शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे गाव सुन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 20:48 IST

पती-पत्नीने आत्महत्या केल्याने कुटुंबातील तीन बालके उघड्यावर आल्यामुळे गाव सुन्न झाले आहे.

ऑनलाइन लोकमतकुरूंदा, दि. 28 - वसमत तालुक्यातील कोठारी येथे पती-पत्नीने आत्महत्या केल्याने कुटुंबातील तीन बालके उघड्यावर आल्यामुळे गाव सुन्न झाले आहे. समाजमन हळहळले आहे. या लहान बालकांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. कोठारी येथे मयत बालाजी माधवराव पतंगे व वर्षा बालाजी पतंगे या दाम्पत्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. संवेदनशिल मनाचे लोक तर नि:शब्दच झाले. इतरांना किरकोळ वाटावे मात्र आर्थिक आपबितीमुळे पतंगे कुटुंबियांसमोरचा प्रश्न होता तो पितरांना जेवू घालण्याची परंपरा पूर्णत्वास नेण्याचा. यासाठी जवळ पैसे नसल्याने दोघांत कुरबूर झाली. दीड एकरच शेत अन् त्यात कापूस, ज्वारी पेरली. अतिवृष्टीमुळे त्याचेही काही खरे दिसत नव्हते. मराठवाडा ग्रामीण बँकेचे ३५ हजारांचे कर्जही घेतले होते. वाद सुरू असताना या सर्व बाबींचा उहापोह झाला. सर्व बाबी चिंतेच्या खाईत ढकलणाऱ्याच असल्याने पत्नीने आत्महत्येसाठी विहिरीत उडी घेतली. ही घटना पतीला कळाल्यानंतर त्यानेही त्याच विहिरीत उडी घेतली. पती-पत्नीचे प्रेत बाहेर काढल्यानंतर गिरगाव रूग्णालयात या प्रेताचे शवविच्छेदन केले. मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास एकाच चितेवर पती-पत्नीला अग्निमुख देण्यात आले. या घटनेमुळे ग्रामस्थांची मने हेलावली अन् हादरूनही गेली. छोट्याशा खोपटात अगदी तोकड्या साहित्यावर चालणाऱ्या संसाराला भयाण रुप आले. सुमित पतंगे (६ वर्ष), स्वराज पतंगे (२) तर सुरज पतंगे (७ महिने) हे बालके उघड्यावर आली आहेत. यातील सुमित पहिली वर्गात आहे. मयताला तीन भाऊ व वयोवृद्ध आई आहे. ते वेगवेगळे राहतात. बालकांची चिंता ग्रामस्थांना लागली आहे. शासनाने या बालकांना पाहून तरी मदत द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या गावाला सदर प्रतिनिधीने भेट दिली असता गावात शोकाकूल वातावरण होते. या बालकाच्या शिक्षणाची जबाबदारी योगेश्वरी प्रतिष्ठाणच्या वतीने घेतल्याचे समजते. आता छत्र हरवलेल्या या बालकांना भविष्यात अडचणी येवू नयेत, यासाठी मदतीचे हात पुढे यावेत, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.