शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
3
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
4
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
5
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
6
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
7
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
8
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
9
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
10
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
11
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
12
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
13
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
14
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
15
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
16
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
17
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
18
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
19
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
20
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम

भिंतीमुळे घिवलीत पाणीटंचाई

By admin | Updated: May 30, 2016 02:42 IST

घिवली गावातील विहिरी गेल्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे

पंकज राऊत,

बोईसर- तारापूर अणुउर्जा केंद्र व भाभा अणु संशोधन प्रकल्पाच्या संरक्षणासाठी बांधलेल्या भिंतीपलिकडे घिवली गावातील विहिरी गेल्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. दोन ते तीन किमी. अंतरावरून दिवसरात्र वणवण फिरून हंडाभर पाणी आणावे लागत आहे. कधी तेही मिळत नाही त्यामुळे पडीक विहिर अथवा खड्डे यातील दूषित पाणी वापरावे लागते आहे. भारतातील पहिल्या तारापूर अणुउर्जा प्रकल्पातील दोन अणुभट्टया व बीएआरसी या दोन्ही प्रकल्पापासून घिवली गाव १.६ किमी. त्रिज्येच्या आत म्हणजे अवघ्या १ कि.मी. असून १९६७-६८ च्या दरम्यान याच गावातील सोन्यासारखी घरे व जमिनी कवडी मोलाने प्रकल्पाकरीता घेतल्यानंतर सुमारे शंभर कुटुंबांचे नवी देलवाडी येथे पुनर्वसन त्यावेळी करण्यात आले तर १९८२ साली गावातील बारा कुटुंबांची घरे, जमीन घेऊन त्यांचेही इतरत्र पुनर्वसन करण्यात आले असून अणु प्रकल्पाच्या १.६ कि.मी. त्रिज्येच्या असलेल्या घिवली गावातील शेकडो कुटुंबे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत.या गावाची लोकसंख्या सुमारे चार हजार असून या गावात पिढीजात पूर्वीपासून अकरा विहीरी होत्या. त्यापैकी तीन ते चार विहिरींचे पाणी पिण्यासाठी बरीच वर्षे वापरात होते मात्र अणुउर्जा केंद्राने या गावाच्या तिन्ही दिशांना सुमारे पंधरा फुट उंच मजबूत संरक्षक भिंत बांधल्याने या विहिरी भिंती पलीकडे म्हणजेच अणुकेंद्राच्या हद्दीत गेल्यात. गावात अवघ्या तीन विहीरी शिल्लक राहील्या परंतु त्यांचे पाणी अत्यंत दूषित खारट, गढूळ आणि पिण्यास अयोग्य असतांनाही ते पाणी गाळून व उकळून त्यात तुरटी फिरवून वापरावे लागते आहे. १९८६-८७ च्या दरम्यान घिवली गावांतील विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा प्रयोगशाळेच्या आलेल्या अहवालानंतर तारापूर अणुउर्जा केंद्राने महारष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माधमातून नळ पाणी योजना सुरू केली मात्र तिची पाणी पाईप लाईन दुरून व वळसा घेऊन टाकल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरेशा दाबाने मिळण्यांत अडथळे येत होते परिणामी पाण्याचे बिल थकत गेले व त्याची रक्कम आता २७ लाखाच्या घरात गेल्याने पाच-सहा महिन्यापासून नळपाणी योजना बंदच आहे. त्यामुळे येथील रहिवाशांवर हेची फल काय मम तपाला असा टाहो फोडण्याची वेळ आली आहे.