शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

राज्यकर्त्यांच्या उफराटा कारभारामुळे बळीराजाची कोंडी - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 27, 2017 08:05 IST

शिवसेनेने विरोधकांसारखे वागणे सोडून द्यावे यासाठी भाजापाकडून शिवसेनेची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना मात्र..

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 27 - शिवसेनेने विरोधकांसारखे वागणे सोडून द्यावे यासाठी भाजापाकडून शिवसेनेची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना मात्र सरकार विरोधाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून, रोजच्या सामनाच्या अग्रलेखातून याचा प्रत्यय येत आहे. मंत्रालयात रामेश्वर हरिभाऊ भुसारे या शेतक-याला झालेल्या मारहाणीच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 
 
रामेश्वर हरिभाऊ भुसारे हे त्या सर्व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे नुकसानीची भरपाई मागण्यासाठी गेले. पण त्यांच्या नशिबी शेवटी पोलिसांच्या लाथा आल्या. रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांच्या नशिबी हे असे ‘अच्छे दिन’ आले आहेत! अशा शब्दात उद्धव यांनी आपल्याच सरकारवर टीका केली आहे. नुकसानीची भरपाई मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यास मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर पोलिसांनी बेदम मारून फरफटत खाली आणले. हे संतापजनक तर आहेच, पण त्यापेक्षाही निर्दयपणाचे आणि लाजिरवाणे असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.  
 
कर्जमुक्ती करू नका. नुकसानभरपाई देऊ नका, पण शेतकऱ्यांना असे लाथाबुक्क्यांनी तुडवू तरी नका. एकीकडे निसर्गाचा लहरी कारभार आणि दुसरीकडे राज्यकर्त्यांचा उफराटा कारभार अशा कोंडीत बळीराजा सापडला आहे असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
 
- रामेश्वर हरिभाऊ भुसारे हे त्या सर्व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे नुकसानीची भरपाई मागण्यासाठी गेले. त्यांच्या नशिबी शेवटी पोलिसांच्या लाथा आल्या. कर्जमुक्ती नाही, नुकसानभरपाई नाही, प्रेमाचे व आधाराचे दोन शब्ददेखील त्यांच्या वाट्याला आले नाहीत. रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांच्या नशिबी हे असे ‘अच्छे दिन’ आले आहेत! रामेश्वर भुसारे तुम्हीच सांगा, आता काय करायचे? एक नम्र विनंती तुमच्या कुटुंबासाठी, कृपा करून आत्महत्येच्या मार्गाने जाऊ नका!
 
-  शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून विधानसभेत रणकंदन सुरू असतानाच महाराष्ट्राच्या मंत्रालयात शेतकऱ्याचे रक्त सांडले आहे. कर्जमुक्तीसाठी आंदोलन करणाऱया 19 आमदारांना सरकारने निलंबित केले आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यास मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर पोलिसांनी बेदम मारून फरफटत खाली आणले. हे संतापजनक तर आहेच, पण त्यापेक्षाही निर्दयपणाचे आणि लाजिरवाणे आहे. संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांची रक्तबंबाळ अवस्थेतील छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. अंगावर शहारे आणणारा हा सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर घडावा याचे दुःख वाटते. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत पारदर्शकपणे जाहीर केले आहे की, ‘‘कर्जमुक्ती होणार नाही.’’ निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने लोकांनी विसरून जावीत. ‘‘कर्जमुक्ती केल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची ‘हमी’ देता काय?’’ असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. रामेश्वर हरिभाऊ भुसारे बहुधा अशी हमी देण्यासाठीच मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले असावेत. 2015 साली झालेल्या गारपिटीत त्यांचे प्रचंड नुकसान झाले.
 
-  ‘‘कर्जमुक्तीचे नंतर पाहू, निदान नुकसानभरपाई तरी द्या’’ असे विनवण्यासाठी ते आले व पोलिसांनी त्यांना झोडपून काढले, पण उलटा प्रकार असा की, पोलिसांनी सांगितले, ‘‘त्यांना  मारहाण वगैरे काही झाली नाही. उलट त्यांनीच पोलिसांना चावे घेतले व स्वतःस जखमा करून घेतल्या.’’ पोलिसांचे हे सांगणे धादांत खोटे व मुख्यमंत्र्यांची बदनामी करणारे आहे. एक निःशस्त्र, भुकेने व्याकूळ झालेला हतबल शेतकरी सशस्त्र व आडदांड पोलिसांचे चावे घेतो व आमचे पोलीस हे चावे सहन करतात यावर मुख्यमंत्र्यांनी विश्वास तरी कसा ठेवला? कर्जमुक्ती करू नका. नुकसानभरपाई देऊ नका, पण शेतकऱ्यांना असे लाथाबुक्क्यांनी तुडवू तरी नका. शेतकरी चावे घेतो म्हणजे काय? तो काय पिसाळलेला कुत्रा आहे काय? यंदा मान्सून चांगला गेला, त्यामुळे पीकपाणी बरे आले हे खरे आहे. मात्र आधीचा चार-पाच वर्षांचा दुष्काळ, नापिकी, अधूनमधून बसणारा गारपिटीचा तडाखा यामुळे सामान्य शेतकरी पिचून गेला आहे. केवळ एका वर्षाच्या चांगल्या मान्सूनने तो खंबीरपणे उभा राहील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. पुन्हा आताही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा खरीप पिकाला बसलाच आहे. 
 
- शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास त्यामुळे हिरावून घेतला गेला आहे. सरकारने नेहमीप्रमाणे नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आणि नुकसानभरपाई देण्याचे वायदे केले आहेत. मात्र येथे 2015 मधील गारपिटीची नुकसानभरपाई  रामेश्वर भुसारे यांना अद्यापि मिळालेली नाही. ती त्यांनी मागितली तर त्यांना पोलिसी लाथबुक्क्यांचा ‘प्रसाद’ खावा लागला. पुन्हा त्यांनीच चावे वगैरे घेतल्याच्या उलट्या बोंबाही ऐकून घ्याव्या लागल्या. एकीकडे निसर्गाचा लहरी कारभार आणि दुसरीकडे राज्यकर्त्यांचा उफराटा कारभार अशा कोंडीत बळीराजा सापडला आहे. तो हतबल होतो आणि शेती करण्याची ऊर्मी हरवून बसतो तो त्यामुळेच. काँग्रेस राजवटीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा त्यातल्या अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू दारू पिऊन झाल्याची मुक्ताफळे काँग्रेस पुढाऱ्यांनी उधळलीच होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रेमभंगामुळे होत असल्याचे इरसाल विधानही तेव्हा झाले. होय, शेती ही त्यांची आई, बायको, प्रेयसीच आहे व तिचे हे भयंकर नुकसान झालेले पाहून प्रेमभंगच होतो. रामेश्वर हरिभाऊ भुसारे हे त्या सर्व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे नुकसानीची भरपाई मागण्यासाठी गेले. त्यांच्या नशिबी शेवटी पोलिसांच्या लाथा आल्या. कर्जमुक्ती नाही, नुकसानभरपाई नाही, प्रेमाचे व आधाराचे दोन शब्ददेखील त्यांच्या वाट्याला आले नाहीत. रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांच्या नशिबी हे असे ‘अच्छे दिन’ आले आहेत! रामेश्वर भुसारे तुम्हीच सांगा, आता काय करायचे? एक नम्र विनंती तुमच्या कुटुंबासाठी, कृपा करून आत्महत्येच्या मार्गाने जाऊ नका!