शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
3
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
4
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
5
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
6
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
7
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
9
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
10
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
11
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
12
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
13
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
14
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
15
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
16
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
17
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
18
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
19
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
20
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल

पाणीटंचाईमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत

By admin | Updated: June 11, 2016 02:59 IST

शेतकरी हरिभाऊ शेकटे यांना पाण्याच्या टंचाईला कंटाळून भाजीपाला शेती अर्धवट सोडून द्यावी लागली आहे.

कर्जत : तालुक्यातील पिंपळोली गावातील शेतकरी हरिभाऊ शेकटे यांना पाण्याच्या टंचाईला कंटाळून भाजीपाला शेती अर्धवट सोडून द्यावी लागली आहे. परिणामी या शेतकऱ्याने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी भाजीपाल्याचे पीक पाण्याअभावी हातून गेल्याने हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.नेरळ-गुडवन रस्त्यावर असलेल्या पिंपळोली गावातील अनेक शेतकरी चिल्लार नदीच्या पाण्याचा उपयोग करून उन्हाळ्यात भाजीपाला शेती करतात. उल्हास नदीला जाऊन मिळणारी चिल्लार नदी बारमाही वाहत नाही तर पावसाळा वगळता कोरडी असते. मात्र शासनाने अनेक ठिकाणी कोल्हापूर टाईपचे सिमेंट बंधारे बांधल्यामुळे त्या त्या भागात काही प्रमाणात तेथे पाण्याचा साठा उन्हाळ्यातील काही महिने असतो. त्या पाण्याचा उपयोग करून अनेक शेतकरी नदीपात्राच्या परिसरात भाजीपाला शेती करतात. पिंपळोली गावातील हरिभाऊ शेकटे यांनी पिंपळोली गावापासून काळेवाडीकडे जाणाऱ्या आपल्या जमिनीमध्ये पडवळ भाजीची शेती केली होती. चिल्लार नदीच्या पात्रातून पाणी पंप लावून ते रस्त्या पलीकडे असलेल्या आपल्या शेतात आणायचे. तेथे २० गुंठे जमिनीमध्ये वाफे पद्धतीने तारेचे कुंपण घालून पडवळ भाजीची शेती केली होती. चिल्लार नदीमधले पाणी एप्रिल महिन्यात आटले. त्यामुळे चिंतेत सापडलेल्या हरिभाऊ शेकटे यांना त्या भागातील काही शेतकरी सहकारी यांनी सहकार्य करीत दूरवर भाजीपाला शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले. परंतु तेथून पाणी आणणे खर्चिक असल्याने आणि तेथील पाणी देखील आटून गेल्याने त्या भागातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला शेती अर्धवट सोडून दिली. त्यामुळे शेकटे यांच्यासारखे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांनी शेतीसाठी घेतलेले कर्ज देखील पाण्याच्या टंचाईमुळे फेडता आले नाही. (वार्ताहर)