शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
3
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
4
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
5
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
6
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
7
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
8
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
9
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
10
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
11
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
12
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
13
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
14
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
15
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
16
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
17
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
18
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

भिंतीमुळे घिवलीत पाणीटंचाई

By admin | Updated: May 30, 2016 02:42 IST

घिवली गावातील विहिरी गेल्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे

पंकज राऊत,

बोईसर- तारापूर अणुउर्जा केंद्र व भाभा अणु संशोधन प्रकल्पाच्या संरक्षणासाठी बांधलेल्या भिंतीपलिकडे घिवली गावातील विहिरी गेल्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. दोन ते तीन किमी. अंतरावरून दिवसरात्र वणवण फिरून हंडाभर पाणी आणावे लागत आहे. कधी तेही मिळत नाही त्यामुळे पडीक विहिर अथवा खड्डे यातील दूषित पाणी वापरावे लागते आहे. भारतातील पहिल्या तारापूर अणुउर्जा प्रकल्पातील दोन अणुभट्टया व बीएआरसी या दोन्ही प्रकल्पापासून घिवली गाव १.६ किमी. त्रिज्येच्या आत म्हणजे अवघ्या १ कि.मी. असून १९६७-६८ च्या दरम्यान याच गावातील सोन्यासारखी घरे व जमिनी कवडी मोलाने प्रकल्पाकरीता घेतल्यानंतर सुमारे शंभर कुटुंबांचे नवी देलवाडी येथे पुनर्वसन त्यावेळी करण्यात आले तर १९८२ साली गावातील बारा कुटुंबांची घरे, जमीन घेऊन त्यांचेही इतरत्र पुनर्वसन करण्यात आले असून अणु प्रकल्पाच्या १.६ कि.मी. त्रिज्येच्या असलेल्या घिवली गावातील शेकडो कुटुंबे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत.या गावाची लोकसंख्या सुमारे चार हजार असून या गावात पिढीजात पूर्वीपासून अकरा विहीरी होत्या. त्यापैकी तीन ते चार विहिरींचे पाणी पिण्यासाठी बरीच वर्षे वापरात होते मात्र अणुउर्जा केंद्राने या गावाच्या तिन्ही दिशांना सुमारे पंधरा फुट उंच मजबूत संरक्षक भिंत बांधल्याने या विहिरी भिंती पलीकडे म्हणजेच अणुकेंद्राच्या हद्दीत गेल्यात. गावात अवघ्या तीन विहीरी शिल्लक राहील्या परंतु त्यांचे पाणी अत्यंत दूषित खारट, गढूळ आणि पिण्यास अयोग्य असतांनाही ते पाणी गाळून व उकळून त्यात तुरटी फिरवून वापरावे लागते आहे. १९८६-८७ च्या दरम्यान घिवली गावांतील विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा प्रयोगशाळेच्या आलेल्या अहवालानंतर तारापूर अणुउर्जा केंद्राने महारष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माधमातून नळ पाणी योजना सुरू केली मात्र तिची पाणी पाईप लाईन दुरून व वळसा घेऊन टाकल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरेशा दाबाने मिळण्यांत अडथळे येत होते परिणामी पाण्याचे बिल थकत गेले व त्याची रक्कम आता २७ लाखाच्या घरात गेल्याने पाच-सहा महिन्यापासून नळपाणी योजना बंदच आहे. त्यामुळे येथील रहिवाशांवर हेची फल काय मम तपाला असा टाहो फोडण्याची वेळ आली आहे.