शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

राज्यकर्त्यांच्या उफराटा कारभारामुळे बळीराजाची कोंडी - उद्धव ठाकरे

By admin | Updated: March 27, 2017 08:05 IST

शिवसेनेने विरोधकांसारखे वागणे सोडून द्यावे यासाठी भाजापाकडून शिवसेनेची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना मात्र..

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 27 - शिवसेनेने विरोधकांसारखे वागणे सोडून द्यावे यासाठी भाजापाकडून शिवसेनेची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवसेना मात्र सरकार विरोधाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून, रोजच्या सामनाच्या अग्रलेखातून याचा प्रत्यय येत आहे. मंत्रालयात रामेश्वर हरिभाऊ भुसारे या शेतक-याला झालेल्या मारहाणीच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 
 
रामेश्वर हरिभाऊ भुसारे हे त्या सर्व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे नुकसानीची भरपाई मागण्यासाठी गेले. पण त्यांच्या नशिबी शेवटी पोलिसांच्या लाथा आल्या. रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांच्या नशिबी हे असे ‘अच्छे दिन’ आले आहेत! अशा शब्दात उद्धव यांनी आपल्याच सरकारवर टीका केली आहे. नुकसानीची भरपाई मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यास मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर पोलिसांनी बेदम मारून फरफटत खाली आणले. हे संतापजनक तर आहेच, पण त्यापेक्षाही निर्दयपणाचे आणि लाजिरवाणे असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.  
 
कर्जमुक्ती करू नका. नुकसानभरपाई देऊ नका, पण शेतकऱ्यांना असे लाथाबुक्क्यांनी तुडवू तरी नका. एकीकडे निसर्गाचा लहरी कारभार आणि दुसरीकडे राज्यकर्त्यांचा उफराटा कारभार अशा कोंडीत बळीराजा सापडला आहे असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
 
- रामेश्वर हरिभाऊ भुसारे हे त्या सर्व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे नुकसानीची भरपाई मागण्यासाठी गेले. त्यांच्या नशिबी शेवटी पोलिसांच्या लाथा आल्या. कर्जमुक्ती नाही, नुकसानभरपाई नाही, प्रेमाचे व आधाराचे दोन शब्ददेखील त्यांच्या वाट्याला आले नाहीत. रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांच्या नशिबी हे असे ‘अच्छे दिन’ आले आहेत! रामेश्वर भुसारे तुम्हीच सांगा, आता काय करायचे? एक नम्र विनंती तुमच्या कुटुंबासाठी, कृपा करून आत्महत्येच्या मार्गाने जाऊ नका!
 
-  शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून विधानसभेत रणकंदन सुरू असतानाच महाराष्ट्राच्या मंत्रालयात शेतकऱ्याचे रक्त सांडले आहे. कर्जमुक्तीसाठी आंदोलन करणाऱया 19 आमदारांना सरकारने निलंबित केले आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यास मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर पोलिसांनी बेदम मारून फरफटत खाली आणले. हे संतापजनक तर आहेच, पण त्यापेक्षाही निर्दयपणाचे आणि लाजिरवाणे आहे. संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांची रक्तबंबाळ अवस्थेतील छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. अंगावर शहारे आणणारा हा सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर घडावा याचे दुःख वाटते. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत पारदर्शकपणे जाहीर केले आहे की, ‘‘कर्जमुक्ती होणार नाही.’’ निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने लोकांनी विसरून जावीत. ‘‘कर्जमुक्ती केल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील याची ‘हमी’ देता काय?’’ असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. रामेश्वर हरिभाऊ भुसारे बहुधा अशी हमी देण्यासाठीच मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले असावेत. 2015 साली झालेल्या गारपिटीत त्यांचे प्रचंड नुकसान झाले.
 
-  ‘‘कर्जमुक्तीचे नंतर पाहू, निदान नुकसानभरपाई तरी द्या’’ असे विनवण्यासाठी ते आले व पोलिसांनी त्यांना झोडपून काढले, पण उलटा प्रकार असा की, पोलिसांनी सांगितले, ‘‘त्यांना  मारहाण वगैरे काही झाली नाही. उलट त्यांनीच पोलिसांना चावे घेतले व स्वतःस जखमा करून घेतल्या.’’ पोलिसांचे हे सांगणे धादांत खोटे व मुख्यमंत्र्यांची बदनामी करणारे आहे. एक निःशस्त्र, भुकेने व्याकूळ झालेला हतबल शेतकरी सशस्त्र व आडदांड पोलिसांचे चावे घेतो व आमचे पोलीस हे चावे सहन करतात यावर मुख्यमंत्र्यांनी विश्वास तरी कसा ठेवला? कर्जमुक्ती करू नका. नुकसानभरपाई देऊ नका, पण शेतकऱ्यांना असे लाथाबुक्क्यांनी तुडवू तरी नका. शेतकरी चावे घेतो म्हणजे काय? तो काय पिसाळलेला कुत्रा आहे काय? यंदा मान्सून चांगला गेला, त्यामुळे पीकपाणी बरे आले हे खरे आहे. मात्र आधीचा चार-पाच वर्षांचा दुष्काळ, नापिकी, अधूनमधून बसणारा गारपिटीचा तडाखा यामुळे सामान्य शेतकरी पिचून गेला आहे. केवळ एका वर्षाच्या चांगल्या मान्सूनने तो खंबीरपणे उभा राहील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. पुन्हा आताही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा खरीप पिकाला बसलाच आहे. 
 
- शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास त्यामुळे हिरावून घेतला गेला आहे. सरकारने नेहमीप्रमाणे नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आणि नुकसानभरपाई देण्याचे वायदे केले आहेत. मात्र येथे 2015 मधील गारपिटीची नुकसानभरपाई  रामेश्वर भुसारे यांना अद्यापि मिळालेली नाही. ती त्यांनी मागितली तर त्यांना पोलिसी लाथबुक्क्यांचा ‘प्रसाद’ खावा लागला. पुन्हा त्यांनीच चावे वगैरे घेतल्याच्या उलट्या बोंबाही ऐकून घ्याव्या लागल्या. एकीकडे निसर्गाचा लहरी कारभार आणि दुसरीकडे राज्यकर्त्यांचा उफराटा कारभार अशा कोंडीत बळीराजा सापडला आहे. तो हतबल होतो आणि शेती करण्याची ऊर्मी हरवून बसतो तो त्यामुळेच. काँग्रेस राजवटीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा त्यातल्या अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू दारू पिऊन झाल्याची मुक्ताफळे काँग्रेस पुढाऱ्यांनी उधळलीच होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रेमभंगामुळे होत असल्याचे इरसाल विधानही तेव्हा झाले. होय, शेती ही त्यांची आई, बायको, प्रेयसीच आहे व तिचे हे भयंकर नुकसान झालेले पाहून प्रेमभंगच होतो. रामेश्वर हरिभाऊ भुसारे हे त्या सर्व शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे नुकसानीची भरपाई मागण्यासाठी गेले. त्यांच्या नशिबी शेवटी पोलिसांच्या लाथा आल्या. कर्जमुक्ती नाही, नुकसानभरपाई नाही, प्रेमाचे व आधाराचे दोन शब्ददेखील त्यांच्या वाट्याला आले नाहीत. रामेश्वर हरिभाऊ भुसारे यांच्या नशिबी हे असे ‘अच्छे दिन’ आले आहेत! रामेश्वर भुसारे तुम्हीच सांगा, आता काय करायचे? एक नम्र विनंती तुमच्या कुटुंबासाठी, कृपा करून आत्महत्येच्या मार्गाने जाऊ नका!