाऊ शेकटे यांना पाण्याच्या टंचाईला कंटाळून भाजीपाला शेती अर्धवट सोडून द्यावी लागली आहे. परिणामी या शेतकऱ्याने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी भाजीपाल्याचे पीक पाण्याअभावी हातून गेल्याने हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.नेरळ-गुडवन रस्त्यावर असलेल्या पिंपळोली गावातील अनेक शेतकरी चिल्लार नदीच्या पाण्याचा उपयोग करून उन्हाळ्यात भाजीपाला शेती करतात. उल्हास नदीला जाऊन मिळणारी चिल्लार नदी बारमाही वाहत नाही तर पावसाळा वगळता कोरडी असते. मात्र शासनाने अनेक ठिकाणी कोल्हापूर टाईपचे सिमेंट बंधारे बांधल्यामुळे त्या त्या भागात काही प्रमाणात तेथे पाण्याचा साठा उन्हाळ्यातील काही महिने असतो. त्या पाण्याचा उपयोग करून अनेक शेतकरी नदीपात्राच्या परिसरात भाजीपाला शेती करतात. पिंपळोली गावातील हरिभाऊ शेकटे यांनी पिंपळोली गावापासून काळेवाडीकडे जाणाऱ्या आपल्या जमिनीमध्ये पडवळ भाजीची शेती केली होती. चिल्लार नदीच्या पात्रातून पाणी पंप लावून ते रस्त्या पलीकडे असलेल्या आपल्या शेतात आणायचे. तेथे २० गुंठे जमिनीमध्ये वाफे पद्धतीने तारेचे कुंपण घालून पडवळ भाजीची शेती केली होती. चिल्लार नदीमधले पाणी एप्रिल महिन्यात आटले. त्यामुळे चिंतेत सापडलेल्या हरिभाऊ शेकटे यांना त्या भागातील काही शेतकरी सहकारी यांनी सहकार्य करीत दूरवर भाजीपाला शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले. परंतु तेथून पाणी आणणे खर्चिक असल्याने आणि तेथील पाणी देखील आटून गेल्याने त्या भागातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला शेती अर्धवट सोडून दिली. त्यामुळे शेकटे यांच्यासारखे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांनी शेतीसाठी घेतलेले कर्ज देखील पाण्याच्या टंचाईमुळे फेडता आले नाही. (वार्ताहर)